शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मंत्री आले, पंचनामे झाले मदतीचे काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पाटण : पाटण तालुक्यात न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे निसर्गाचे संकट येऊन गेले. ढगफुटीमुळे सर्वत्र ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पाटण : पाटण तालुक्यात न भूतो न भविष्यती अशा प्रकारचे निसर्गाचे संकट येऊन गेले. ढगफुटीमुळे सर्वत्र हाहाकार झाला. यात पाटण तालुक्यातील ३० हजार शेतकऱ्यांच्या शेती पिकाचा नायनाट झाला. लोक दगावले, घरे पडली; त्यानंतर राज्यातील अनेक मंत्र्यांनी पाटणकडे धाव घेतली. नुकसानीचे पंचनामेही झाले; परंतु अद्याप तरी शासन बाधित शेतकऱ्यांना आणि बेघर झालेल्या निराधारांना आर्थिक मदत देण्यासाठी राजी नसल्याचे दिसत आहे.

पाटण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे आणि ढगफुटी भूस्खलन यामुळे ३७ जणांनी आपला जीव गमावला. तालुक्यातील ११०० घरांची पडझड झाली, तसेच २४० पाळीव जनावरे मृत्युमुखी पडली. त्याही पुढे जाऊन नुकसानीचा आकडा पाहता सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाटण तालुक्यातील ३० हजार शेतकऱ्यांचे ३९९ हेक्टरवरील शेती पिके जमीनदोस्त झाली.

तालुक्यातील आंबेघर तर्फ मरळी ढोकावळे मिरगाव या गावांमधील काही वस्त्या भूस्खलन झाल्यामुळे जमिनीत गाडल्या गेल्या. संपूर्ण राज्यभर या घटनांची मोठी चर्चा झाली. राज्याच्या विरोधी पक्षनेत्यासहित अनेक मंत्री, आमदार, खासदार यांनी पाटण तालुक्याचा दौरा केला. नुकसानीची पाहणी केली एवढेच काय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही पाटण तालुक्यातील आपत्तीची हेलिकॉप्टरद्वारे हवाई पाहणी केली.

एवढं सगळं होऊनही दीड महिना झाला तरी तालुक्यातील बाधित शेतकरी आणि ज्यांचे संसार उघड्यावर पडले आहेत. शासन अशा लोकांना कधी मदत देणार, याकडे डोळे लावून बसला आहे.

कोट...

पाटण तालुक्यातील जवळपास तीस हजार शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाले आहे. या सर्वांचे पंचनामेदेखील झाले. शासनाकडून मदत देण्याची प्रक्रिया सुरू झाली तर शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यावर त्यांची आर्थिक मदत जमा होईल.

-सुनील ताकटे,

तालुका कृषी अधिकारी,पाटण