शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

म्हसवडकर नागरिक पितात क्षारयुक्त पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:39 IST

म्हसवड : म्हसवड पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे म्हसवडकर नागरिक पिण्याचे क्षारयुक्त पाणी पित आहेत. क्षारयुक्त पाण्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य बिघडले ...

म्हसवड : म्हसवड पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे म्हसवडकर नागरिक पिण्याचे क्षारयुक्त पाणी पित आहेत. क्षारयुक्त पाण्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य बिघडले असून, पालिका नागरिकांना पिण्यासाठी नेमके कुठले पाणी सोडते? पालिकेचा फिल्टर पाॅईंट असूनही नागरिकांना बिगरफिल्टर क्षारयुक्त पाणी गेल्या अनेक महिन्यांपासून सोडले जातेय. मग, फिल्टरचे पाणी नेमके कुठे मुरतेय ? आधीच कोरोनाच्या भीतीच्या सावटाखाली नागरिक आहेत. त्यात पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे क्षारयुक्त पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

म्हसवड पालिका सत्ताधारी मंडळींच्या दुर्लक्षामुळे शहरातील व पालिका हद्दीतील नागरिकांना, सर्व फिल्टरची यंत्रणा असूनही बिगरफिल्टरचे पाणी पालिका गत अनेक महिन्यांपासून देत असल्याने नागरिकांना उलट्या, जुलाब मुतखडा असे पोटाचे अनेक आजार होऊ लागले आहेत. याकडे पालिका प्रशासन व सत्ताधारी मंडळी डोळेझाक करीत असल्याने, शहरातील नागरिकांचे मात्र आरोग्य बिघडत चालले आहे. म्हसवड पालिका हद्दीतील नागरिकांना माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथील साठवण तलावातून पाणीपुरवठा केला जाते? असून या पाण्याचे फिल्टरेशन पाॅईंटवर कारखेल (ता. माण) येथे केले जाते. पण या योजनेचे पाणी नागरिकांना गत अनेक महिन्यांपासून मिळत नाही. सध्या कुठले तरी विहिरीचे पाणी सोडले जातेय. तेही फिल्टर केलेले नाही. बिगरफिल्टरचे पाणी पिल्यामुळे नागरिकांना अनेक आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागत आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले, निरोगी राहण्यासाठी पालिकेने क्षारमुक्त पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शहरवासीय करीत आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा धोका, त्यात क्षारयुक्त पाणी यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दरम्यान, शहरातील जुना पोस्ट परिसर ते नवी पेठ रस्त्याच्या दोन्ही बाजू दीड महिन्यापूर्वीपासून गटार बांधकामासाठी संबंधित ठेकेदाराने जेसीबीच्या साहाय्याने खोदल्या असून हे काम करीत असताना येथील रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याच्या नळ कनेक्शनच्या पाईपलाईन उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्या पाईपमध्ये गटारीचे पाणी जात असल्याने या भागातील नागरिक दीड महिन्यापासून गटारीचे दुर्गंधीयुक्त मिसळलेले पाणी नळाद्वारे भरत आहेत. याचे सोयरसुतक ना ठेकेदाराला ना पालिकेला. तरी याकडे पालिकेने वेळीच लक्ष द्यावे. अन्यथा या भागातील नागरिकांच्या उग्र रोषाला पालिका प्रशासनाला सामोरे जावे लागेल.