शहरं
Join us  
Trending Stories
1
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
2
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
3
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
4
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
5
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
6
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
7
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
8
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
9
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
10
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
11
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
12
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
13
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
14
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
15
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
16
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
17
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
18
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
19
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
20
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 

माणमध्ये सर्वाधिक विंधनविहिरी

By admin | Updated: May 19, 2015 00:31 IST

दुष्काळावर मात : खटाव तालुक्यातून मागणीच नाही

सातारा : सातारा जिल्ह्यातील पूर्व भाग हा दुष्काळी असून, दरवर्षीच पाण्याची टंचाई भेडसावते. यावर्षीही पाण्याची टंचाई असून, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा होण्यासाठी बोअरवेलची मागणी ग्रामपंचायतीतून होते. यावर्षी टंचाईग्रस्तमधून ३७ विंधनविहिरी मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी ३२ मारल्या असून, त्यातील ३० विंधनविहिरींना पाणी लागले आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यात सर्वात जास्त विंधनविहिरींची संख्या आहे. जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागाकडे एक तर भाड्याची सात विंधन यंत्रे आहेत.सातारा जिल्ह्यात नेहमीच माण, खटाव, कोरेगाव, फलटण या पूर्व भागातील तालुक्यांत पाण्याची टंचाई जाणवते. पश्चिम भागातील सातारा, पाटण, जावळी, महाबळेश्वर हे डोंगरी तालुके असून, या तालुक्यांमध्येही उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते.प्रामुख्याने पूर्व भागातील तालुक्यात पाणी पुरवठ्यासाठी विंधन विहिरींचीही मागणी होती. टंचाईच्या आराखड्यातून ग्रामपंचायतीकडून मागणी पंचायत समितीकडे केली जाते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या तीन भूवैज्ञानिकांकडून मागणी केलेल्या गावामध्ये प्रस्तावित जागेची पाहणी करून पाणी आहे किंवा नाही, याची तपासणी यंत्रणेद्वारे केली जाते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागाकडून विंधनविहिरीला मंजुरी दिली जाते. त्यानंतर बोअरवेल मारण्यात येते, असे यांत्रिकी विभागातून सांगण्यात आले. यावर्षी सर्वात जास्त माणमधून बोअरवेलची मागणी झाली आणि मंजुरीही मिळाली. एकट्या माण तालुक्यात मारलेल्या २१ बोअरवेलपैकी १८ बोअरवेलला पाणी लागले असून, तीन बोअरवेल अयशस्वी झाल्या. खटाव तालुक्यात एकही बोअरवेलची मागणी झाली नाही. मारलेल्या ३२ बोअरवेलपैकी केवळ तीन बोअरवेल अयशस्वी ठरल्या आहेत. (प्रतिनिधी)बोअरवेलची सध्य स्थिती--तालुकामंजूर बोअरवेल मारलेल्या बोअरवेल

माण २६ २१कोरेगाव १ १फलटण ८ ८पाटण २ २