शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेशातून आल्यावर थरूर यांचा काँग्रेसवरच आणीबाणी बॉम्ब; लेखात इंदिरा गांधींवर जबर टीका, म्हणाले... 
2
अजित पवारांना शह देण्यासाठी भाजपने लावली फिल्डिंग; निवडणुका स्वतंत्र लढवल्या जाणार?
3
१०० कोटींची उलाढाल, आलिशान कोठडी अन् सीक्रेट खोली; छांगुर बाबाकडे सापडल्या शक्तिवर्धक गोळ्या
4
EMI वर वस्तू खरेदी करणं किती योग्य? हल्ली अनेकजण करतात हे काम; ईएमआयचं सत्य काय?
5
Maharashtra Politics : ठाकरे बंधू महापालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
6
गुगलमध्ये १.६ कोटी पगार, तरीही 'ती' म्हणते न्यूयॉर्कमध्ये खर्च भागवणं कठीण! भारतीय तरुणीची पोस्ट व्हायरल
7
'चला हवा...'मध्ये अभिनेत्यांनी स्त्री भूमिका केल्या, आता नव्या पर्वात काय? गौरव मोरे म्हणाला, "मी आधीच..."
8
भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला यांचा परतीचा प्रवास पडणार लांबणीवर? समोर येतंय असं कारण
9
२६ वर्षांचे आहात, ५० पर्यंत २ कोटी हवेत? आजपासून कितीची मंथली SIP केल्यास मिळू शकते इतकी रक्कम?
10
PM मोदींचा २७ देशांकडून सन्मान, ८ मुस्लिम देशांचाही समावेश; २०२५ मध्ये विक्रमी कामगिरी...
11
'एक कप और'ची सवय पडेल महागात; गरमागरम चहाच्या नादात माराव्या लागतील हॉस्पिटलच्या चकरा
12
Guru Purnima 2025: आजच्या काळात 'या' गुरूंनाही आहे मोठा मान; तुम्ही कोणाला फॉलो करता?
13
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा; वरिष्ठ नेत्यांना भेटणार, राजकीय चर्चांना उधाण
14
एकेकाळी ज्या टाटा ग्रुपला बंगालबाहेर जाण्यास भाग पाडले, त्यालाच आता बोलवतायत ममता...
15
अजब मध्यप्रदेशातील गजब पूल! भोपाळपेक्षा दोन पावले पुढे इंदूर, झेड आकाराचा बांधलाय पूल
16
ट्रम्प यांचा भारतासह ब्रिक्स देशांना 'अल्टिमेटम'! २१ देशांवर टॅरिफचा बॉम्ब, मित्राच्या देशावरच लादला सर्वाधिक कर
17
"ट्रम्प घरासमोर सनबाथ घेत असताना एक ड्रोन येईल आणि…’’ अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना इराणची उघड धमकी
18
"माझं आडनाव कोणालाच...", अमृता सुभाषने सांगितलं वडिलांचं नाव लावण्यामागचं कारण
19
ललित प्रभाकरसोबत झळकणार 'ही' हिंदी अभिनेत्री, शुभमन गिलशी अफेअरच्या रंगल्या चर्चा
20
Aastha Poonia : आकाशाला गवसणी! नौदलाची पहिली महिला फायटर पायलट; 'विंग्स ऑफ गोल्ड'ने सन्मान

राहायला खंडाळ्यात, शेती कसायला सोलापुरात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:45 IST

खंडाळा : शासनाच्या अनेक प्रकल्पांसाठी खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. लोकांच्या औदार्याच्या बळावर प्रकल्प उभे राहून कार्यान्वित झाले. वीर ...

खंडाळा : शासनाच्या अनेक प्रकल्पांसाठी खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. लोकांच्या औदार्याच्या बळावर प्रकल्प उभे राहून कार्यान्वित झाले. वीर धरणासाठी खंडाळा तालुक्यातील आठ गावांची हजारो एकर जमीन संपादित करण्यात आली. अनेक शेतकरी भूमिहीन झाले. मात्र, या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागील शुक्लकाष्ठ गेल्या साठ वर्षांत सुटले नाही. प्रकल्पबाधितांना जमिनी मिळविण्यासाठी अद्याप तिष्ठत राहावे लागले आहे. खंडाळा तालुक्यात रहिवासी असणाऱ्यांना सोलापूर जिल्ह्यात शेती दिली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’, अशी झाली आहे. या लढ्यासाठी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे.

वीर धरण निर्मितीसाठी १९५७ मध्ये तालुक्यातील तोंडल, भोळी, लोणी, पिसाळवाडी यांसह आठ गावांतील शेतजमीन संपादित करण्यात आली. त्यानंतर १९६० मध्ये धरणाचे काम पूर्ण होऊन प्रकल्प कार्यान्वित झाला. नवीन गावठाणनिर्मिती करून लोकांचे राहण्याचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, परतावा मिळणाऱ्या जमिनी अद्याप काही लोकांना मिळाल्या नाहीत.

भोळी गावातील ३९५ शेतकऱ्यांची सुमारे १६०० एकर क्षेत्र धरणाच्या जलाशयात गेली आहे. यापैकी ६० टक्के लोकांना जमिनीचा परतावा मिळाला आहे. मात्र, ४० टक्के शेतकरी अद्यापही जमीन मोबदल्यापासून वंचित आहेत. शासकीय कायद्यानुसार हक्काच्या जमिनी मिळविण्यासाठी गेली पन्नास वर्षे सरकारी दरबारात हेलपाटे घालूनही अधिकारी वर्ग ताकासतूर लागू देत नाहीत.

खंडाळा तालुक्यात नीरा-देवघर प्रकल्पातील संपादित जमिनीचे क्षेत्र शिल्लक असताना, शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यात जमीन दिली जात आहे. त्यामुळे ती कसायला कठीण होणार आहे. अशा जमिनी मिळूनही त्याचा काहीच फायदा होणार नसल्याचे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. यावर आवाज उठविण्यासाठी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी संघर्ष समिती स्थापन करून लढा देण्याचे ठरविले आहे.

चौकट..

सांगा आमचं काय चुकलं...

तालुक्यात कोणताही प्रकल्प आला की आम्ही अल्प मोबदल्यात सरकारला जमिनी दिल्या. धरणासाठी बागायती क्षेत्र संपादित करण्यात आले. तरीही आम्ही काळजावर दगड ठेवून संमती दिली. पण शासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या योगदानाची किंमत नाही. हे असं जगणं आमच्या वाट्याला का? सांगा आमचं काय चुकलं? अशा उद्विग्न भावना प्रकल्पग्रस्तांच्या आहेत.

(कोट..)

वीर धरणाच्या जलाशयात आमची वडिलोपार्जित चौदा एकर जमीन गेली आहे. या बदल्यात सुमारे सहा एकर क्षेत्र परतावा मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी वर्षानुवर्षे आम्ही झगडतो आहोत. मात्र, जेव्हा-जेव्हा यासाठी पुनर्वसन कार्यालयात जातो, तेव्हा विषयाला बगल दिली जाते. परजिल्ह्यात जमिनी दिल्या, तर तेथील स्थानिक ती कसून देत नाहीत, असे अनुभव आहेत. त्यासाठी तालुक्यातच इतर प्रकल्पातील शिल्लक क्षेत्रातून आम्हाला जमीन परतावा मिळावा, एवढीच अपेक्षा आहे.

- अजिंक्य चव्हाण, माजी सरपंच, भोळी

....................................

फोटो मेल केला आहे .