शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

मोदी सरकार म्हणजेच ईस्ट इंडिया कंपनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:47 IST

वडूज: ‘देशाला विकणाऱ्या सरकारचा धिक्कार करून ते रोखण्याचे काम सध्या काँग्रेस करीत आहे. ‘अंबानी-अदानी’ या खासगी क्षेत्रातील लोकांना सरकारी ...

वडूज: ‘देशाला विकणाऱ्या सरकारचा धिक्कार करून ते रोखण्याचे काम सध्या काँग्रेस करीत आहे. ‘अंबानी-अदानी’ या खासगी क्षेत्रातील लोकांना सरकारी संस्था विकण्याचे काम ईस्ट-इंडिया कंपनीप्रमाणे मोदी सरकार करीत आहे,’ अशी टीका काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी केले.

वडूज येथील हुतात्मा स्मारकामध्ये स्वातंत्र्यासाठी लढलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी काँग्रेस पक्षाच्यावतीने अभिवादन सोहळ्याचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, कृषिराज्यमंत्री विश्वजित कदम, पक्षाच्या सहप्रभारी सोनल पटेल, कार्याध्यक्ष बसवराज पाटील, उल्हास पवार, सचिव पृथ्वीराज साठे, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, सरचिटणीस विनायक देशमुख, अभय छाजेड, गुलाबराव घोरपडे, डॉ. दिलीप येळगावकर आदी उपस्थित होते.

एच. के. पाटील म्हणाले, ‘पत्रकारांनी वास्तव भूमिका मांडल्यामुळेच मोदी सरकारचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. मोदी सरकारने देशाला खिळखिळे केले असल्याने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारप्रमाणे काम करणार. सातारा जिल्ह्यातील स्वातंत्र्यपूर्व लढ्यातील हुतात्म्यांच्या भूमीत येऊन त्यांना अभिवादन करण्याचे भाग्य लाभले.’

नाना पटोले म्हणाले, ‘केंद्रातील जुलमी मोदी सरकार खोटं स्वप्न दाखवून सत्ता घेतली. महत्त्वाच्या सरकारी संस्था विकून सात वर्षे देश लुटण्याचे काम भाजपने केले. देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांचा यांना विसर पडला असून, अपमानित करण्याचे काम मोदी सरकार करीत आहे. देशाला लुटून विकणाऱ्या मोदी सरकारने भारतीय रेल्वेला ‘अदानी रेल्वे’ करण्याचे पाप केले आहे.’

मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले, वडूज ही क्रांतिकारकांची भूमी असून, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील, किसनवीर, दादासाहेब उंडाळकर आदींच्या योगदानामुळे देशात क्रांतिकारकांची प्रेरणाज्योत तेवत ठेवली जात आहे. केंद्र सरकारच्या जुलमी राजवटीमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. देशावरील ५५ हजार कोटी रुपये कर्ज एक लाख दहा हजार कोटीपर्यंत पोहोचले आहे. जुलमी सरकार विरोधात जर बोलाल तर इडीची चौकशी लावली जाते.’

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘जालीयनवाला बाग हत्याकांडनंतर देशात दुसरीकडे एकाचवेळी नऊ हौतात्म्य पत्करणारी हुतात्मा नगरी म्हणून वडूजला संबोधले जाते. घटनात्मक संस्थांचा गळा घोटण्याचे काम केंद्र सरकार करीत आहे. हेरगिरी प्रकरणासाठीचे वापरलेले सॉफ्टवेअर म्हणजे आपल्या नागरिकत्वाच्या स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे. आपले संविधान वाचविण्याची जबाबदारी तुम्हा-आम्हावर आल्याचे त्यांनी सुचित केले.’

रणजितसिंह देशमुख म्हणाले, ‘स्वातंत्र्य लढ्यासाठी बलिदान देणाऱ्या नऊ हुतात्म्यांचे स्मरण सदैव तेवत ठेवण्याचे काम काँग्रेस पक्ष करीत आहे. या हुतात्म्यांना प्रतिवर्षी ९ सप्टेंबरला अभिवादन करण्याचीही परंपरा माजी आमदार केशवराव पाटील व विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी अविरतपणे सुरू ठेवली होती.’

यावेळी यशोमती ठाकूर, सतेज पाटील, विश्वजित कदम, विनायक देशमुख, बसवराज पाटील आदींची भाषणे झाली. याप्रसंगी जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोकराव गोडसे, ॲड. विजयराव कणसे, डॉ. महेश गुरव, डाॅ. विवेक देशमुख, बाबासाहेब माने, युवक जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, रजनी पवार, शिवराज मोरे, डाॅ. संतोष गोडसे आदींसह जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

फोटो ०९वडूज ०१

वडगाव ते वडूज हुतात्मा स्मरण यात्रा ज्योतीचे स्वागत करताना एच. के. पाटील, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, सतेज पाटील, विश्वजित कदम, रणजितसिंह देशमुख आदी उपस्थित होते. (छाया : शेखर जाधव)