शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वाई तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क खिळखिळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:45 IST

वेळे : वाई तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांना प्रचंड त्रास सहन करावा ...

वेळे : वाई तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्षांपासूनची परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस खराब होत आहे.

यामध्ये वेळे-भिलारेवाडी, सुरुर-मोहोडेकरवाडी, सुरुर-वहागाव, कवठे-वाई, उडतरे-कुडाळ आदी मुख्य रस्त्यांचा समावेश आहे.

या गावांना जोडणारे मुख्य रस्ते अतिशय खराब झाले असून, या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पूर्वी डांबरी असणारे रस्ते मातीमय झाले आहेत. अनेक वर्षांपासून हीच दयनीय अवस्था सहन करीत येथील स्थानिक रस्ता होण्याची नुसती वाटच बघत आहेत. त्यांची ही आशा कधी पूर्ण होणार? ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे प्रत्येक गावांच्या रक्तवाहिन्या होत, परंतु याच रक्तवाहिन्या व्यवस्थित नसतील तर या गावांची दशा अत्यंत बिकट होते. याचा अनुभव येथील रहिवाशांना नक्कीच येत असेल.

यातील काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभाग तर काही रस्ते जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात. वेळे-भिलारेवाडी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात आलेला आहे.

वेळे-भिलारेवाडीचा अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २०१९ मध्ये मंजूर झाला. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा कालावधी जानेवारी २०२० मध्ये संपला; मात्र कासवगतीने सुरू असलेले हे काम तीन वर्षे होऊनही पूर्ण होत नाही. या रस्त्यावर साधी खडीही पडलेली नाही, मग डांबरीकरण कधी होईल? गेल्या तीन वर्षांपासून येथील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना विविध प्रकारच्या आजारांनी सतावले आहे. रस्त्यावरून जाताना गाडीत बसले तरी हाडे खिळखिळी होत आहेत, तर गाडीची अवस्था कशी होईल? त्यामुळे येथील रहिवाशांना शारीरिक, मानसिक व्याधींनी ग्रासले आहे. त्याबरोबरच आर्थिक भुर्दंड त्यांना सहन करावा लागत आहे. धुळीमुळे घरांत धुळीचे कण जमा होऊन श्वसनाचे आजार जडत आहेत. तीन वर्षांपूर्वी सध्यापेक्षा कितीतरी चांगला रस्ता होता. या रस्त्याची चाळण झाली आहे. संबंधित ठेकेदाराने हा रस्ता वेळेत पूर्ण केला नाही. त्यामुळे लोकांना याचा नाहक फटका बसत आहे. या रस्त्यावरून दररोज शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी, कामगार असे अनेकजण प्रवास करीत असतात. त्यातच रात्रपाळी करणाऱ्या नोकरदारांना दुचाकीवरून जाताना अनेकदा भय वाटते. या रस्त्याच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी गाड्या घसरून अपघात देखील झाले आहेत.

कोट

वेळे-भिलारेवाडी हा अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण करण्यास तीन वर्षेही पुरत नसतील तर यापेक्षा दुर्दैव ते काय? मुदत संपून देखील या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे लोकांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

- रोहिणी भिलारे, ग्रामपंचायत सदस्या

कोट २

दररोजच्या कामासाठी बाहेर जावे लागते. त्यामुळे दुचाकीचा वापर करावा लागतो. रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे अनेकदा गाडी घसरण्याची शक्यता वाढतच आहे. तसेच रस्त्यामुळे वेळही वाढत आहे आणि आर्थिक भुर्दंड देखील बसत आहे. संबंधित विभागाने हा रस्ता पूर्णत्वास न्यावा.

- गणेश भिलारे, नोकरदार

चौकट :

वाई तालुक्यातील अनेक गावांच्या रस्त्यांची समस्या ही खूप वर्षांपासून आहे. बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच संबंधित इतर विभागांनी याकडे विशेष लक्ष देऊनही कामे पूर्णत्वास नेणे आवश्यक आहे. खराब रस्त्यांमुळे होणारे नुकसान लोकांना आता परवडणारे नाही.

फोटो २८वेळे

सुरुर-मोहोडेकरवाडी रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून खडी बाहेर आली आहे. त्यामुळे दुचाकी घसरण्याच्या घटनांवर वाढ झाली आहे. (छाया : अभिनव पवार)