शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
2
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
3
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
4
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
5
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
6
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
7
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
8
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
9
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
10
सीक्रेट सांतानं कर्मचाऱ्याला दिलेलं गिफ्ट पाहून तरुणी भलत्याच खूश झाल्या, असं काय मिळालं?
11
"कांगारूंना कसं हरवायचं? ते शास्त्र फक्त शास्त्रींकडेच! इंग्लंडने त्यांनाच कोच करावं"
12
Travel : जगातील एक 'असे' ठिकाण, जिथे वेळेचे कोणतेच बंधन नाही! घड्याळ तर कुणी वापरतच नाही
13
Vinayak Pande and Yatin Wagh: उद्धव ठाकरेंचा आदेश, विनायक पांडे- यतिन वाघ यांची पक्षातून हकालपट्टी; राऊतांची पोस्ट!
14
'खेलरत्न'साठी हार्दिक! दिव्या देशमुखसह २४ खेळाडू अर्जुन पुरस्कारासाठी नामांकित; इथं पाहा संपूर्ण यादी
15
ज्यांनी घेतलीय त्यांनी मागच्या सीटवर बसू नका, या देशाने घातली मारुती सुझुकीच्या Fronx विक्रीवर बंदी...
16
Astrology: २०२६ आधी 'या' ३ गोष्टी केल्याने होईल मोठा लाभ; ज्योतिषांनी दिला नवीन वर्षाचा कानमंत्र!
17
"युतीमुळे तुम्हाला फरक पडत नाही, तर तोंडाची डबडी का वाजवताय?", संजय राऊत भाजपा नेत्यांवर भडकले
18
१७ वर्षानंतर तारिक रहमान बांगलादेशात परतले; राजकीय हालचालींना वेग, भारतासाठी फायद्याचे की तोट्याचे
19
"कोणालाच सत्य माहित नव्हतं...", ९ वर्षांनंतर शिल्पा शिंदेने 'भाबीजी घर पर हैं' सोडण्यामागचं सांगितलं कारण
20
जीएसटी कमी होऊन, दोन महिनेही झाले नाहीत तोच कारच्या किंमती महागणार; मारुतीपासून महिंद्रापर्यंत सर्वच कंपन्या वाढवणार किमती
Daily Top 2Weekly Top 5

पशुसंवर्धनच्या अकार्यक्षमतेमुळे जावळीत पशुधन धोक्यात

By admin | Updated: February 23, 2015 00:24 IST

शेतकरी अर्थिक संकटात : खासगी डॉक्टरांची चलती

कुडाळ : जावळी तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे तालुक्यातील खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांची चांगलेच उखळ पांढरे होत असलेले चित्र पाहायला मिळत आहे. केवळ कागदावरच लसीकरण शिबिर आयोजित करून पशुसंवर्धन विभाग कागदी घोडे नाचवत आहे. कुसुंबीमुरा येथे ११ जनावरे दगावूनही पशुसंवर्धन विभागाला जाग येत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. जावळी तालुक्यात चार प्रथम वर्ग नऊ द्वितीय वर्ग पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. परंतु हे आज ओस पडलेले पाहायला मिळत आहेत. तर खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर शेतकऱ्यांना शेतात सेवा पुरवित असल्यामुळे त्यांचीच तालुक्यात चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. शासन अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवित असतानाही त्या तालुक्यात पोहोचवण्यात पशुसंवर्धन विभाग कमी पडताना दिसतो. जर्सी, होलस्टेन जातींच्या गाईमध्ये आज देशी गार्इंची संख्या कमी होऊ लागली आहे. कुसुंबीमुरा येथे काही जनावरे बोटॅलिझमने दगावली आहेत. यामध्ये देशी गार्इंचा समावेश आहे. दीड-दोन महिन्यांपासून ही जनावरे दगावत असतानाही पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना याची कसलीच कल्पना नाही. तर मृत्यू झालेल्या एकाही जनावराचा पंचनामा, पोस्टमार्टम पशुसंवर्धनाकडून होत नाही. याचे आश्चर्य शेतकऱ्यांना वाटत आहे. यावर कोणत्याही उपाययोजना पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून होताना दिसल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे आणि शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट ही निर्माण झाले आहे. यावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष देऊन तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाला आपल्या अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष देऊन तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाला आपल्या अधिकाऱ्यांची जाणीव करून द्यावी. व पशुधन वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे. (प्रतिनिधी) कुसुंबीमुरातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का? कुसुंबीमुरा येथील जनावरे बॉटॅलिझमने दगावली आहेत. मात्र, या जनावरांना वेळेत औषधोपचार मिळाले असते तर ही जनावरे दगावली नसती, आज दुभती जनावरेच दगावल्याने येथील शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय अडचणीत येऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. पंचायत समिती पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. परंतु त्यांना किमान नुकसान भरपाई मिळणार का? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.