शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
3
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
4
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
5
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
7
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
8
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
9
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
10
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
11
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
12
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
13
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
14
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
15
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
16
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
17
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
18
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
19
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
20
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये

माणमध्ये सर्वाधिक विंधनविहिरी

By admin | Updated: May 19, 2015 00:31 IST

दुष्काळावर मात : खटाव तालुक्यातून मागणीच नाही

सातारा : सातारा जिल्ह्यातील पूर्व भाग हा दुष्काळी असून, दरवर्षीच पाण्याची टंचाई भेडसावते. यावर्षीही पाण्याची टंचाई असून, टंचाईग्रस्त गावांमध्ये पाणीपुरवठा होण्यासाठी बोअरवेलची मागणी ग्रामपंचायतीतून होते. यावर्षी टंचाईग्रस्तमधून ३७ विंधनविहिरी मंजूर झाल्या होत्या. त्यापैकी ३२ मारल्या असून, त्यातील ३० विंधनविहिरींना पाणी लागले आहे. दुष्काळी समजल्या जाणाऱ्या माण तालुक्यात सर्वात जास्त विंधनविहिरींची संख्या आहे. जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागाकडे एक तर भाड्याची सात विंधन यंत्रे आहेत.सातारा जिल्ह्यात नेहमीच माण, खटाव, कोरेगाव, फलटण या पूर्व भागातील तालुक्यांत पाण्याची टंचाई जाणवते. पश्चिम भागातील सातारा, पाटण, जावळी, महाबळेश्वर हे डोंगरी तालुके असून, या तालुक्यांमध्येही उन्हाळ्यात पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागते.प्रामुख्याने पूर्व भागातील तालुक्यात पाणी पुरवठ्यासाठी विंधन विहिरींचीही मागणी होती. टंचाईच्या आराखड्यातून ग्रामपंचायतीकडून मागणी पंचायत समितीकडे केली जाते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या तीन भूवैज्ञानिकांकडून मागणी केलेल्या गावामध्ये प्रस्तावित जागेची पाहणी करून पाणी आहे किंवा नाही, याची तपासणी यंत्रणेद्वारे केली जाते. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या यांत्रिक विभागाकडून विंधनविहिरीला मंजुरी दिली जाते. त्यानंतर बोअरवेल मारण्यात येते, असे यांत्रिकी विभागातून सांगण्यात आले. यावर्षी सर्वात जास्त माणमधून बोअरवेलची मागणी झाली आणि मंजुरीही मिळाली. एकट्या माण तालुक्यात मारलेल्या २१ बोअरवेलपैकी १८ बोअरवेलला पाणी लागले असून, तीन बोअरवेल अयशस्वी झाल्या. खटाव तालुक्यात एकही बोअरवेलची मागणी झाली नाही. मारलेल्या ३२ बोअरवेलपैकी केवळ तीन बोअरवेल अयशस्वी ठरल्या आहेत. (प्रतिनिधी)बोअरवेलची सध्य स्थिती--तालुकामंजूर बोअरवेल मारलेल्या बोअरवेल

माण २६ २१कोरेगाव १ १फलटण ८ ८पाटण २ २