शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
2
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
3
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
4
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
5
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
6
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
7
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
8
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला मिळाली पदार्पणाची संधी
9
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
10
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
11
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
12
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
13
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
14
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
15
एकोणीसाव्यांदा डिविडंड देणार ही कंपनी; यावेळी होणार १ शेअरवर ३० रुपयांचा फायदा, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
16
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
17
ना तेल घेतलं, ना गॅस..तरीही भारताने मित्राला बनवलं मालामाल; संरक्षण क्षेत्रात आणखी एक कमाल
18
'अटी मान्य करा, नाहीतर चर्चा विसरा'; इराणच्या शिष्टमंडळाचा अमेरिकेला सज्जड दम
19
Viral Video: बाल्कनीतून उडी मार, मी झेलतो! लाईक्ससाठी चिमुरड्याचा जीव धोक्यात, व्हिडीओ पाहून संतापले लोक
20
कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा
Daily Top 2Weekly Top 5

राहायला खंडाळ्यात, शेती कसायला सोलापुरात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:45 IST

खंडाळा : शासनाच्या अनेक प्रकल्पांसाठी खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. लोकांच्या औदार्याच्या बळावर प्रकल्प उभे राहून कार्यान्वित झाले. वीर ...

खंडाळा : शासनाच्या अनेक प्रकल्पांसाठी खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. लोकांच्या औदार्याच्या बळावर प्रकल्प उभे राहून कार्यान्वित झाले. वीर धरणासाठी खंडाळा तालुक्यातील आठ गावांची हजारो एकर जमीन संपादित करण्यात आली. अनेक शेतकरी भूमिहीन झाले. मात्र, या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागील शुक्लकाष्ठ गेल्या साठ वर्षांत सुटले नाही. प्रकल्पबाधितांना जमिनी मिळविण्यासाठी अद्याप तिष्ठत राहावे लागले आहे. खंडाळा तालुक्यात रहिवासी असणाऱ्यांना सोलापूर जिल्ह्यात शेती दिली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’, अशी झाली आहे. या लढ्यासाठी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे.

वीर धरण निर्मितीसाठी १९५७ मध्ये तालुक्यातील तोंडल, भोळी, लोणी, पिसाळवाडी यांसह आठ गावांतील शेतजमीन संपादित करण्यात आली. त्यानंतर १९६० मध्ये धरणाचे काम पूर्ण होऊन प्रकल्प कार्यान्वित झाला. नवीन गावठाणनिर्मिती करून लोकांचे राहण्याचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, परतावा मिळणाऱ्या जमिनी अद्याप काही लोकांना मिळाल्या नाहीत.

भोळी गावातील ३९५ शेतकऱ्यांची सुमारे १६०० एकर क्षेत्र धरणाच्या जलाशयात गेली आहे. यापैकी ६० टक्के लोकांना जमिनीचा परतावा मिळाला आहे. मात्र, ४० टक्के शेतकरी अद्यापही जमीन मोबदल्यापासून वंचित आहेत. शासकीय कायद्यानुसार हक्काच्या जमिनी मिळविण्यासाठी गेली पन्नास वर्षे सरकारी दरबारात हेलपाटे घालूनही अधिकारी वर्ग ताकासतूर लागू देत नाहीत.

खंडाळा तालुक्यात नीरा-देवघर प्रकल्पातील संपादित जमिनीचे क्षेत्र शिल्लक असताना, शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यात जमीन दिली जात आहे. त्यामुळे ती कसायला कठीण होणार आहे. अशा जमिनी मिळूनही त्याचा काहीच फायदा होणार नसल्याचे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. यावर आवाज उठविण्यासाठी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी संघर्ष समिती स्थापन करून लढा देण्याचे ठरविले आहे.

चौकट..

सांगा आमचं काय चुकलं...

तालुक्यात कोणताही प्रकल्प आला की आम्ही अल्प मोबदल्यात सरकारला जमिनी दिल्या. धरणासाठी बागायती क्षेत्र संपादित करण्यात आले. तरीही आम्ही काळजावर दगड ठेवून संमती दिली. पण शासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या योगदानाची किंमत नाही. हे असं जगणं आमच्या वाट्याला का? सांगा आमचं काय चुकलं? अशा उद्विग्न भावना प्रकल्पग्रस्तांच्या आहेत.

(कोट..)

वीर धरणाच्या जलाशयात आमची वडिलोपार्जित चौदा एकर जमीन गेली आहे. या बदल्यात सुमारे सहा एकर क्षेत्र परतावा मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी वर्षानुवर्षे आम्ही झगडतो आहोत. मात्र, जेव्हा-जेव्हा यासाठी पुनर्वसन कार्यालयात जातो, तेव्हा विषयाला बगल दिली जाते. परजिल्ह्यात जमिनी दिल्या, तर तेथील स्थानिक ती कसून देत नाहीत, असे अनुभव आहेत. त्यासाठी तालुक्यातच इतर प्रकल्पातील शिल्लक क्षेत्रातून आम्हाला जमीन परतावा मिळावा, एवढीच अपेक्षा आहे.

- अजिंक्य चव्हाण, माजी सरपंच, भोळी

....................................

फोटो मेल केला आहे .