शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

दूषित पाणीपुरवठा झाल्याने अनेकांना जुलाबाचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:39 IST

सणबूर : पाचुपतेवाडी, ता. पाटण येथे चार दिवस नदीकाठी असणाऱ्या विहिरीत, बंधाऱ्यात साचलेले व पावसामुळे पुराचे पाणी गेल्याने दूषित ...

सणबूर : पाचुपतेवाडी, ता. पाटण येथे चार दिवस नदीकाठी असणाऱ्या विहिरीत, बंधाऱ्यात साचलेले व पावसामुळे पुराचे पाणी गेल्याने दूषित पाणीपुरवठा झाला. हे पाणी प्यायल्यामुळे अनेकांना जुलाबाचा त्रास झाला आहे. सध्या कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. याबाबत मालदन येथील बंधाऱ्यातील पाणी सोडावे, अशी मागणी कृष्णाखोरे महामंडळाकडे केली आहे; पण दुर्लक्ष होत आहे, असा आरोप सरपंच आत्माराम पाचुपते यांनी केला आहे.

पाचुपते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, पाचुपतेवाडी (ता. पाटण)ची नळ पाणीपुरवठा योजना ढेबेवाडीजवळील वांग नदीच्या संगमापासून काही अंतरावर वरच्या बाजूस आहे. नदीच्या संगमाच्या खालच्या बाजूला मालदन गावाजवळच बंधारा आहे. बंधाऱ्याची दारे बंद केल्यानंतर पाण्याची फुगी संगम पुलाच्या मागे दूरपर्यंत जात असते. पाचुपतेवाडी नळ पाणीपुरवठा विहिरीदरम्यान ही फुगी येत असते. चार दिवसांपासून दररोज दुपारी जोरदार पाऊस होत असून, यामुळे वांग नदीला पूर येत आहे. पाणी वाहते नसल्याने मृत आहे. या परिस्थितीमुळे बंधाऱ्यातील पाण्याची फुगी वाढून हे पाणी विहिरीत गेले असून, पाचुपतेवाडीला चार दिवस दूषित पाणीपुरवठा झाला आहे. ग्रामस्थांनी हेच दूषित पाणी प्यायल्यामुळे काहींना जुलाबाचा त्रास झाला आहे. बांधाऱ्याची दारे खुली असती तर हे पाणी विहिरीत गेले नसते व याचा त्रास लोकांना झाला नसता. कृष्णा खोरे विकास महामंडळाने बांधाऱ्यातील पाणी सोडावे, अशी आम्ही मागणी केली आहे, मात्र याकडे दुर्लक्ष केले आहेत. यामुळे गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.