शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

कृषी उत्पादन वाढीमध्ये यांत्रिकीकरणाचा महत्त्वाचा वाटा : शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:26 IST

नागठाणे : ‘बदलते हवामान, बाजारपेठेतील मागणी, मजूर टंचाई, कामाची गुणवत्ता या गोष्टींचा शेती उत्पादनातील यशावर परिणाम होत आहे. शेती ...

नागठाणे : ‘बदलते हवामान, बाजारपेठेतील मागणी, मजूर टंचाई, कामाची गुणवत्ता या गोष्टींचा शेती उत्पादनातील यशावर परिणाम होत आहे. शेती किफायतशीर होण्यासाठी यांत्रिकीकरणाची नितांत आवश्यकता आहे,’ असे मत शास्त्रज्ञ प्रा. मोहन शिर्के यांनी व्यक्त केले.

बोरगाव येथील कृषी विज्ञान केंद्रात आधुनिक ‘शेतीसाठी यांत्रिकीकरणाची गरज’ याविषयी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी कृषी विज्ञान केंद्रामार्फत यांत्रिकीकरणामध्ये सातत्याने नवनवीन प्रयोग करणारे व विविध फवारणी व पेरणी यंत्र विकसित करणारे प्रगतिशील शेतकरी सतीश काटकर यांचा गौरव करण्यात आला. काटकर यांच्या यांत्रिकीकरणातील कार्याची नोंद घेऊन त्यांना पुणे व गुजरात येथील कंपनींकडून दोन आधुनिक पेरणी यंत्रे भेट देण्यात आली.

कार्यक्रमात प्रा. भूषण यादगीरवार यांनी हुमणी कीड नियंत्रणाविषयी मार्गदर्शन केले. प्रा. सागर सकट यांनी गोड्या पाण्यातील मत्स्यसंवर्धन याविषयी व प्रा. संग्राम पाटील यांनी सोयाबीन लागवड तंत्रज्ञानविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थित शेतकऱ्यांना जलशक्ती अभियानांतर्गत लिंबूच्या रोपांचे वाटप जावळवाडीचे सरपंच सूर्यवंशी व इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. महेश बाबर यांनी आभार मानले.