शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिमेला पावसाचा जोर कमी; कोयनेचे दरवाजे दोन फुटांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2021 04:49 IST

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचा जोर कमी झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ५३ मिलिमीटरची नोंद झाली. ...

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिमेकडे पावसाचा जोर कमी झाला आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत महाबळेश्वरला सर्वाधिक ५३ मिलिमीटरची नोंद झाली. तर धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाल्याने कोयेनेचे दरवाजे सवा पाचवरून दोन फुटांपर्यंत खाली घेण्यात आले. त्यामुळे धरणातून एकूण २०२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता.

जिल्ह्याच्या मागील १५ दिवसांपासून पाऊस सुरू झाला आहे. त्यापूर्वी एक महिना पावसाची दडी होती. अपवाद वगळता पश्चिम भागात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. तर पूर्वेकडे पावसाची उघडीप होती. आता मागील काही दिवसांपासून पाऊस होत असल्याने खरीप हंगामातील पिकांना फायदा झाला आहे. तसेच पश्चिम भागातील प्रमुख धरणांत वेगाने साठा वाढला. यामुळे वर्षभराची चिंता मिटलेली आहे. असे असलेतरी मंगळवारपासून पाऊस कमी झाला आहे.

बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ३४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर जूनपासून ४१८८ मिलिमीटर पाऊस पडला आहे. नवजाला ३२ आणि यावर्षी आतापर्यंत ५४९२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्याचबरोबर महाबळेश्वरला सकाळपर्यंत ५३ आणि जूनपासून ५५५८ मिलिमीटर पाऊस पडला आहे.

सकाळच्या सुमारास कोयना धरणात ४८६२० क्युसेक वेगाने पाण्याची आवक होत होती. तर पायथा वीजगृहातून २१०० आणि सहा दरवाजातून ४६५२० असा एकूण ४८६२० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. पण, पावसाचा जोर कमी झाल्याने धरणात पाणी आवक कमी होत होती. त्यामुळे दुपारी एकच्या सुमारास धरणाचे सर्व सहा दरवाजे दोन फुटांपर्यंत खाली घेण्यात आले. या दरवाजातून १८१०० आणि पायथा वीजगृहातून २१०० असा २०२०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. धरणातून सोडण्यात येणारे पाणी कोयना नदीत जात आहे.

चौकट :

धोम, कण्हेरमधून विसर्ग सुरू

पश्चिम भागात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झालेला आहे. सकाळच्या सुमारास धोम धरणात ९८.८० टक्के पाणीसाठा झाला होता. कण्हेरमध्ये ९९.३९, कोयना ९८.६७, उरमोडी ९१.१२, बलकवडी ९९.३९ आणि तारळी धरणात ९४.२८ टक्के पाणीसाठा होता. त्याचबरोबर धोममधून ३७५, कण्हेर १४६३, बलकवडी ११६३ आणि तारळी धरणातून ६८४ क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

..........................................................