शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
4
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
5
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
6
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
7
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
8
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
9
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
10
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
11
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
12
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
13
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
14
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
15
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
16
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
17
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
18
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
19
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
20
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:47 IST

वडूज: ‘देशाला विकणाऱ्या सरकारचा धिक्कार करून ते रोखण्याचे काम सध्या काँग्रेस करीत आहे. ‘अंबानी-अदानी’ या खासगी क्षेत्रातील लोकांना सरकारी ...

वडूज: ‘देशाला विकणाऱ्या सरकारचा धिक्कार करून ते रोखण्याचे काम सध्या काँग्रेस करीत आहे. ‘अंबानी-अदानी’ या खासगी क्षेत्रातील लोकांना सरकारी संस्था विकण्याचे काम ईस्ट-इंडिया कंपनीप्रमाणे मोदी सरकार करीत आहे,’ अशी टीका काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी केले.

वडूज येथील हुतात्मा स्मारकामध्ये स्वातंत्र्यासाठी लढलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषिराज्यमंत्री विश्वजित कदम, पक्षाच्या सहप्रभारी सोनल पटेल, कार्याध्यक्ष बसवराज पाटील, उल्हास पवार, सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस विनायक देशमुख, अभय छाजेड, गुलाबराव घोरपडे, डॉ. दिलीप येळगावकर आदी उपस्थित होते.

एच. के. पाटील म्हणाले, ‘पत्रकारांनी वास्तव भूमिका मांडल्यामुळेच मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. मोदी सरकारने देशाला खिळखिळे केले असल्याने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारप्रमाणे काम करणार. सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्यपूर्व लढ्यातील हुतात्म्यांच्या भूमीत येऊन त्यांना अभिवादन करण्याचे भाग्य लाभले.’

नाना पटोले म्हणाले, ‘केंद्रातील जुलमी मोदी सरकार खोटं स्वप्न दाखवून सत्ता घेतली. महत्त्वाच्या सरकारी संस्था विकून सात वर्षे देश लुटण्याचे काम भाजपने केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा यांना विसर पडला असून, अपमानित करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. देशाला लुटून विकणाऱ्या मोदी सरकारने भारतीय रेल्वेला ‘अदानी रेल्वे’ करण्याचे पाप केले आहे.’

मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, वडूज ही क्रांतिकारकांची भूमी असून, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, किसनवीर, दादासाहेब उंडाळकर आदींच्या योगदानामुळे देशात क्रांतिकारकांची प्रेरणाज्योत तेवत ठेवली जात आहे. केंद्र सरकारच्या जुलमी राजवटीमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. देशावरील ५५ हजार कोटी रुपये कर्ज एक लाख दहा हजार कोटीपर्यंत पोहोचले आहे. जुलमी सरकार विरोधात जर बोलाल तर इडीची चौकशी लावली जाते.’

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘जालीयनवाला बाग हत्याकांडनंतर देशात दुसरीकडे एकाचवेळी नऊ हौतात्म्य पत्करणारी हुतात्मा नगरी म्हणून वडूजला संबोधले जाते. घटनात्मक संस्थांचा गळा घोटण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. हेरगिरी प्रकरणासाठीचे वापरलेले सॉफ्टवेअर म्हणजे आपल्या नागरिकत्वाच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे. आपले संविधान वाचविण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हावर आल्याचे त्यांनी सुचित केले.’

रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘स्वातंत्र्य लढ्यासाठी बलिदान देणाऱ्या नऊ हुतात्म्यांचे स्मरण सदैव तेवत ठेवण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे. या हुतात्म्यांना प्रतिवर्षी ९ सप्टेंबरला अभिवादन करण्याचीही परंपरा माजी आमदार केशवराव पाटील व विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी अविरतपणे सुरू ठेवली होती.’

यावेळी यशोमती ठाकूर, सतेज पाटील, विश्वजित कदम, विनायक देशमुख, बसवराज पाटील आदींची भाषणे झाली. याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोकराव गोडसे, ॲड. विजयराव कणसे, डॉ. महेश गुरव, डाॅ. विवेक देशमुख, बाबासाहेब माने, युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, रजनी पवार, शिवराज मोरे, डाॅ. संतोष गोडसे आदींसह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ०९वडूज ०१

वडगाव ते वडूज हुतात्मा स्मरण यात्रा ज्योतीचे स्वागत करताना एच. के. पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, विश्वजित कदम, रणजितसिंह देशमुख आदी उपस्थित होते. (छाया : शेखर जाधव)