शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

पशुसंवर्धनच्या अकार्यक्षमतेमुळे जावळीत पशुधन धोक्यात

By admin | Updated: February 23, 2015 00:24 IST

शेतकरी अर्थिक संकटात : खासगी डॉक्टरांची चलती

कुडाळ : जावळी तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे तालुक्यातील खासगी पशुवैद्यकीय डॉक्टरांची चांगलेच उखळ पांढरे होत असलेले चित्र पाहायला मिळत आहे. केवळ कागदावरच लसीकरण शिबिर आयोजित करून पशुसंवर्धन विभाग कागदी घोडे नाचवत आहे. कुसुंबीमुरा येथे ११ जनावरे दगावूनही पशुसंवर्धन विभागाला जाग येत नसल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. जावळी तालुक्यात चार प्रथम वर्ग नऊ द्वितीय वर्ग पशुवैद्यकीय दवाखाने आहेत. परंतु हे आज ओस पडलेले पाहायला मिळत आहेत. तर खासगी पशुवैद्यकीय डॉक्टर शेतकऱ्यांना शेतात सेवा पुरवित असल्यामुळे त्यांचीच तालुक्यात चलती असल्याचे पाहायला मिळत आहे. शासन अनेक योजना शेतकऱ्यांसाठी राबवित असतानाही त्या तालुक्यात पोहोचवण्यात पशुसंवर्धन विभाग कमी पडताना दिसतो. जर्सी, होलस्टेन जातींच्या गाईमध्ये आज देशी गार्इंची संख्या कमी होऊ लागली आहे. कुसुंबीमुरा येथे काही जनावरे बोटॅलिझमने दगावली आहेत. यामध्ये देशी गार्इंचा समावेश आहे. दीड-दोन महिन्यांपासून ही जनावरे दगावत असतानाही पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना याची कसलीच कल्पना नाही. तर मृत्यू झालेल्या एकाही जनावराचा पंचनामा, पोस्टमार्टम पशुसंवर्धनाकडून होत नाही. याचे आश्चर्य शेतकऱ्यांना वाटत आहे. यावर कोणत्याही उपाययोजना पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून होताना दिसल्या नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे पशुधन धोक्यात आले आहे आणि शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट ही निर्माण झाले आहे. यावर जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष देऊन तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाला आपल्या अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष देऊन तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाला आपल्या अधिकाऱ्यांची जाणीव करून द्यावी. व पशुधन वाचवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी तालुक्यातील शेतकऱ्यांमधून मागणी होत आहे. (प्रतिनिधी) कुसुंबीमुरातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार का? कुसुंबीमुरा येथील जनावरे बॉटॅलिझमने दगावली आहेत. मात्र, या जनावरांना वेळेत औषधोपचार मिळाले असते तर ही जनावरे दगावली नसती, आज दुभती जनावरेच दगावल्याने येथील शेतकऱ्यांचा दुग्धव्यवसाय अडचणीत येऊन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. पंचायत समिती पशुसंवर्धन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची भेट घेतली. परंतु त्यांना किमान नुकसान भरपाई मिळणार का? असा सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.