शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

राहायला खंडाळ्यात, शेती कसायला सोलापुरात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:45 IST

खंडाळा : शासनाच्या अनेक प्रकल्पांसाठी खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. लोकांच्या औदार्याच्या बळावर प्रकल्प उभे राहून कार्यान्वित झाले. वीर ...

खंडाळा : शासनाच्या अनेक प्रकल्पांसाठी खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या. लोकांच्या औदार्याच्या बळावर प्रकल्प उभे राहून कार्यान्वित झाले. वीर धरणासाठी खंडाळा तालुक्यातील आठ गावांची हजारो एकर जमीन संपादित करण्यात आली. अनेक शेतकरी भूमिहीन झाले. मात्र, या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मागील शुक्लकाष्ठ गेल्या साठ वर्षांत सुटले नाही. प्रकल्पबाधितांना जमिनी मिळविण्यासाठी अद्याप तिष्ठत राहावे लागले आहे. खंडाळा तालुक्यात रहिवासी असणाऱ्यांना सोलापूर जिल्ह्यात शेती दिली जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’, अशी झाली आहे. या लढ्यासाठी संघर्ष समिती आक्रमक झाली आहे.

वीर धरण निर्मितीसाठी १९५७ मध्ये तालुक्यातील तोंडल, भोळी, लोणी, पिसाळवाडी यांसह आठ गावांतील शेतजमीन संपादित करण्यात आली. त्यानंतर १९६० मध्ये धरणाचे काम पूर्ण होऊन प्रकल्प कार्यान्वित झाला. नवीन गावठाणनिर्मिती करून लोकांचे राहण्याचे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, परतावा मिळणाऱ्या जमिनी अद्याप काही लोकांना मिळाल्या नाहीत.

भोळी गावातील ३९५ शेतकऱ्यांची सुमारे १६०० एकर क्षेत्र धरणाच्या जलाशयात गेली आहे. यापैकी ६० टक्के लोकांना जमिनीचा परतावा मिळाला आहे. मात्र, ४० टक्के शेतकरी अद्यापही जमीन मोबदल्यापासून वंचित आहेत. शासकीय कायद्यानुसार हक्काच्या जमिनी मिळविण्यासाठी गेली पन्नास वर्षे सरकारी दरबारात हेलपाटे घालूनही अधिकारी वर्ग ताकासतूर लागू देत नाहीत.

खंडाळा तालुक्यात नीरा-देवघर प्रकल्पातील संपादित जमिनीचे क्षेत्र शिल्लक असताना, शेतकऱ्यांना सोलापूर जिल्ह्यात जमीन दिली जात आहे. त्यामुळे ती कसायला कठीण होणार आहे. अशा जमिनी मिळूनही त्याचा काहीच फायदा होणार नसल्याचे प्रकल्पग्रस्तांचे म्हणणे आहे. यावर आवाज उठविण्यासाठी अन्यायग्रस्त शेतकऱ्यांनी संघर्ष समिती स्थापन करून लढा देण्याचे ठरविले आहे.

चौकट..

सांगा आमचं काय चुकलं...

तालुक्यात कोणताही प्रकल्प आला की आम्ही अल्प मोबदल्यात सरकारला जमिनी दिल्या. धरणासाठी बागायती क्षेत्र संपादित करण्यात आले. तरीही आम्ही काळजावर दगड ठेवून संमती दिली. पण शासकीय अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या योगदानाची किंमत नाही. हे असं जगणं आमच्या वाट्याला का? सांगा आमचं काय चुकलं? अशा उद्विग्न भावना प्रकल्पग्रस्तांच्या आहेत.

(कोट..)

वीर धरणाच्या जलाशयात आमची वडिलोपार्जित चौदा एकर जमीन गेली आहे. या बदल्यात सुमारे सहा एकर क्षेत्र परतावा मिळणे अपेक्षित आहे. त्यासाठी वर्षानुवर्षे आम्ही झगडतो आहोत. मात्र, जेव्हा-जेव्हा यासाठी पुनर्वसन कार्यालयात जातो, तेव्हा विषयाला बगल दिली जाते. परजिल्ह्यात जमिनी दिल्या, तर तेथील स्थानिक ती कसून देत नाहीत, असे अनुभव आहेत. त्यासाठी तालुक्यातच इतर प्रकल्पातील शिल्लक क्षेत्रातून आम्हाला जमीन परतावा मिळावा, एवढीच अपेक्षा आहे.

- अजिंक्य चव्हाण, माजी सरपंच, भोळी

....................................

फोटो मेल केला आहे .