शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

गिरणी कामगारप्रश्नी शासनाला जाग आणणे गरजेचे

By admin | Updated: July 6, 2015 00:19 IST

बजरंग चव्हाण : मल्हारपेठ येथे गिरणी कामगार संघर्ष समितीच्या बैठकीत आंदोलनाला दिली दिशा

मल्हारपेठ : ‘गिरणी कामगारांना घरे देण्याचा कायदा आघाडी सरकारने बनविलला होता. तो कायदा अंमलात आणून फडणवीस सरकारला जाग आणणे गरजेचे आहे. सरकारला जाग येण्यासाठी कामगारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,’ असे आवाहन राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे उपाध्यक्ष बजरंग चव्हाण यांनी केले.मल्हारपेठ येथील कोयना कृषक सभागृहात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी गिरणी कामगार संघर्ष समितीचे राजन दळवी व सेंच्युरी मिल कामगार एकता मंचचे हेमंत गोसावी उपस्थित होते.चव्हाण म्हणाले, ‘गिरणी कामगारांना घरे मिळण्यासाठी वेळकाढूपणा करणाऱ्या शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लाँग मार्चचे धोरण अवलंबले आहे. त्यासाठी आपल्याला उग्र आंदोलनाचे पाऊल उचलावे लागत आहे. आघाडी सरकारने १ लाख ४८ हजार कामगारांना घरे देण्याबाबत कायदा केला. मात्र, नवीन महाआघाडी आल्यापासून परदेश वाऱ्या करीत आहेत. ते गिरणी कामगारांच्या घराकडे लक्ष देत नाहीत.’राजन दळवी म्हणाले, ‘माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी गिरणी कामगारांना घरे देण्याची मागणी मान्य केली. त्यांनी एम.एम.आर.डी. ची सतरा हजार घरे तयार असून, त्यांची लॉटरी काढावी व सोळा मिल मालकांनी शासनाला दिलेल्या जागेत ‘म्हाडा’च्या वतीने घरे बांधण्यासाठी आपल्या भव्य मोर्चाचे आयोजन केले आहे. मोर्चासाठी सर्व विरोधी पक्ष आपल्यासोबत असून, सर्व गिरणी कामगार व वारसांच्या कुटुंबीयांनी शासनाला जागे करण्यासाठी सहभागी होऊन शासनाची कानउघडणीकरावी.तानाजी थोरात यांनी प्रास्ताविक केले. महादेव जगताप यांनी स्वागत केले. सुरेश पवार यांनी आभार मानले. (वार्ताहर)