शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
2
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
3
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
4
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
5
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
6
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
7
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
8
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
9
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
10
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
11
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
12
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
13
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका
14
काँग्रेस नेते शशी थरुर अचानक रशिया दौऱ्यावर; रशियन परराष्ट्र मंत्र्यांची घेतली भेट, कारण काय?
15
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
16
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
17
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
18
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
19
मुख्यमंत्री फडणवीसांनी समज देऊ म्हणताच लोणीकर म्हणाले, "मी हजारवेळा माफी मागेल, पण..."
20
रिलायन्स-एअरटेलचा नवा रेकॉर्ड, सेन्सेक्स १००० अंकांनी वधारला, ‘या’ शेअर्सनी घेतली मोठी उसळी!

आमदारांचे चारशेहून अधिक प्रस्ताव दाखल

By admin | Updated: July 27, 2014 22:28 IST

आमदार विकासनिधी : ‘लोकमत’च्या मालिकेतून मांडली गेली होती वस्तुस्थिती

सातारा : आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागणार असल्याची शक्यता गृहित धरून जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी चारशेहून अधिक कामांचे प्रस्ताव नियोजन समितीकडे दाखल केले आहेत. त्याच्या मंजुरीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, काही प्रस्तावांना मंजुरीही मिळाली आहे. संबंधित कामे ज्या विभागामार्फत होणार आहेत, त्यांना आराखडे बनविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पावसाचे प्रमाण कमी झाल्यास ही कामे कोणत्याही क्षणी सुरू होणार आहेत.‘लोकमत’ने ‘आमदार निधीचा सातबारा’ या मालिकेच्या माध्यमातून कोणत्या आमदारांनी किती निधी खर्च केला आहे आणि कोणते आमदार मागे आहेत, याची माहिती पुढे आणल्यानंतर आमदारांच्या स्वीय सहायकांची आणि कार्यकर्त्यांची नियोजन समिती कार्यालयातील गर्दी वाढली आहे. त्याचबरोबर सत्ताधारी आमदारांच्या ताब्यात असणाऱ्या ग्रामपंचायतींना निरोप पाठवून आपल्या गावात कोणते काम हवे, याच्या मागणीचे ठराव तयार करण्याच्या सूचना केल्या आहेत. २०१३-१४ चा निधी सर्वच आमदारांनी विविध विकासकामांवर टाकला असून, ती कामे पूर्णत्वाकडे आली आहेत. २०१४-१५ साठी असणारा निधी आचारसंहितेपूर्वी विविध विकासकामांवर टाकावयाचा आहे. त्यामुळे प्रत्येक आमदारांनी तत्परता दाखविण्यास सुरुवात केली आहे. जे चारशे प्रस्ताव दाखल झाले आहेत, त्यामध्ये आमदार प्रा. दीपक चव्हाण, सातारा-जावळीचे आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, आ. विलासराव पाटील-उंडाळकर आणि आ. विक्रमसिंह पाटणकर यांची आघाडी आहे. आमदारांना प्रतिवर्षी स्थानिक विकासनिधी म्हणून दोन कोटी देण्यात येतात. हा निधी कार्यकर्ते तसेच गावांनी केलेली मागणी आणि ग्रामपंचायतीच्या ठरावानंतर संबंधित कामांवर टाकला जातो.ही कामे प्रामुख्याने दहा लाखांपेक्षा अधिकची नसतात. उर्वरित कामे ही जिल्हा नियोजन आराखड्यातून केली जातात. (प्रतिनिधी)