शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
2
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
3
ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
4
डोकं फिरलंया! फायटर जेट पाडून भारताने लावली पाकची वाट, तरी इशाक दार यांनी थोपटली त्यांच्या वायुदलाची पाठ
5
परेश रावल यांची 'हेरा फेरी ३' मधून एक्झिट! समोर आलं कारण; चाहत्यांची घोर निराशा
6
टीम कुक यांनी ट्रम्प यांचा सल्ला का धुडकावला? अ‍ॅपल अमेरिकेला स्थलांतरीत केल्यास काय होईल?
7
COVID 19 : हाँगकाँग-सिंगापूरमध्ये कोरोना परतला, रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ
8
पाकला पाठिंबा देणं तुर्कस्तान आणि अझरबैजानच्या अंगलट! भारताने थेट वर्मावरच घातला घाव
9
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
10
माऊंट एव्हरेस्टवर भारतीय गिर्यारोहकाचा मृत्यू, शिखर सर करून परतताना घडली दुर्घटना
11
नाशिक महापालिका निवडणूक: महायुतीत शिंदेंची शिवसेना स्वबळावर लढण्याच्या तयारीत, श्रीकांत शिंदे करणार दौरा
12
Gold Rates 16 May : काल स्वस्त झालं, आज सोनं महागलं; १२०० रुपयांपेक्षा अधिक तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर
13
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
14
आमिरची विमानतळावर वाट बघत होती गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅट, कारमध्ये येताच दोघांनी एकमेकांना...
15
'संपूर्ण देश, देशाचे सैन्य PM मोदींच्या चरणी नतमस्तक', मध्यप्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य
16
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
17
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
18
२ हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
19
साडेसहा महिन्यांच्या गर्भवती तिरंदाजाची कमाल; पोटात बाळाची हालचात तरी अचूक साधला नेम
20
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार

दुधाला भाव येईना; गाय विकली जाईना!

By admin | Updated: December 7, 2015 00:31 IST

व्यावसायिकांची परवड कोण थांबवणार? : २६ रुपये लिटरचा दर थेट १९ वर येऊन कोसळला...--दूध का दूध.. कष्टावर पाणी

रशीद शेख -- औंध--शेती व्यवसायाला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या दूध व्यवसायाने मागील काही वर्षांत बस्तान बसविले होते; मात्र काही दिवसांपासून सातत्याने दूध दराच्या चढ-उताराचे या व्यवसायाला जणू ग्रहणच लागल्याचे चित्र आहे. जागतिक उत्पादनात १३ टक्के हिस्सा असणाऱ्या या व्यवसायाची परवड कोण थांबविणार? असा प्रश्न आहे. दरम्यान, दुधाचा २६ रुपयांचा दर १९ वर येऊन कोसळला आहे. दि. २६ नोव्हेंबरला देशात राष्ट्रीय दुग्धदिन साजरा केला गेला. अन् बरोबर १ डिसेंबरपासून दूध खरेदीच्या दरात कपातीचा निर्णय झाला. जगातील सर्वात मोठा दुग्धोत्पादन करणारा देश अशी भारताची ओळख आहे. जगातील एकूण दुग्ध उत्पादनातील १३ टक्के भारताचा हिस्सा आहे. शेतकऱ्यांची जीवनशैली व आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी दुग्धव्यवसायाकडे वळा असे आवाहनही केले जाते ; पण प्रत्यक्षात मात्र दूध उत्पादकांची परवड कोण थांबविणार? असा प्रश्न आहे.दूध दराच्या चढ-उतारामुळे काही महिन्यांपूर्वी २६ रुपये लिटर मिळणारा दर आता १९ ते २० रुपयांवर येऊन ठेपल्याने दूध व्यवसाय आर्थिक संकटात सापडला आहे. गायीच्या १ लिटर दूधनिर्मितीचा सरासरी विचार करता, वैरण, खाद्य, औषधे, मजुरी याचा खर्च वजा केला असता हाती काहीच शिल्लक राहत नाही. शेतकऱ्यांनी लाखोंचे कर्ज काढून गोठे बांधले आहेत. परराज्यातून दुधाळ गायी, म्हशी आणल्या असून, दराच्या संगीतखुर्चीमुळे दूध उत्पादकांच्या आशेवरच पाणी फिरले आहे. सद्य:स्थितीत ५ फॅटला २१ वरून २० रुपयांवर दर मिळतो. तर ४ फॅटला १९ रुपये मिळतो. बहुतांश शेतकऱ्यांना ४ फॅटनेच दर मिळतो. दूध पावडरवर आलेल्या निर्यात बंदीमुळे ज्या किमतींना गायी विकत आणल्या त्यांचा बाजारभाव पण ढासळल्याने धरलं तर चावतंय.. अशी परवड शेतकऱ्यांची झाली आहे. ८० हजारांची गाय ३५ हजारांत... मागील वर्षी गायी, म्हशी ज्या दराने शेतकऱ्यांनी खरेदी केल्या, त्या आता विक्रीस काढल्या तरी निम्म्या दरानेही जाणार नाहीत. मागील वर्षी ८० ते ९० हजारांना घेतलेली गाय आज बाजारात ३५ ते ४० हजारांना मागत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसत आहे. चारा, पशुखाद्य, देखभालीचा खर्च व दुधाचा मिळणारा दर यामुळे आमच्या हातात नफा म्हणून काहीच शिल्लक राहात नाही. यामुळे याबाबत शासनाने दूध उत्पादकांसाठी चांगले निर्णय घेण्याची गरज आहे. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना आता अच्छे दिनाची प्रतीक्षा आहे. - धनाजी जाधव, पशुपालक, औंध