शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

महादरेचे जंगल लवकरच फुलपाखरू संवर्धन राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : बिबट्या, गवे, रानडुकरे, मोर, गरुड, आदी पशुपक्ष्यांचा मुक्त संचार असलेले, सातारा शहराच्या हद्दीवर असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : बिबट्या, गवे, रानडुकरे, मोर, गरुड, आदी पशुपक्ष्यांचा मुक्त संचार असलेले, सातारा शहराच्या हद्दीवर असलेल्या महादरेच्या जंगलाला फुलपाखरू संवर्धन राखीवचा दर्जा मिळणार आहे. किर्रर्र जंगलात पक्ष्यांच्या किलबिलाटात निसरड्या पायवाटा तुडवत जंगल भ्रमंती अनुभवण्याची संधी निसर्ग पर्यटकांना यानिमित्ताने चालून आली आहे. त्याचबरोबर स्थानिकांना गावातच रोजगाराचे साधनही उपलब्ध होणार आहे.

कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेट बेन यांनी या अनुषंगाने वनभवनात अधिकारी व निवडक नागरिकांची बैठक घेऊन महादरे फुलपाखरू संवर्धन राखीवचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले.

पश्चिम घाट आणि पूर्वेकडील दख्खनचे पठार यांना सांधणारा प्रदेश म्हणून महादरेच्या जंगलाची ओळख आहे. त्यामुळे महादरेमध्ये पश्चिम घाट व दख्खनच्या पठारातील दोन्ही प्रकारच्या जैवविविधता यांचा मिलाफ पाहायला मिळतो.

माजी मानद वन्यजीवरक्षक व फुलपाखरांचे अभ्यासक सुनील भोईटे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘पश्चिम घाटात ३६० प्रजातींची फुलपाखरे आढळतात. त्यापैकी १६० प्रजाती एकट्या महादरेमध्ये पाहायला मिळतात. यातील ऑर्किड टिट आणि व्हाईट टिप्ड लाईन ब्ल्यू ही दोन फुलपाखरू परिशिष्ट १ (शेड्युल १) मध्ये गणली जातात. वाघाचा परिशिष्ट १ मध्ये समावेश आहे. ही दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरं वाघाच्या पंगतीत जाऊन बसली आहेत. प्राधान्यक्रमाने ज्या वनस्पती अगर वन्यजीव जपण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी विविध परिशिष्टांची रचना करण्यात आली आहे. एक प्रकारे त्यांना संरक्षित दर्जा देण्यात आला. परिशिष्ट एकमधील २ व परिशिष्ट तीन व चार मधील १६ फुलपाखरं एकट्या महादरेत आढळतात.

जैवविविधतेच्या अंगाने महादरेसारख्या प्रदेशास प्रेशर झोन किंवा दबावक्षेत्र असेही संबोधले जाते. वेगवेगळे अधिवास एकत्र नांदत असताना त्याचा दबाव या क्षेत्रावर असतो. हा दबाव सहन करण्याची क्षमता त्या जागेवर असते. त्यामुळे ती जागा पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजली जाते. मानवी हस्तक्षेप झाल्यास तेथील जैवविविधता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे महादरेच्या जंगलाला पर्यावरणीयदृष्ट्या वेगळे महत्त्व आहे. तेथील वन्यजिवांसह पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी या राखीव क्षेत्राला संवर्धन राखीवचा दर्जा देण्याची गरज पुढे आली. या दर्जामुळे संवर्धनाच्या कामांसाठी शासनाचा निधी उपलब्ध होईल. त्यामुळे अधिक परिणामकारक कामे होतील.

चौकट ....

येवतेश्वर घाटाच्या मध्यापासून भैरोबा टेकडीपर्यंत सुमारे १०७ हेक्टर वनक्षेत्रावर वनविभागाची मालकी आहे. एवढ्याच क्षेत्राला संवर्धित राखीव क्षेत्राचा दर्जा असेल. त्यात खासगी जमिनीचा समावेश नाही. या दर्जामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या कोणत्याही हक्काला बाधा नाही. त्यामुळे विस्थापन, पुनर्वसन असे कोणतेही प्रश्न उद्भवत नसल्याचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांनी स्पष्ट केले.

कोट ...

दहा वर्षांचा व्यवस्थापन आराखडा केला जाईल. अधिवास विकास, पाणवठा व कुरण विकासाची कामे होतील. माहिती केंद्र, निरीक्षण मनोरे यांची उभारणी, निसर्गवाटांचा विकास करून निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल. ग्रामस्थांच्या सहभागातून व्यवस्थापन समिती काम पाहील. स्थानिकांच्या रोजगाराला संधी निर्माण होईल.

- डॉ. व्ही. क्लेमेट बेन

मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर

फोटो मेलवर पाठविला आहे