शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आगाशिवनगरात डोंगरात मियावॉकी पद्धतीने वृक्षलागवड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:24 IST

मलकापूर : आगाशिवनगर येथील डोंगरउतारावरील जमिनीची धूप रोखण्याकरिता पालिकेने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी आगाशिवनगरात डोंगरउताराला मियावॉकी पद्धतीने ...

मलकापूर : आगाशिवनगर येथील डोंगरउतारावरील जमिनीची धूप रोखण्याकरिता पालिकेने नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. यासाठी आगाशिवनगरात डोंगरउताराला मियावॉकी पद्धतीने वृक्षलागवडीचे काम हाती घेतले आहे. तर शहरातील मोकळी जागा व नवीन रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण करून वायूप्रदूषण कमी करण्यासाठी फायदा होणार आहे.

‘माझी वसुंधरा’अंतर्गत दुसरे अभियान सुरू झाले आहे. त्याअंतर्गत पालिकेने नुकतेच अहिल्यादेवी भाजी मंडई येथे वृक्षारोपण करून मलकापुरात या अभियानाचा प्रारंभ केला. तसेच पालिका कार्यक्षेत्रात विकास आराखड्यातील लक्ष्मीनगर व दत्तनगर येथील मोकळ्या जागेच्या ठिकाणी एकूण पाच वटवृक्ष व आंबा, नारळ, सदाफुली या वृक्षांची लागवड करण्यात आली. या वेळी शासनामार्फत वेळोवेळी पर्यावरण संवर्धनाकरिता व विविध योजनांकरिता प्रशासन नेहमीच कटिबद्ध व सज्ज असल्याचे मत मुख्याधिकारी मर्ढेकर यांनी व्यक्त केले.

या वेळी नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, महिला व बालकल्याण सभापती शकुंतला शिंगण, उपसभापती स्वाती तुपे, बांधकाम सभापती राजेंद्र यादव, नियोजन व शिक्षण सभापती प्रशांत चांदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर, नगरसेविका, नगरसेवक, मनीषा फडतरे, सुचित्रा बलवान, रजिया आतार, पुंडलिक ढगे, संपत हुलवान, भानुदास शिंदे, संदीप पोळ, शेखर मुंडे उपस्थित होते.

नगराध्यक्षा येडगे म्हणाल्या, ‘माझी वसुंधरा २०२०-२१ अभियानात पालिकेने राज्यात तृतीय क्रमांक पटकवला. त्यामुळे पालिकेने १ कोटीचे पारितोषिक प्राप्त केले आहे. पंचतत्त्वांचा समतोल राखून पर्यावरण संवर्धन करणे हा या अभियानाचा मूळ उद्देश आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच या वर्षीही सर्वांच्या सहकार्याने शहरात हे अभियान यशस्वी करूया. शहरातील प्रत्येक महिलेने वृक्षलागवड व संवर्धन करावे.’

उपनगराध्यक्ष शिंदे म्हणाले, ‘पालिका कार्यक्षेत्रात विकास आराखड्यातील लक्ष्मीनगर व दत्तनगर येथील मोकळ्या जागेच्या ठिकाणी एकूण पाच वटवृक्ष व आंबा, नारळ, सदाफुली या वृक्षांची रोपे लावली. या रोपांना २४ तास नळ पाणीपुरवठा प्रकल्पातील टाक्या साफ केलेले पाणी सौर ऊर्जेच्या माध्यमातून ठिबक सिंचनाद्वारे पुनर्वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे वीज व पाणी बचत होणार आहे.’

फोटो..

०२मलकापूर वृक्षारोपण

पालिका कार्यक्षेत्रात विकास आराखड्यातील लक्ष्मीनगर व दत्तनगर येथील मोकळ्या जागेत पाच वटवृक्ष, आंबा, नारळ व सदाफुली या वृक्षांची लागवड करण्यात आली. (छाया : माणिक डोंगरे)

020721\img_20210702_161809.jpg

फोटो कॕप्शन

पालिका कार्यक्षेत्रात विकास आराखड्यातील लक्ष्मीनगर व दत्तनगर येथील ओपन स्पेसमधे पाच वटवृक्ष, आंबा, नारळ व सदाफुली या वृक्षांची लागवड करण्यात आली. ( छाया- माणिक डोंगरे)