शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात युवकांना रोजगाराची मोठी संधी

By admin | Updated: October 8, 2015 21:49 IST

सुभाष देसाई : मास औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी उद्योगमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास

सातारा : ‘परदेशी कंपन्यांना महाराष्ट्रात येण्यासाठी शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. काही परदेशी कंपन्या महाराष्ट्रात येणार असून, मोठी गुंतवणूक होण्याची शक्यता असल्याने महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत,’ असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी साताऱ्यात व्यक्त केला. येथील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन आॅफ सातारातर्फे आयोजित औद्योगिक प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार प्रभाकर घार्गे, लघुउद्योग संस्थेचे संचालक आर.बी. गुप्ता, मासचे अध्यक्ष दिलीप उटकूर, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, नितीन बानुगडे-पाटील, जे. डी. महाजन, एस. के. कुलकर्णी आदी उपस्थित होते.सातारा हे उद्योगांसाठी महत्त्वाचे केंद्र असल्याचे सांगून देसाई म्हणाले, ‘उद्योजकांसाठी साताऱ्यात मोठी संधी आहे. येथील जमीनमालक उद्योगांसाठी जमिनी देण्यास तयार असून, येथे पाणीही मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. उद्योग क्षेत्रात लघुउद्योगाला फार महत्त्वाचे स्थान आहे.’लघू उद्योगांपासून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे, असे सांगून देसाई म्हणाले, ‘हा लघू उद्योग देशात तसेच राज्यात विखुरलेला आहे. मोठा उद्योग आपल्या जिल्ह्यात आला तर लघू उद्योगांनाही मोठी संधी उपलब्ध होते. येथील जिल्हा उद्योग केंद्रात सूक्ष्म, लघू उद्योगांसाठी आॅनलाईन नोंदणीची सेवा सुरू केली आहे. याचा जास्तीत जास्त सूक्ष्म व लघू उद्योजकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.यावेळी आमदार प्रभाकर घार्गे म्हणाले, ‘सातारा एमआयडीसी १९७०-७१ सालची आहे. या सातारा एमआयडीसीमध्ये भूखंड उपलब्ध नाही, ही उद्योगांसाठी अडचणीची बाब ठरणार आहे. यासाठी पुसेगाव, गोपूज येथील एमआयडीसीचे प्रस्ताव मार्गी लावावेत. तसेच एमआयडीसीसाठी खास अग्निशामक दलाची व्यवस्था करावी व पोलीस ठाण्याचा प्रश्नही मार्गी लावावा.यावेळी लघुउद्योग संस्थेचे संचालक आर. बी. गुप्ता, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, एस. के. कुलकर्णी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमानंतर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मास भवन येथील औद्योगिक प्रदर्शन -२०१५ चे उद्घाटन स्टॉलची फित कापून करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक ‘मास’चे अध्यक्ष दिलीप उटकूर यांनी केले. अजित बारटक्के यांनी आभार मानले. यावेळी उद्योजक, स्टॉलधारक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)बंद उद्योगांच्या भूखंडांवर शासनाचा ताबाएमआयडीसी क्षेत्रातील भूखंड उद्योजकांना देण्यात आले आहेत. कित्येक वर्षे झाले तरी काही उद्योजकांनी घेतलेल्या भूखंडांवर उद्योग सुरू केले नाहीत, अशा उद्योजकांना नोटिसा देऊन भूखंड ताब्यात घेण्याचे काम सुरू असून, आत्तापर्यंत असे १ हजार ७०० भूखंड शासनाने परत घेतलेले आहेत.