शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
3
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
4
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
5
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
6
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
7
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
8
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
9
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
10
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
11
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
12
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
13
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
14
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
15
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
16
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
17
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?
18
India pakistan : दोन राज्यात पोलिसांच्या सुट्ट्या रद्द, शाळा बंद; राजस्थान, पंजाबमध्ये हायअलर्ट
19
चहा, डायपर ते सॅनिटायझिंग.. डाबर अनेक प्रॉडक्ट बंद करणार; सीईओंनी स्वतः सांगितलं कारण
20
Sophia Qureshi: बहीण असावी तर अशी! “मी तिच्याद्वारे माझं स्वप्न जगतेय”, कर्नल सोफिया यांचा कुटुंबीयांना अभिमान

माथाडी कामगारांना विमा संरक्षणासह आर्थिक पॅकेज जाहीर करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:38 IST

ढेबेवाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काही घटकांना आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. माथाडी कामगार व त्या संबंधित ...

ढेबेवाडी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने काही घटकांना आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. माथाडी कामगार व त्या संबंधित इतर कामगार मंडळांचे कामगारसुद्धा नोंदणीकृत कामगार आहेत. कोरोना व लाॅकडाऊनचा फटका त्यांनाही बसला आहे. त्यांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून राज्य शासनाने त्यांना विमा संरक्षणासह आर्थिक पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी राज्य माथाडी कामगार संघटनेचे सरचिटणीस माजी आमदार नरेंद्र पाटील यांनी केली आहे.

याबाबत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी राज्य शासनास दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, विविध बाजार समित्या, वाहतूक कंपन्या, रेल्वे माल धक्के, खत कारखाने, औषध कंपन्या, बृहन्मुंबई ठाणे, रायगड, पालघर व अन्य जिल्ह्यातील विविध व्यवसायांत जीवनावश्यक वस्तूंची, लोडिंग, अनलोडिंग, थापी, वाराई व त्या अनुषंगिक कष्टाची कामे शासनाच्या विविध माथाडी बोर्डात नोंदी असलेले माथाडी, वारणार, मापाडी, महिला कामगार करतात. कष्टाची कामे करणाऱ्या माथाडींनी काम केले तरच मजुरी मिळते. कष्टाच्या कामावर त्यांची उपजीविका अवलंबून आहे. हातावर पोट असलेला हा घटक आहे.

केंद्र व राज्य शासनाने कोरोना या संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी मार्च २०२० पासून सर्व ठिकाणी लॉकडाऊन जाहीर केला होता. त्या वेळी जनतेला जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी जीव मुठीत घेऊन मालाची चढ-उतार कामे करणाऱ्या या कामगारांना कोरोनाची बाधा होऊन काहींचा मृत्यू झाला. या सर्वांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करून संरक्षण देण्याची गरज आहे. मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबीयांना मदत करावी, अशी मागणी करूनही शासनाने दखल घेतली नाही. माथाडी बोर्डाने दिलेल्या ओळखपत्रावर रेल्वे, बस सेवा व इतर व्यवस्थेने प्रवास करण्यास माथाडी कामगारांना परवानगी मिळणे आवश्यक आहे.

शासनाने घरेलू कामगार व इतर घटकांना आर्थिक पॅकेज जाहीर केले. मात्र माथाडी कामगारांचा विचार केलेला नाही. काम मिळाल्याशिवाय मजुरी नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होणार आहे. कष्टाची कामे करून देशाच्या अर्थकारणाला मदत करणाऱ्या माथाडी कामगारांना डॉक्टर्स, पोलीस व इतर काही घटकांना अत्यावश्यक सेवेत समावेश करून ज्याप्रमाणे विमा कवच संरक्षण दिले आहे त्याप्रमाणे माथाडी कामगार व त्या संबंधित घटकांचाही अत्यावश्यक सेवेत समावेश करून त्यांनासुद्धा विमा संरक्षण आणि आर्थिक मदत द्यावी.