शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

महाबळेश्वरातील खून अनैतिक संबंधातून

By admin | Updated: February 14, 2016 00:43 IST

दोघे फरार : प्रेयसीसह चौघांना अटक

महाबळेश्वर : येथील लॉडविक पॉइंटच्या टेकडीवर प्रकाश पांडुरंग कराळे (वय ३५, रा. थिटे वस्ती, खराडी, पुणे) याचा झालेला खून हा अनैतिक संबंधातून झाल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी कराळेच्या प्रेयसीसह चौघांना अटक केली आहे. दरम्यान, प्रकाशकडून सतत मारहाण होत असल्याने कंटाळून प्रेयसीने दुसऱ्या प्रियकराच्या मदतीने हा खुनाचा कट रचला. अटक केलेल्यांमध्ये दोन महिला व दोन पुरुषांचा समावेश आहे. तर फरार दोघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी या प्रकरणात प्रकाशची प्रेयसी सोनाली बालाजी काशीद, निखिल संतोष भाटी (वय २०), ज्योती काशिनाथ चिकणे (वय २३), मनोज काशिनाथ चिकणे (वय ३०, चौघेही रा. इंदिरानगर नं. १, नायर गणेश मंदिराजवळ, जेएन रोड, मुलुंड, मुंबई) यांना अटक केली आहे. यामधील ज्योती व मनोज हे बहीण-भाऊ महाबळेश्वर तालुक्यातील जावली या गावचे मूळ रहिवासी आहेत. तर या कटात सहभागी असणारे राहुल जयसिंग साळुंखे आणि आकाश खुशाल चव्हाण हे दोघे फरार आहेत. याबाबत महाबळेश्वरचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी माहिती दिली. ते म्हणाले, ‘मृत प्रकाश पांडुरंग कराळे (वय ३५, रा. थिटे वस्ती, खराडी पुणे) हा पत्नी व चार मुलांसह राहात होता. प्रकाशच्या घराजवळच सोनाली काशीद (वय २३) ही पती व दोन मुलांसह राहात होती. सोनालीचे व पतीचे सतत भांडण होत होते. भांडणामुळे पती सोनालीला सोडून निघून गेला. पती गेल्यानंतरच्या काळात सोनालीची प्रकाशबरोबर ओळख झाली. पुढे ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. या प्रेम प्रकरणाची माहिती प्रकाशच्या पत्नीलाही समजली. त्यामुळे दोघा पती-पत्नीत वाद होऊ लागले. तसेच प्रकाशच्या पत्नीत आणि सोनालीतही भांडणे सुरू झाली. त्यातूनच प्रकाशला दारूचे व्यसन लागले. त्यामुळे सोनालीलाही तो मारहाण करू लागला. परिणामी, निराश होऊन सोनाली मुलुंड येथील आपल्या माहेरी गेली. तरीही प्रकाशने तिचा पाठलाग सोडला नाही. तो मुलुंडमधील तिच्या घरी जाऊ लागला. तेथेही प्रकाशकडून सोनालीला मारहाण होत होती. त्यामुळे सोनाली वैतागली. याचदरम्यान, सोनालीचे एकाशी प्रेम जुळले. सोनालीने दुसऱ्या प्रियकराला ‘मला प्रकाशपासून सुटका हवी आहे. तू काहीही कर,’ असे सांगितले. तेव्हा दुसऱ्या प्रियकराने सोनाली तसेच सोनालीचा भाऊ निखिल, सोनालीची मैत्रीण ज्योती व ज्योतीचा भाऊ मनोज तसेच मनोजचा एक नातेवाईक अशा सहाजणांनी सोनालीच्या घरात बसून प्रकाशच्या हत्येचा कट रचला. ७ फेब्रुवारीला नेहमीप्रमाणे प्रकाश सोनालीला भेटण्यासाठी मुंबईला गेला. जाताना त्याने घरी आपल्या पत्नीलाही तशी माहिती दिली होती. प्रकाश घरी आल्यानंतर सोनालीने याची माहिती आकाशला दिली. आकाश त्याच दिवशी नागपूर येथून मुंबईकडे निघाला. ‘आम्ही सर्वजण महाबळेश्वर फिरायला निघालो आहे. तू येतोस का?,’ असे सोनालीने प्रकाशला विचारले. प्रकाशही त्यांच्याबरोबर महाबळेश्वरला फिरण्यासाठी आला. मंगळवारी दुपारी ते महाबळेश्वरला आले. त्यानंतर ते लॉडविक पॉइंटकडे आले. एक तास फिरल्यानंतर सर्वांनीच पाणीपुरी खाल्ली. त्यानंतर ते महाबळेश्वरकडे येण्यास निघाले. थोडे अंतर चालल्यावर एक पायवाट दिसली. त्या वाटेने राहुल व आकाश जंगलात गेले. ‘फोटोसाठी चांगली जागा आहे,’ असे सांगून त्यांनी प्रकाशला लॉडविक पॉइंटच्या टेकडीवर नेले. टेकडीवर सोनाली व प्रकाश यांच्यात भांडण सुरू झाले. या भांडणातून प्रकाशला खाली पाडण्यात आले. त्यातील एकाने पाय धरले तर दुसऱ्याने प्रकाशचा गळा चिरला. ओळख पटू नये म्हणून प्रकाशच्या तोंडावर मोठा दगड घालून चेहरा विद्रूप करण्यात आला. प्रकाशचा मृत्यू झाल्याची खात्री पटताच सर्वजण महाबळेश्वरात आले. त्यानंतर पोलादपूर व तेथून मुंबईला गेले. (वार्ताहर) भेळवाल्याने आरोपींना ओळखले... खून झाल्यानंतर प्रकाशच्या खिशातील सर्व वस्तू आरोपींनी नेल्या होत्या. त्यामुळे पोलिसांना तपासाची दिशा निश्चित करताना अडचणी येत होत्या; परंतु पोलीस निरीक्षक सावंत यांनी पॉइंटवरील भेळवाल्याला भेटून बोलते केले. मृताच्या पोटात शवविच्छेदनादरम्यान भेळ आढळून आली. प्रथम नकार देणाऱ्या भेळवाल्याने आपण सर्वांना पाहिल्याची कबुली देत अटक करणाऱ्यांना ओळखलेही.