शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

आगाशिवनगरात डोंगरात मियावॉकी पद्धतीने वृक्षलागवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:24 IST

मलकापूर : आगाशिवनगर येथील डोंगरउतारावरील जमिनीची धूप रोखण्याकरिता पालिकेने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी आगाशिवनगरात डोंगरउताराला मियावॉकी पद्धतीने ...

मलकापूर : आगाशिवनगर येथील डोंगरउतारावरील जमिनीची धूप रोखण्याकरिता पालिकेने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी आगाशिवनगरात डोंगरउताराला मियावॉकी पद्धतीने वृक्षलागवडीचे काम हाती घेतले आहे. तर शहरातील मोकळी जागा व नवीन रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करून वायूप्रदूषण कमी करण्यासाठी फायदा होणार आहे.

‘माझी वसुंधरा’अंतर्गत दुसरे अभियान सुरू झाले आहे. त्याअंतर्गत पालिकेने नुकतेच अहिल्यादेवी भाजी मंडई येथे वृक्षारोपण करून मलकापुरात या अभियानाचा प्रारंभ केला. तसेच पालिका कार्यक्षेत्रात विकास आराखड्यातील लक्ष्मीनगर व दत्तनगर येथील मोकळ्या जागेच्या ठिकाणी एकूण पाच वटवृक्ष व आंबा, नारळ, सदाफुली या वृक्षांची लागवड करण्यात आली. या वेळी शासनामार्फत वेळोवेळी पर्यावरण संवर्धनाकरिता व विविध योजनांकरिता प्रशासन नेहमीच कटिबद्ध व सज्ज असल्याचे मत मुख्याधिकारी मर्ढेकर यांनी व्यक्त केले.

या वेळी नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महिला व बालकल्याण सभापती शकुंतला शिंगण, उपसभापती स्वाती तुपे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन व शिक्षण सभापती प्रशांत चांदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, नगरसेविका, नगरसेवक, मनीषा फडतरे, सुचित्रा बलवान, रजिया आतार, पुंडलिक ढगे, संपत हुलवान, भानुदास शिंदे, संदीप पोळ, शेखर मुंडे उपस्थित होते.

नगराध्यक्षा येडगे म्हणाल्या, ‘माझी वसुंधरा २०२०-२१ अभियानात पालिकेने राज्यात तृतीय क्रमांक पटकवला. त्यामुळे पालिकेने १ कोटीचे पारितोषिक प्राप्त केले आहे. पंचतत्त्वांचा समतोल राखून पर्यावरण संवर्धन करणे हा या अभियानाचा मूळ उद्देश आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही सर्वांच्या सहकार्याने शहरात हे अभियान यशस्वी करूया. शहरातील प्रत्येक महिलेने वृक्षलागवड व संवर्धन करावे.’

उपनगराध्यक्ष शिंदे म्हणाले, ‘पालिका कार्यक्षेत्रात विकास आराखड्यातील लक्ष्मीनगर व दत्तनगर येथील मोकळ्या जागेच्या ठिकाणी एकूण पाच वटवृक्ष व आंबा, नारळ, सदाफुली या वृक्षांची रोपे लावली. या रोपांना २४ तास नळ पाणीपुरवठा प्रकल्पातील टाक्या साफ केलेले पाणी सौर ऊर्जेच्या माध्यमातून ठिबक सिंचनाद्वारे पुनर्वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे वीज व पाणी बचत होणार आहे.’

फोटो..

०२मलकापूर वृक्षारोपण

पालिका कार्यक्षेत्रात विकास आराखड्यातील लक्ष्मीनगर व दत्तनगर येथील मोकळ्या जागेत पाच वटवृक्ष, आंबा, नारळ व सदाफुली या वृक्षांची लागवड करण्यात आली. (छाया : माणिक डोंगरे)

020721\img_20210702_161809.jpg

फोटो कॕप्शन

पालिका कार्यक्षेत्रात विकास आराखड्यातील लक्ष्मीनगर व दत्तनगर येथील ओपन स्पेसमधे पाच वटवृक्ष, आंबा, नारळ व सदाफुली या वृक्षांची लागवड करण्यात आली. ( छाया- माणिक डोंगरे)