शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
5
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
6
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
7
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
8
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
9
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
10
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
11
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
12
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
13
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
14
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
15
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
16
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
17
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
18
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
19
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 
20
भारताला 'मृत अर्थव्यवस्था' म्हणणाऱ्या ट्रम्प यांची मोठी गुंतवणूक; दरमहा होते कोट्यवधीची कमाई...

वाई तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क खिळखिळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:45 IST

वेळे : वाई तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांना प्रचंड त्रास सहन करावा ...

वेळे : वाई तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते पूर्णपणे उखडले आहेत. त्यामुळे तेथील स्थानिक लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेक वर्षांपासूनची परिस्थिती सुधारण्याऐवजी दिवसेंदिवस खराब होत आहे.

यामध्ये वेळे-भिलारेवाडी, सुरुर-मोहोडेकरवाडी, सुरुर-वहागाव, कवठे-वाई, उडतरे-कुडाळ आदी मुख्य रस्त्यांचा समावेश आहे.

या गावांना जोडणारे मुख्य रस्ते अतिशय खराब झाले असून, या रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. पूर्वी डांबरी असणारे रस्ते मातीमय झाले आहेत. अनेक वर्षांपासून हीच दयनीय अवस्था सहन करीत येथील स्थानिक रस्ता होण्याची नुसती वाटच बघत आहेत. त्यांची ही आशा कधी पूर्ण होणार? ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे प्रत्येक गावांच्या रक्तवाहिन्या होत, परंतु याच रक्तवाहिन्या व्यवस्थित नसतील तर या गावांची दशा अत्यंत बिकट होते. याचा अनुभव येथील रहिवाशांना नक्कीच येत असेल.

यातील काही रस्ते हे सार्वजनिक बांधकाम विभाग तर काही रस्ते जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येतात. वेळे-भिलारेवाडी रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून मंजूर करण्यात आलेला आहे.

वेळे-भिलारेवाडीचा अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २०१९ मध्ये मंजूर झाला. या रस्त्याचे काम पूर्ण करण्याचा कालावधी जानेवारी २०२० मध्ये संपला; मात्र कासवगतीने सुरू असलेले हे काम तीन वर्षे होऊनही पूर्ण होत नाही. या रस्त्यावर साधी खडीही पडलेली नाही, मग डांबरीकरण कधी होईल? गेल्या तीन वर्षांपासून येथील लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. अनेकांना विविध प्रकारच्या आजारांनी सतावले आहे. रस्त्यावरून जाताना गाडीत बसले तरी हाडे खिळखिळी होत आहेत, तर गाडीची अवस्था कशी होईल? त्यामुळे येथील रहिवाशांना शारीरिक, मानसिक व्याधींनी ग्रासले आहे. त्याबरोबरच आर्थिक भुर्दंड त्यांना सहन करावा लागत आहे. धुळीमुळे घरांत धुळीचे कण जमा होऊन श्वसनाचे आजार जडत आहेत. तीन वर्षांपूर्वी सध्यापेक्षा कितीतरी चांगला रस्ता होता. या रस्त्याची चाळण झाली आहे. संबंधित ठेकेदाराने हा रस्ता वेळेत पूर्ण केला नाही. त्यामुळे लोकांना याचा नाहक फटका बसत आहे. या रस्त्यावरून दररोज शेतकरी, नोकरदार, विद्यार्थी, कामगार असे अनेकजण प्रवास करीत असतात. त्यातच रात्रपाळी करणाऱ्या नोकरदारांना दुचाकीवरून जाताना अनेकदा भय वाटते. या रस्त्याच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे अनेक ठिकाणी गाड्या घसरून अपघात देखील झाले आहेत.

कोट

वेळे-भिलारेवाडी हा अडीच किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण करण्यास तीन वर्षेही पुरत नसतील तर यापेक्षा दुर्दैव ते काय? मुदत संपून देखील या रस्त्याचे काम अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे लोकांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

- रोहिणी भिलारे, ग्रामपंचायत सदस्या

कोट २

दररोजच्या कामासाठी बाहेर जावे लागते. त्यामुळे दुचाकीचा वापर करावा लागतो. रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे अनेकदा गाडी घसरण्याची शक्यता वाढतच आहे. तसेच रस्त्यामुळे वेळही वाढत आहे आणि आर्थिक भुर्दंड देखील बसत आहे. संबंधित विभागाने हा रस्ता पूर्णत्वास न्यावा.

- गणेश भिलारे, नोकरदार

चौकट :

वाई तालुक्यातील अनेक गावांच्या रस्त्यांची समस्या ही खूप वर्षांपासून आहे. बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच संबंधित इतर विभागांनी याकडे विशेष लक्ष देऊनही कामे पूर्णत्वास नेणे आवश्यक आहे. खराब रस्त्यांमुळे होणारे नुकसान लोकांना आता परवडणारे नाही.

फोटो २८वेळे

सुरुर-मोहोडेकरवाडी रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून खडी बाहेर आली आहे. त्यामुळे दुचाकी घसरण्याच्या घटनांवर वाढ झाली आहे. (छाया : अभिनव पवार)