शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

महादरेचे जंगल लवकरच फुलपाखरू संवर्धन राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : बिबट्या, गवे, रानडुकरे, मोर, गरुड, आदी पशुपक्ष्यांचा मुक्त संचार असलेले, सातारा शहराच्या हद्दीवर असलेल्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सातारा : बिबट्या, गवे, रानडुकरे, मोर, गरुड, आदी पशुपक्ष्यांचा मुक्त संचार असलेले, सातारा शहराच्या हद्दीवर असलेल्या महादरेच्या जंगलाला फुलपाखरू संवर्धन राखीवचा दर्जा मिळणार आहे. किर्रर्र जंगलात पक्ष्यांच्या किलबिलाटात निसरड्या पायवाटा तुडवत जंगल भ्रमंती अनुभवण्याची संधी निसर्ग पर्यटकांना यानिमित्ताने चालून आली आहे. त्याचबरोबर स्थानिकांना गावातच रोजगाराचे साधनही उपलब्ध होणार आहे.

कोल्हापूरचे मुख्य वनसंरक्षक डॉ. व्ही. क्लेमेट बेन यांनी या अनुषंगाने वनभवनात अधिकारी व निवडक नागरिकांची बैठक घेऊन महादरे फुलपाखरू संवर्धन राखीवचा प्रस्ताव पाठविण्याचे निर्देश दिले.

पश्चिम घाट आणि पूर्वेकडील दख्खनचे पठार यांना सांधणारा प्रदेश म्हणून महादरेच्या जंगलाची ओळख आहे. त्यामुळे महादरेमध्ये पश्चिम घाट व दख्खनच्या पठारातील दोन्ही प्रकारच्या जैवविविधता यांचा मिलाफ पाहायला मिळतो.

माजी मानद वन्यजीवरक्षक व फुलपाखरांचे अभ्यासक सुनील भोईटे ‘लोकमत’शी बोलताना म्हणाले, ‘पश्चिम घाटात ३६० प्रजातींची फुलपाखरे आढळतात. त्यापैकी १६० प्रजाती एकट्या महादरेमध्ये पाहायला मिळतात. यातील ऑर्किड टिट आणि व्हाईट टिप्ड लाईन ब्ल्यू ही दोन फुलपाखरू परिशिष्ट १ (शेड्युल १) मध्ये गणली जातात. वाघाचा परिशिष्ट १ मध्ये समावेश आहे. ही दोन्ही वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरं वाघाच्या पंगतीत जाऊन बसली आहेत. प्राधान्यक्रमाने ज्या वनस्पती अगर वन्यजीव जपण्याची गरज आहे, त्यांच्यासाठी विविध परिशिष्टांची रचना करण्यात आली आहे. एक प्रकारे त्यांना संरक्षित दर्जा देण्यात आला. परिशिष्ट एकमधील २ व परिशिष्ट तीन व चार मधील १६ फुलपाखरं एकट्या महादरेत आढळतात.

जैवविविधतेच्या अंगाने महादरेसारख्या प्रदेशास प्रेशर झोन किंवा दबावक्षेत्र असेही संबोधले जाते. वेगवेगळे अधिवास एकत्र नांदत असताना त्याचा दबाव या क्षेत्रावर असतो. हा दबाव सहन करण्याची क्षमता त्या जागेवर असते. त्यामुळे ती जागा पर्यावरणीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजली जाते. मानवी हस्तक्षेप झाल्यास तेथील जैवविविधता धोक्यात येऊ शकते. त्यामुळे महादरेच्या जंगलाला पर्यावरणीयदृष्ट्या वेगळे महत्त्व आहे. तेथील वन्यजिवांसह पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी या राखीव क्षेत्राला संवर्धन राखीवचा दर्जा देण्याची गरज पुढे आली. या दर्जामुळे संवर्धनाच्या कामांसाठी शासनाचा निधी उपलब्ध होईल. त्यामुळे अधिक परिणामकारक कामे होतील.

चौकट ....

येवतेश्वर घाटाच्या मध्यापासून भैरोबा टेकडीपर्यंत सुमारे १०७ हेक्टर वनक्षेत्रावर वनविभागाची मालकी आहे. एवढ्याच क्षेत्राला संवर्धित राखीव क्षेत्राचा दर्जा असेल. त्यात खासगी जमिनीचा समावेश नाही. या दर्जामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या कोणत्याही हक्काला बाधा नाही. त्यामुळे विस्थापन, पुनर्वसन असे कोणतेही प्रश्न उद्भवत नसल्याचे उपवनसंरक्षक डॉ. भारतसिंह हाडा यांनी स्पष्ट केले.

कोट ...

दहा वर्षांचा व्यवस्थापन आराखडा केला जाईल. अधिवास विकास, पाणवठा व कुरण विकासाची कामे होतील. माहिती केंद्र, निरीक्षण मनोरे यांची उभारणी, निसर्गवाटांचा विकास करून निसर्ग पर्यटनाला चालना मिळेल. ग्रामस्थांच्या सहभागातून व्यवस्थापन समिती काम पाहील. स्थानिकांच्या रोजगाराला संधी निर्माण होईल.

- डॉ. व्ही. क्लेमेट बेन

मुख्य वनसंरक्षक, कोल्हापूर

फोटो मेलवर पाठविला आहे