शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दोन वर्षे सैन्य भरती रखडवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:40 IST

सातारा : राज्य सरकारच्या नाकर्ते धोरणामुळे राज्यात कोरोनाच्या नावाखाली गेले दोन वर्षे सैन्य भरती रखडली आहे. ही भरती ...

सातारा : राज्य सरकारच्या नाकर्ते धोरणामुळे राज्यात कोरोनाच्या नावाखाली गेले दोन वर्षे सैन्य भरती रखडली आहे. ही भरती तात्काळ न झाल्यास मंगळवार, दि. २१ पासून कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष जयवंत आरळे व सचिव अमोल साठे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ते म्हणाले, महाराष्ट्रातील तरुण हजारो रुपये खर्च करून अकॅडमी जॉईन करत आहेत. सैन्य भरतीसाठी १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे अशी वयोमर्यादा असून, २ वर्षे भरती न झाल्याने अनेकजणांची अपेक्षा भंग झाली आहे. होतकरू तरुण हे अहोरात्र शारीरिक व बौद्धिक मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. राज्यात २ वर्षे भरती न झाल्याने सुमारे २० लाखांहून अधिक तरुण बेरोजगार झाले आहेत. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत स्पोर्ट व सेंट्रल भरती सुरू आहे. राज्य सरकार कोरोनाचे कारण पुढे करत भरती टाळत आहे. सैन्य बोर्ड भरती प्रक्रिया करण्यास तयार असताना राज्य सरकारकडून परवानगी दिली जात नाही. त्यामुळे तरुणाचे नुकसान होत आहे. दोन वर्षे भरती न झाल्याने तरुणाचे वय निघून जात आहे. वय निघून गेल्याने कोल्हापूर व रत्नागिरी याठिकाणी तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत.

भरतीसाठी वय वाढवावे..

राज्य सरकारने सैन्य भरतीस परवानगी द्यावी, भरती प्रक्रिया घेणार नसाल तर वय वाढवून मिळावे, अशी मागणी करण्यात येत आहे. असे न झाल्यास मंगळवार, दि. २१ पासून कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशन व सैन्य दलाच्या भरतीसाठी प्रयत्न करणारे पश्चिम महाराष्ट्रातील तरुण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.