शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

स्ट्रॉबेरीला दिसतेय माया; पण आभाळाची छाया!

By admin | Updated: November 12, 2014 23:30 IST

शेतकऱ्यांची स्थिती : उत्पादन सुरू ; २०० रुपयांहून अधिक मिळतोय दर

संजीव वरे - वाई -संपूर्ण देश-विदेशातून वाई-पाचगणी व महाबळेश्वर या ठिकाणी फिरावयास येणाऱ्या पर्यटकांचे मुख्य आकर्षण व मागणी असणाऱ्या ‘स्ट्रॉबेरी’च्या फळांचे उत्पादन सुरू आहे. बाजारपेठेत ‘स्ट्रॉबेरीच्या’ फळांची आवक वाढली आहे. सध्या बाजारपेठेत चांगला दर असून, ढगाळ व दूषित हवामानाने शेतकरी मात्र चिंतेत आहे. दरम्यान, स्ट्रॉबेरीचा किलोचा दर २०० ते ३०० रुपये किलो झाला आहे.जगभरातून वाई-पाचगणी आणि महाबळेश्वरला फिरावयास लाखो पर्यटक येत असतात. येथील निसर्गसौंदर्य, हिरवेगार डोंगर, आकाशाला भिडणारे उंच सह्याद्री पर्वत व डोंगर दऱ्या, दाट झाडी व थंड हवामानाचा मनमुराद आनंद लुटतात. येथील प्रसिद्ध ओळख असणाऱ्या ‘स्ट्रॉबेरीच्या’ फळांना पर्यटकाकडून मोठी मागणी असते. काही वर्षांपूर्वी ‘स्ट्रॉबेरी’ ही महाबळेश्वर परिसरात मुख्य पीक म्हणून शेतकरी पिकवत असत. कालांतराने व शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाने व नवनव्या प्रयोगाने स्ट्रॉबेरीची लागवड व उत्पादन सगळीकडे होऊ लागले. हे एक आर्थिक मोठे उत्पादन देणारे पीक म्हणून शेतकरी मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी करू लागले आहेत.सध्या वाई व परिसरात स्ट्रॉबेरीच्या फळाचे उत्पादन चालू झाले आहे. त्याला दरही चांगला मिळत आहे. एक ट्रे ४०० रुपयांना तर शेतकऱ्यास २०० रुपये किलोपर्यंत दर मिळत आहे. मात्र ढगाळ व दूषित हवामानामुळे शेतकऱ्यांना औषध फवारणीचा खर्च वाढत आहे. महाबळेश्वर तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने रोपांच्या निर्मितीसाठी वाईच्या परिसरात त्याच्या मदर प्लांटची लागवड केली जाते व तयार झालेल्या रोपांची लागवड करतात. रोपे तयार झालेल्या ‘मदर प्लांट’ स्ट्रॉबेरीच्या झाडांना लवकर फळे येतात. या पिकातून शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न चांगले मिळते. परंतु रोपे परदेशातून येतात. उत्पादन चांगले ; खर्चही महत्वाचा...पाणी व्यवस्थापनासाठी ठिबक सिंचन व तुषार सिंचन. त्यानंतर फळांना माती लागू नये म्हणून मल्चिंगपेपर किमतीची औषधे व खते याचा वापर करावा लागतो. हवामानाचीही मोठी साथ लागते. अधिक उत्पादन देणारे पीक असले तरी त्याला उत्पादन खर्चही मोठा असतो.पाचगणी, महाबळेश्वर भागात स्ट्रॉबेरीचे पीक चांगले आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले आर्थिक उत्पन्न मिळेल अशी आशा आहे. पण, आता ढगाळ वातावरण निर्माण होत असल्याने चिंतेचे वातावरण आहे. धोंडिबा वाडकर, सटालेवाडी