शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मोक्काच्या दोषारोपासाठी पोलिसांना आणखी मुदतवाढ

By admin | Updated: December 7, 2015 00:28 IST

आॅक्टोबर महिन्यात पोलिसांनी बाबर खान खून प्रकरणातील पाच आरोपींवर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.

कऱ्हाड : कऱ्हाडातील बबलू माने खून व मोक्का प्रकरणाचा तपास करून आरोपींविरोधात दोषारोपपत्र सादर करण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी आॅक्टोबर महिन्यात तपासी अधिकाऱ्यांनी विशेष न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना ४५ दिवसांची मुदतवाढ दिली. संबंधित मुदत ५ डिसेंबर रोजी संपली. त्यामुळे आणखी मुदतवाढ मिळण्याची मागणी पोलिसांनी केली. न्यायालयाने ही मागणी मान्य करून पोलिसांना दुसऱ्यांदा ४५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. शहरातील टोळीयुद्धानंतर पोलिसांनी गुंडांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली होती. सल्याच्या टोळीवर मोक्काअंतर्गत कारवाई करावी, असा प्रस्ताव कऱ्हाड शहर पोलिसांनी आॅगस्ट महिन्याच्या अखेरीस पोलीस अधीक्षकांमार्फत विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे पाठविला होता. या प्रस्तावास पोलीस महानिरीक्षकांनी मंजुरी दिल्यानंतर सलीम शेख ऊर्फ सल्या चेप्या याच्यासह फिरोज बशिर कागदी (३३), इब्राहिम गफूर सय्यद (४८, दोघेही रा. शनिवार पेठ, कऱ्हाड), मोहसिन दिलावर जमादार (२७, रा. शास्त्रीनगर-मलकापूर, मूळ रा. निपाणी, जि. बेळगाव), जावेद साहेबलाल शेख (२८, रा. मार्केट यार्ड, कऱ्हाड), इरफान हारुण इनामदार (२६, रा. शिंदे गल्ली, कऱ्हाड) व सल्याचा मुलगा आसिफ सलीम शेख (२२, रा. शिंदे गल्ली, कऱ्हाड) यांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाच्या आदेशानुसार या टोळीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान, आॅक्टोबर महिन्यात पोलिसांनी बाबर खान खून प्रकरणातील पाच आरोपींवर न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. मात्र, बबलू माने खून प्रकरण तसेच मोक्काचा तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी तपासी अधिकारी पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर व गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक एच. एन. काकंडकी यांनी न्यायालयाकडे केली होती. (प्रतिनिधी)