शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

महाबळेश्वर : फलक हटविल्याने तणाव !

By admin | Updated: November 17, 2014 23:22 IST

कंपनीच्या फलकाची होळी : महाबळेश्वरात सफाई कर्मचाऱ्यास मारहाण

महाबळेश्वर : खासगी कंपनीच्या जाहिरात फलकावर लावलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करणारा फलक हटविल्याने महाबळेश्वरात तणाव निर्माण झाला. कंपनीच्या कर्मचाऱ्यास शिवसैनिकांनी बेदम मारहाण केली; तसेच पालिकेवर मोर्चा काढला.शिवसेनाप्रमुखांचा आज, सोमवारी स्मृतिदिन होता. त्यानिमित्त त्यांना अभिवादन करणारे फलक शहरात सर्वत्र लावण्यात आले होते. पंचायत समितीसमोरील चौकातही असाच मोठा फलक लावण्यात आला होता. दरम्यान, या चौकाच्या सुशोभीकरणाचे काम एका खासगी कंपनीला जाहिरात करण्याच्या मोबदल्यात देण्यात आले होते. ठेकेदाराने या कंपनीचे जाहिरातफलक चौकात लावले होते. त्याच फलकावर शिवसेनेचा फलक लावल्याचे दिसताच ठेकेदाराने सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना तेथे पाठविले व शिवसेनेचा फलक उतरविण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनी हा फलक काढला; मात्र काढताना फलकाचे थोडे नुकसान झाले. त्याच वेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख सुनील साळुंखे त्या ठिकाणी आले व फलक होता तेथे लावण्यास सांगितले. कर्मचाऱ्यांनी त्यास नकार दिला. साळुंखे यांनी हा प्रकार उपजिल्हाप्रमुख राजेश कुंभारदरे, तालुकाप्रमुख यशवंत घाडगे, शहरप्रमुख विजय नायडू यांना सांगितला. या पदाधिकाऱ्यांनी शिवसैनिकांसह चौकात धाव घेतली. त्यावेळी कर्मचारी सफाई करताना त्यांना दिसले. शिवसेनेचा फलक रस्त्यावर पडल्याचे दिसताच शिवसैनिकांनी संबंधित कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली आणि त्यास पोलिसांच्या हवाली करून तक्रार दाखल केली. पोलीस ठाण्यासमोर मोठ्या संख्येने शिवसैनिक जमले होते.त्यानंतर शिवसैनिकांनी पालिकेवर मोर्चा काढला. या चौकाला शिवसेनाप्रमुखांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. पालिका गटनेते संदीप साळुंके यांनी फलक काढण्याचा प्रकार निंदनीय असल्याचे सांगून निषेध नोंदविला. नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांनीही या प्रकाराचा निषेध केला. बैठकीला उपनगराध्यक्ष संतोष आखाडे, प्रकाश पाटील, नगरसेवक लक्ष्मण कोंढाळकर, दत्तात्रय वाडकर, मनोज ताथवडेकर, रमेश शिंदे, शंकर ढेबे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)मार्चमध्येच संपलाय ठेका !जाहिरातीचा ठेका पालिकेने कोणाला, केव्हा दिला, याची माहिती घेण्यासाठी शिवसैनिकांनी पालिका सभागृहात नगराध्यक्ष, नगरसेवकांशी चर्चा केली, तेव्हा जाहिरात ठेक्याची मुदत मार्च २०१४ मध्येच संपुष्टात आल्याची माहिती उघड झाली. ठेका संपल्यानंतरही जाहिरात केल्याबद्दल ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा व पालिकेचे नुकसान भरून घ्यावे, अशी मागणी नायडू, कुंभारदरे यांनी केली.