शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
5
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
6
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
7
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
8
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
9
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
10
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
11
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
12
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
14
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
15
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
16
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
17
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
18
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
19
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
20
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...

शेतात पीक असेल तरच मिळणार कर्ज

By admin | Updated: January 30, 2016 00:15 IST

विकास अधिकाऱ्यांचे लक्ष : सेवा सोसायट्यांना जिल्हा बँकेच्या सूचना

वाठार स्टेशन : कमी दरात कर्जव्यवस्था करणाऱ्या विकास सेवा सोसायट्यांची शेतकऱ्यांना आजपर्यंत मोठी मदत झाली. शेतात पीक असो किंवा नसो. असणाऱ्या शेतजमिनीवर कर्जाची मंजुरी मिळत होती; परंतु यापुढे सोसायट्यांचे कर्ज शेतकऱ्याला न परवडणारेच ठरणार आहे. जिल्हा बँकेने जिल्ह्यातील सर्वच सोसायट्यांना आता पीक पाहणी करूनच कर्ज देण्याच्या सूचना केल्या आहेत. जर शेतात पीक नसताना त्याला कर्जपुरवठा झाला तर त्यास जिल्हा बँकेचा विकास अधिकारी जबाबदार धरण्यात येणार असल्याने आता हे विकास अधिकारीच शेतातील पीक पाहून शेतकऱ्याला कर्जाचे वाटप करणार आहेत.जिल्हा बँकेच्या अधिपत्याखाली गावोगावच्या विकास सेवा सोसायट्या या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. कमी व्याजाने अनेक कारणांसाठी अल्पमुदत कर्ज, मध्यम मुदत कर्ज व दीर्घ मुदत कर्ज सोसायट्या वितरीत करीत आहेत. यापैकी अल्पमुदत कर्जाबाबत सध्या धोरणात्मक बदल करण्यात आला आहे.पीक कर्जासाठी सहा टक्के व्याजाने तर जिराईत क्षेत्रासाठी १३ टक्क््यांने व्याजाने हे कर्ज यापुढे शेतकऱ्यांना मिळणार आहे. साधारण एक एकर ऊस शेती असलेल्या शेतकऱ्याला ३४ हजार रुपये कर्जाची मंजुरी आहे. ऊसशेती असलेल्या शेतकऱ्याला ३४ हजार रुपये कर्जाची मंजुरी आहे. उसापेक्षा आले पिकास ४२ हजार ५०० रुपये कर्जाची मंजुरी आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचा शेतात ऊस किंवा आल्यासारखे पिके असतील त्याच शेतकऱ्यांना सहा टक्के व्याजाचा लाभ घेता येणार आहे.अलीकडील दुष्काळी परिस्थतीमुळे सेवा सोसायट्यांची कर्जे परतफेड करणे शेतकऱ्यांसाठी आव्हान ठरत आहेत. कित्येक शेतकरी शेतात ऊस नसतानाही उसाच्या कर्जाची रक्कम मिळवत होते; मात्र हे कर्ज वेळेत वसूल होत नसल्याची बाब अनेक सेवा सोसायट्यांच्या निदर्शनास आली आहे. याला पर्याय म्हणून शेतकरी नवे जुने कर्जप्रकरण करून दरवर्षी वेळ मारून नेत आहेत. तर काही शेतकरी सोसायटीची वसुली होऊ नये, यासाठी दुसऱ्याच्या नावानेच ऊस पाठविण्याचे काम करत आहेत. यामुळे घेतलेले कर्ज वसूल होत नसल्याची अनेक प्रकरणे आहेत.सातारा जिल्हा मध्वर्ती बँकेने जरी नव्याने काही सूचना केल्या असल्या तरी ऊस, आल्यासारख्या पिकांची कमाल मर्यादा एकरी ६० हजार रुपये करावी तरच हा शेतकरी कुठतरी स्थिर होइल. अन्यथा आता पश्चिम महाराष्ट्रात दुष्काळी पट्ट्यातही शेतकऱ्यांना मोठी अडचण येईल. (वार्ताहर)