शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

बाजार समितीत पैलवानाची बाजी!

By admin | Updated: September 24, 2015 23:57 IST

कऱ्हाड बाजार समिती : वर्षभर कारभाराला संचालक राजी; गोळेश्वर, खराडेचे जाधव पडले भारी

कऱ्हाड : बाजार समितीच्या आखाड्यात पुन्हा एकदा जुन्या मुरब्बी पैलवानानेच बाजी मारली. गोळेश्वरचे पैलवान शिवाजीराव जाधव सभापती झाले, तर खराडेच्या आत्माराम जाधवांना उपसभापतिपदाची लॉटरी लागली. पण या निवडी वर्षभरासाठीच असून दरवर्षी नव्या लोकांना संधी देण्याचे ठरल्याची चर्चा उंडाळकर समर्थकांमध्ये आहे. सहा वर्षांपूर्वी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीने हिसकावून घेतलेली बाजार समिती माजी आमदार विलासराव पाटील उंडाळकरांनी पुन्हा ताब्यात घेतली. त्यासाठी भाजपचे युवा नेते डॉ. अतुल भोसले, उत्तरचे युवा नेते धैर्यशील कदम, मनोज घोरपडे आदींची त्यांना साथ लाभली. बाजार समितीतील सत्तांतरासाठी ‘उत्तर’ मतदारसंघानेही मोठा हातभार लावला. त्यामुळे सभापतिपदाची संधी कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्याला मिळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागू राहिले होते. दुसऱ्यांदा निवडून आलेल्या उत्तरेतील हिंदुराव चव्हाण यांच्या नावाची चर्चाही सुरू होती. निवडीमध्ये जुन्या-नव्यांचा अन् दक्षिण उत्तरचा मेळ उंडाळकरांनी घातल्याचे दिसतेय; पण सोमवारी प्रमुख नेते अन् संचालक मंडळातील सदस्यांची मते जाणून घेतल्यानंतर अनेकजण इच्छुक असल्याचे नेत्यांच्या लक्षात आले अन् वर्षाला नवे कारभारी देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे समजते; पण हे निश्चित झाल्यावरही पहिलं कोण, हा विषय समोर आला अन् गोळेश्वरच्या पैलवानांनी ‘पहिला माझा नंबर’ म्हणत बाजी मारली. त्यामुळे सभापतिपदाच्या रेसमध्ये असणाऱ्यांनी उपाध्यक्षपदाला नकार दिल्याने खराडेच्या जाधवांना अनपेक्षितपणे उपाध्यक्षपदाची लॉटरी लागली. सभापती, उपसभापतिपदी दोघेही ‘जाधव’ असले तरी उत्तर दक्षिणचा सत्तेचा समतोल राखण्यात आला आहे. उत्तर अन् दक्षिण विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक पद देऊन विलासराव पाटील-उंडाळकरांनी दोन्ही मतदार संघांवर आपली पकड बसविण्याचा प्रयत्न ठेवला आहे. दक्षिणेत भोसले गटाच्या मदतीने तर उत्तरेतील समर्थकांचे मनोधैर्य वाढेल, अशी खेळी करीत ते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व आमदार बाळासाहेब पाटील यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे निवडणुकीत पराभूत झालेल्या आघाडीला आता आत्मचिंतन करावे लागणार, हे निश्चित आहे. (प्रतिनिधी) बाजार समितीच्या सभापती, उपसभापतिपदी दरवर्षी नवीन पदाधिकारी निवडण्याचा निर्णय झाल्याने आता १८ पैकी सुमारे १० जणांना संधी मिळणार आहे. यापूर्वी एक अध्यक्ष पाच वर्षे कार्यकाल पूर्ण करीत होता; पण आता इच्छुकांची संख्या वाढल्याने नेत्यांनाही सबुरीने घ्यावे लागत आहे.जिल्हा परिषद अन् पंचायत समिती डोळ्यासमोर...जिल्हा मध्यवर्ती बँक, कृष्णा साखर कारखाना व शेती उत्पन्न बाजार समिती या तीन निवडणुकीत विजयाची हॅट्ट्रिक मारलेल्या उंडाळकरांची आता चौकार मारण्याची तयारी सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उंडाळकर गट चाल खेळत आहे. आजच्या निवडी हा त्याचाच भाग असून भविष्यातील निवडीही त्यांच्या अभ्यासानेच असतील, असे कार्यकर्ते बोलत आहेत. सोमवारीच निर्णय मंगळवारी शिक्कामोर्तबखरंतर सभापती, उपसभापतिपदी दोन जाधवांची निवड करण्याचा निर्णय सोमवारी रात्रीच उंडाळकरांच्या घरी झालेल्या बैठकीत झाला होता. त्यामुळे मंगळवारी सकाळी फक्त त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले एवढेच.