शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

राज्यात दोन वर्षे सैन्य भरती रखडवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:40 IST

सातारा : राज्य सरकारच्या नाकर्ते धोरणामुळे राज्यात कोरोनाच्या नावाखाली गेले दोन वर्षे सैन्य भरती रखडली आहे. ही भरती ...

सातारा : राज्य सरकारच्या नाकर्ते धोरणामुळे राज्यात कोरोनाच्या नावाखाली गेले दोन वर्षे सैन्य भरती रखडली आहे. ही भरती तात्काळ न झाल्यास मंगळवार, दि. २१ पासून कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा संस्थेचे अध्यक्ष जयवंत आरळे व सचिव अमोल साठे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

ते म्हणाले, महाराष्ट्रातील तरुण हजारो रुपये खर्च करून अकॅडमी जॉईन करत आहेत. सैन्य भरतीसाठी १७ वर्षे ६ महिने ते २१ वर्षे अशी वयोमर्यादा असून, २ वर्षे भरती न झाल्याने अनेकजणांची अपेक्षा भंग झाली आहे. होतकरू तरुण हे अहोरात्र शारीरिक व बौद्धिक मेहनत घेत असल्याचे दिसत आहे. राज्यात २ वर्षे भरती न झाल्याने सुमारे २० लाखांहून अधिक तरुण बेरोजगार झाले आहेत. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत स्पोर्ट व सेंट्रल भरती सुरू आहे. राज्य सरकार कोरोनाचे कारण पुढे करत भरती टाळत आहे. सैन्य बोर्ड भरती प्रक्रिया करण्यास तयार असताना राज्य सरकारकडून परवानगी दिली जात नाही. त्यामुळे तरुणाचे नुकसान होत आहे. दोन वर्षे भरती न झाल्याने तरुणाचे वय निघून जात आहे. वय निघून गेल्याने कोल्हापूर व रत्नागिरी याठिकाणी तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत.

भरतीसाठी वय वाढवावे..

राज्य सरकारने सैन्य भरतीस परवानगी द्यावी, भरती प्रक्रिया घेणार नसाल तर वय वाढवून मिळावे, अशी मागणी करण्यात येत आहे. असे न झाल्यास मंगळवार, दि. २१ पासून कॉम्रेड सोशल ऑर्गनायझेशन व सैन्य दलाच्या भरतीसाठी प्रयत्न करणारे पश्चिम महाराष्ट्रातील तरुण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार असल्याचे त्यांनी सांगितले.