शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

पशुसंवर्धनच्या अकार्यक्षमतेमुळे जावळीत पशुधन धोक्यात

By admin | Updated: February 23, 2015 00:24 IST

शेतकरी अर्थिक संकटात : खासगी डॉक्टरांची चलती

कुडाळ : जावळी तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे तालुक्यातील खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांची चांगलेच उखळ पांढरे होत असलेले चित्र पाहायला मिळत आहे. केवळ कागदावरच लसीकरण शिबिर आयोजित करून पशुसंवर्धन विभाग कागदी घोडे नाचवत आहे. कुसुंबीमुरा येथे ११ जनावरे दगावूनही पशुसंवर्धन विभागाला जाग येत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. जावळी तालुक्यात चार प्रथम वर्ग नऊ द्वितीय वर्ग पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. परंतु हे आज ओस पडलेले पाहायला मिळत आहेत. तर खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर शेतकऱ्यांना शेतात सेवा पुरवित असल्यामुळे त्यांचीच तालुक्यात चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. शासन अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवित असतानाही त्या तालुक्यात पोहोचवण्यात पशुसंवर्धन विभाग कमी पडताना दिसतो. जर्सी, होलस्टेन जातींच्या गाईमध्ये आज देशी गार्इंची संख्या कमी होऊ लागली आहे. कुसुंबीमुरा येथे काही जनावरे बोटॅलिझमने दगावली आहेत. यामध्ये देशी गार्इंचा समावेश आहे. दीड-दोन महिन्यांपासून ही जनावरे दगावत असतानाही पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना याची कसलीच कल्पना नाही. तर मृत्यू झालेल्या एकाही जनावराचा पंचनामा, पोस्टमार्टम पशुसंवर्धनाकडून होत नाही. याचे आश्चर्य शेतकऱ्यांना वाटत आहे. यावर कोणत्याही उपाययोजना पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून होताना दिसल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे आणि शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट ही निर्माण झाले आहे. यावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष देऊन तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाला आपल्या अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष देऊन तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाला आपल्या अधिकाऱ्यांची जाणीव करून द्यावी. व पशुधन वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे. (प्रतिनिधी) कुसुंबीमुरातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का? कुसुंबीमुरा येथील जनावरे बॉटॅलिझमने दगावली आहेत. मात्र, या जनावरांना वेळेत औषधोपचार मिळाले असते तर ही जनावरे दगावली नसती, आज दुभती जनावरेच दगावल्याने येथील शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय अडचणीत येऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. पंचायत समिती पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. परंतु त्यांना किमान नुकसान भरपाई मिळणार का? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.