शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

गिरणी कामगारप्रश्नी शासनाला जाग आणणे गरजेचे

By admin | Updated: July 6, 2015 00:19 IST

बजरंग चव्हाण : मल्हारपेठ येथे गिरणी कामगार संघर्ष समितीच्या बैठकीत आंदोलनाला दिली दिशा

मल्हारपेठ : ‘गिरणी कामगारांना घरे देण्याचा कायदा आघाडी सरकारने बनविलला होता. तो कायदा अंमलात आणून फडणवीस सरकारला जाग आणणे गरजेचे आहे. सरकारला जाग येण्यासाठी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,’ असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले.मल्हारपेठ येथील कोयना कृषक सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गिरणी कामगार संघर्ष समितीचे राजन दळवी व सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे हेमंत गोसावी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी वेळकाढूपणा करणाऱ्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाँग मार्चचे धोरण अवलंबले आहे. त्यासाठी आपल्याला उग्र आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत आहे. आघाडी सरकारने १ लाख ४८ हजार कामगारांना घरे देण्याबाबत कायदा केला. मात्र, नवीन महाआघाडी आल्यापासून परदेश वाऱ्या करीत आहेत. ते गिरणी कामगारांच्या घराकडे लक्ष देत नाहीत.’राजन दळवी म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरणी कामगारांना घरे देण्याची मागणी मान्य केली. त्यांनी एम.एम.आर.डी. ची सतरा हजार घरे तयार असून, त्यांची लॉटरी काढावी व सोळा मिल मालकांनी शासनाला दिलेल्या जागेत ‘म्हाडा’च्या वतीने घरे बांधण्यासाठी आपल्या भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चासाठी सर्व विरोधी पक्ष आपल्यासोबत असून, सर्व गिरणी कामगार व वारसांच्या कुटुंबीयांनी शासनाला जागे करण्यासाठी सहभागी होऊन शासनाची कानउघडणीकरावी.तानाजी थोरात यांनी प्रास्ताविक केले. महादेव जगताप यांनी स्वागत केले. सुरेश पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)