शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

म्हसवडकर नागरिक पितात क्षारयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:39 IST

म्हसवड : म्हसवड पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे म्हसवडकर नागरिक पिण्याचे क्षारयुक्त पाणी पित आहेत. क्षारयुक्त पाण्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य बिघडले ...

म्हसवड : म्हसवड पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे म्हसवडकर नागरिक पिण्याचे क्षारयुक्त पाणी पित आहेत. क्षारयुक्त पाण्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य बिघडले असून, पालिका नागरिकांना पिण्यासाठी नेमके कुठले पाणी सोडते? पालिकेचा फिल्टर पाॅईंट असूनही नागरिकांना बिगरफिल्टर क्षारयुक्त पाणी गेल्या अनेक महिन्यांपासून सोडले जातेय. मग, फिल्टरचे पाणी नेमके कुठे मुरतेय ? आधीच कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली नागरिक आहेत. त्यात पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे क्षारयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

म्हसवड पालिका सत्ताधारी मंडळींच्या दुर्लक्षामुळे शहरातील व पालिका हद्दीतील नागरिकांना, सर्व फिल्टरची यंत्रणा असूनही बिगरफिल्टरचे पाणी पालिका गत अनेक महिन्यांपासून देत असल्याने नागरिकांना उलट्या, जुलाब मुतखडा असे पोटाचे अनेक आजार होऊ लागले आहेत. याकडे पालिका प्रशासन व सत्ताधारी मंडळी डोळेझाक करीत असल्याने, शहरातील नागरिकांचे मात्र आरोग्य बिघडत चालले आहे. म्हसवड पालिका हद्दीतील नागरिकांना माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथील साठवण तलावातून पाणीपुरवठा केला जाते? असून या पाण्याचे फिल्टरेशन पाॅईंटवर कारखेल (ता. माण) येथे केले जाते. पण या योजनेचे पाणी नागरिकांना गत अनेक महिन्यांपासून मिळत नाही. सध्या कुठले तरी विहिरीचे पाणी सोडले जातेय. तेही फिल्टर केलेले नाही. बिगरफिल्टरचे पाणी पिल्यामुळे नागरिकांना अनेक आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले, निरोगी राहण्यासाठी पालिकेने क्षारमुक्त पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शहरवासीय करीत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका, त्यात क्षारयुक्त पाणी यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दरम्यान, शहरातील जुना पोस्ट परिसर ते नवी पेठ रस्त्याच्या दोन्ही बाजू दीड महिन्यापूर्वीपासून गटार बांधकामासाठी संबंधित ठेकेदाराने जेसीबीच्या साहाय्याने खोदल्या असून हे काम करीत असताना येथील रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याच्या नळ कनेक्शनच्या पाईपलाईन उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्या पाईपमध्ये गटारीचे पाणी जात असल्याने या भागातील नागरिक दीड महिन्यापासून गटारीचे दुर्गंधीयुक्त मिसळलेले पाणी नळाद्वारे भरत आहेत. याचे सोयरसुतक ना ठेकेदाराला ना पालिकेला. तरी याकडे पालिकेने वेळीच लक्ष द्यावे. अन्यथा या भागातील नागरिकांच्या उग्र रोषाला पालिका प्रशासनाला सामोरे जावे लागेल.