शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

प्रमुख बँकांना उद्या कडक पोलिस बंदोबस्त

By admin | Updated: November 9, 2016 22:56 IST

अश्विन मुदगल : आपली बँक व्यवस्था सक्षम; ३0 डिसेंबरपर्यंत बँक, पोस्ट कार्यालयात पैसे जमा करण्याचे आवाहन

 सातारा : ‘पाचशे व हजार रुपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा ऐतिहासिक निर्णय सरकारने घेतला आहे. सर्वसामान्य जनतेला या निर्णयामुळे काही दिवस थोडी तसदी सोसावी लागणार असली तरी कोणाच्याही भूलथापांवर विश्वास न ठेवता आपल्याकडच्या पाचशे व हजारांच्या नोटा बँका, पोस्ट कार्यालयांतच जमा करा. यासाठी ३० डिसेंबर ही अंतिम मुदत आहे,’ असे आवाहन जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी जिल्हावासीयांना केले आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी तत्काळ जिल्ह्यातील प्रमुख बँकर्स, पेट्रोल पंप असोसिएशन, व्यापारी असोसिएशन तसेच विभाग प्रमुखांची तातडीची बैठक बुधवारी घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख, पोलिस अधीक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी भारत वाघमारे, अग्रणी जिल्हा बँक व्यवस्थापक महादेव शिरोळकर, बँक आॅफ महाराष्ट्रचे अंचल प्रबंधक अहिलाजी थोरात, स्टेट बँक आॅफ इंडियाचे प्रबंधक राजीव प्रसाद, आयडीबीआय बँकेचे प्रबंधक अनिल गोडबोले, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र रुणवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीकांत भोई आदींसह प्रमुख बँकर्स उपस्थित होते. या बैठकीमध्ये विविध पर्यायांबाबत चर्चा करण्यात आली. पेट्रोल पंप, औषध विक्री दुकाने या ठिकाणी जनतेला वेठीस धरण्यात येऊ नये, त्यांच्या गरजा भागवाव्यात. गुरुवारपासून बँका व पोस्ट कार्यालयांमधून नोटांची बदली अथवा भरणा सुरू करण्यात येणार आहे. बँक ग्राहकांना दोन हजार रुपयांची मर्यादित रक्कम गरजेपुरती काढता येईल. जिल्ह्यामध्ये राष्ट्रीयकृत तसेच सहकारी बँकांचे मोठे जाळे आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यात कुठेही ५०० किंवा १००० च्या नोटा बदलताना अडचण येणार नाही. पेट्रोल पंप चालकांनी ग्राहकांना सहकार्य करावे. ५०० रुपयांच्या नोटा या ठिकाणी घेता येणार असल्याने त्यांनी तसा फलक आपल्या पंपावर लावावा. बँकांना १००, ५०, २०, १० अशा नोटा उपलब्ध झाल्यानंतर कोणतीही अडचण येणार नाही. ज्या बँकांच्या शाखा जिल्ह्यात सर्वदूर आहेत, तेथील शाखांमध्ये सुट्या पैशांची अडचण भासू देऊ नका, अशा सूचना बँक अधिकाऱ्यांना करण्यात आल्या. दरम्यान, सातारा जिल्ह्यात जनधन योजनेच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाने ९८ टक्के लोकांची खाती काढली आहेत. या खात्यांमध्ये लोकांना ५०० व १००० च्या नोटा जमा करता येतील. तसेच बँकांमधील सेव्हिंग, करंट खात्यांमध्येही पैसे जमा करता येणार आहेत. ५० दिवसांची यासाठी मुभा असल्याने नागरिकांनी गोंधळून जाऊ नये, गोंधळलेल्या परिस्थितीत काही समाजविघातक मंडळी पैसे बदलून देतो, अशी फसवणूक करण्याची शक्यता आहे. अशा भूलथापांना कोणीही बळी पडू नये. शासनाने काळा पैसा जमा करणाऱ्यांवर या माध्यमातून चाप बसवला असून, याचे दूरगामी परिणाम आपल्या सर्वांना काही दिवसांत जाणवतील. त्यामुळे या निर्णयाचे आपण सर्वांनीच समर्थन करायला हवे, असेही जिल्हाधिकारी मुदगल यांनी स्पष्ट केले. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आपल्या शाखांमार्फत ग्रामीण भागामध्ये सर्वसामान्य माणूस हाच प्रथम प्राधान्य ठेवून उद्या व्यवहार करावेत, असे सांगून निवासी उपजिल्हाधिकारी वाघमारे म्हणाले, ‘बँकर्स आणि नागरिक यांनी कोणतीही