शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील प्रमुख सहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी चार महिने पाऊस झाल्याने तलाव, धरणे भरली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख सहा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी चार महिने पाऊस झाल्याने तलाव, धरणे भरली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांमध्ये १२२.१३ टीएमसी इतका पाणीसाठा आहे तर कोयना धरणात जवळपास ८६ टीएमसी म्हणजेच ८१.६८ टक्के साठा आहे. त्याचबरोबर सध्या काही धरणांमधून सिंचनासाठीही विसर्ग सुरू आहे. पण, अजूनही मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी सुरू नाही.

जिल्ह्यात २०१९मध्ये पाच महिने पाऊस झाला होता. त्या तुलनेत गेल्यावर्षीही चांगला पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यापासून सतत पाऊस पडत होता. त्यामुळे धरणांमध्येही वेगाने पाणीसाठा वाढू लागला. पश्चिम भागात तर काही दिवस धुवाँधार पाऊस पडला. यामुळे कोयना, धोम, बलकवडी, उरमोडी, कण्हेर, तारळीसारख्या धरणात वेगाने पाणीसाठा वाढला. त्यातच पाऊस सुरू असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला होता.

जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी या प्रमख सहा धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सद्यस्थितीत या धरणांमध्ये १२२.१३ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. अजूनही धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यातच सिंचनासाठी रोटेशनप्रमाणे काही धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे.

जिल्ह्यातील बलकवडी धरणातून सिंचनासाठी ३३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कण्हेर धरणातूनही २०० क्युसेक पाणी पिकांसाठी सोडले जात आहे. तसेच कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

रब्बी हंगामातील पिकांना अजूनही धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत नाही. काही धरणांतून सिंचनासाठी पहिले आवर्तन झाले आहे. आगामी काळात मागणी आणि रोटेशनप्रमाणे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे तर महत्वाच्या ठरणाऱ्या कोयना धरणात अजूनही चांगला पाणीसाठा आहे.

चौकट :

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

धरणे यावर्षी टक्केवारी एकूण क्षमता

धोम ११.३३ ८३.९४ १३.५०

कण्हेर ७.२४ ७१.७० १०.१०

कोयना ८५.९७ ८१.६८ १०५.२५

बलकवडी २.९० ७१.१४ ४.०८

उरमोडी ९.६५ ९६.८९ ९.९६

तारळी ५.०४ ८६.१९ ५.८५

...........................................................