शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
4
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
5
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
6
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
7
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
8
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
9
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
10
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
11
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
12
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
13
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
14
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
15
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
16
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
17
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
18
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
19
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
20
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिमेला पावसाचा जोर कमी; कोयनेचे दरवाजे दोन फुटांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:49 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचा जोर कमी झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ५३ मिलिमीटरची नोंद झाली. ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचा जोर कमी झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ५३ मिलिमीटरची नोंद झाली. तर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने कोयेनेचे दरवाजे सवा पाचवरून दोन फुटांपर्यंत खाली घेण्यात आले. त्यामुळे धरणातून एकूण २०२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

जिल्ह्याच्या मागील १५ दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यापूर्वी एक महिना पावसाची दडी होती. अपवाद वगळता पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. तर पूर्वेकडे पावसाची उघडीप होती. आता मागील काही दिवसांपासून पाऊस होत असल्याने खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला आहे. तसेच पश्चिम भागातील प्रमुख धरणांत वेगाने साठा वाढला. यामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे. असे असलेतरी मंगळवारपासून पाऊस कमी झाला आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर जूनपासून ४१८८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. नवजाला ३२ आणि यावर्षी आतापर्यंत ५४९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ५३ आणि जूनपासून ५५५८ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४८६२० क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत होती. तर पायथा वीजगृहातून २१०० आणि सहा दरवाजातून ४६५२० असा एकूण ४८६२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पण, पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात पाणी आवक कमी होत होती. त्यामुळे दुपारी एकच्या सुमारास धरणाचे सर्व सहा दरवाजे दोन फुटांपर्यंत खाली घेण्यात आले. या दरवाजातून १८१०० आणि पायथा वीजगृहातून २१०० असा २०२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणातून सोडण्यात येणारे पाणी कोयना नदीत जात आहे.

चौकट :

धोम, कण्हेरमधून विसर्ग सुरू

पश्चिम भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. सकाळच्या सुमारास धोम धरणात ९८.८० टक्के पाणीसाठा झाला होता. कण्हेरमध्ये ९९.३९, कोयना ९८.६७, उरमोडी ९१.१२, बलकवडी ९९.३९ आणि तारळी धरणात ९४.२८ टक्के पाणीसाठा होता. त्याचबरोबर धोममधून ३७५, कण्हेर १४६३, बलकवडी ११६३ आणि तारळी धरणातून ६८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

..........................................................