शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: उद्योगपती नुस्ली वाडिया यांच्यासह कुटुंबावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
2
"भारतासोबतचे संबंध महत्त्वाचे, आशा आहे की..."; अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री रुबियोंनी दिले टॅरिफ कमी करण्याचे संकेत
3
Rapido मुळे अचानक Swiggy कडे आले २४०० कोटी रुपये, नक्की काय आहे प्रकरण?
4
चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
5
Dussehra 2025: दसऱ्याला गुपचूप करा 'हे' धनप्राप्तीचे उपाय; कुबेर महाराज होतील प्रसन्न
6
भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी अचानक गरजला! अंदमानमध्ये भूकंपाचा धक्का जाणवला
7
घरी रोख रक्कम ठेवण्याची मर्यादा किती? जाणून घ्या आयकर विभागाचा महत्त्वाचा नियम
8
एच-१बी व्हिसा धोरणावर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ३६ तासांतच यू-टर्न का घेतला? 
9
सकाळ सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार करमाळ्यात; पूरग्रस्त भागाची पाहणी सुरू
10
ग्राहकांची झुंबड! वाहनांच्या विक्रीने नवा उच्चांक गाठला; कोणत्या क्षेत्रांना किती होणार फायदा?
11
सोलापुरातील महापुराचा रेल्वे वाहतुकीला फटका; वंदे भारत, सिद्धेश्वर एक्सप्रेसला उशिरा, अनेक गाड्या सोलापूर विभागात थांबविल्या
12
UPI EMI: आता UPI पेमेंट करताना EMI चा पर्याय निवडता येणार; NPCI आणणार नवी सुविधा
13
रोज-रोज चटणी भात... पतीने केली चिकनची मागणी; पत्नीने नकार देताच उचलले टोकाचे पाऊल!
14
"अवामवर बॉम्बस्फोट करुन वेळ मिळाला तर...", भारताच्या क्षितिज त्यागी यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानला सुनावले
15
शेअर बाजार पुन्हा घसरला, सेन्सेक्स १४७ अंकांनी आपटला; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
16
Online Shopping Tips: ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
17
Post Office Scheme: बँक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
18
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
19
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
20
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी

जिल्ह्यातील प्रमुख सहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी चार महिने पाऊस झाल्याने तलाव, धरणे भरली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख सहा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : जिल्ह्यात गेल्यावर्षी चार महिने पाऊस झाल्याने तलाव, धरणे भरली. सद्यस्थितीत जिल्ह्यातील प्रमुख सहा धरणांमध्ये १२२.१३ टीएमसी इतका पाणीसाठा आहे तर कोयना धरणात जवळपास ८६ टीएमसी म्हणजेच ८१.६८ टक्के साठा आहे. त्याचबरोबर सध्या काही धरणांमधून सिंचनासाठीही विसर्ग सुरू आहे. पण, अजूनही मोठ्या प्रमाणात सिंचनासाठी पाणी सुरू नाही.

जिल्ह्यात २०१९मध्ये पाच महिने पाऊस झाला होता. त्या तुलनेत गेल्यावर्षीही चांगला पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यापासून सतत पाऊस पडत होता. त्यामुळे धरणांमध्येही वेगाने पाणीसाठा वाढू लागला. पश्चिम भागात तर काही दिवस धुवाँधार पाऊस पडला. यामुळे कोयना, धोम, बलकवडी, उरमोडी, कण्हेर, तारळीसारख्या धरणात वेगाने पाणीसाठा वाढला. त्यातच पाऊस सुरू असल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी धरणांमधून विसर्ग सुरू करण्यात आला होता.

जिल्ह्यात कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, उरमोडी आणि तारळी या प्रमख सहा धरणांची पाणी साठवण क्षमता १४८.७४ टीएमसी आहे. सद्यस्थितीत या धरणांमध्ये १२२.१३ टीएमसी इतका पाणीसाठा आहे. अजूनही धरणात मोठ्या प्रमाणात पाणी आहे. त्यातच सिंचनासाठी रोटेशनप्रमाणे काही धरणांमधून पाणी सोडण्यात येत आहे.

जिल्ह्यातील बलकवडी धरणातून सिंचनासाठी ३३८ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर कण्हेर धरणातूनही २०० क्युसेक पाणी पिकांसाठी सोडले जात आहे. तसेच कोयना धरणाच्या पायथा वीजगृहातून १०५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

रब्बी हंगामातील पिकांना अजूनही धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात येत नाही. काही धरणांतून सिंचनासाठी पहिले आवर्तन झाले आहे. आगामी काळात मागणी आणि रोटेशनप्रमाणे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येणार आहे तर महत्वाच्या ठरणाऱ्या कोयना धरणात अजूनही चांगला पाणीसाठा आहे.

चौकट :

सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांतील पाणीसाठा (टीएमसीमध्ये)

धरणे यावर्षी टक्केवारी एकूण क्षमता

धोम ११.३३ ८३.९४ १३.५०

कण्हेर ७.२४ ७१.७० १०.१०

कोयना ८५.९७ ८१.६८ १०५.२५

बलकवडी २.९० ७१.१४ ४.०८

उरमोडी ९.६५ ९६.८९ ९.९६

तारळी ५.०४ ८६.१९ ५.८५

...........................................................