शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘जीवना’साठी जीव धोक्यात

By admin | Updated: December 7, 2015 00:28 IST

आस कळशीभर पाण्याची : सक्ती धावता महामार्ग ओलांडण्याची

सातारा : पाणी ही माणसाची प्राथमिक गरज असल्यामुळेच त्याला ‘जीवन’ म्हटले गेले आहे. जगण्यासाठी आत्यंतिक गरजेचे हे पाणी मिळवण्यासाठी मात्र अनेकांना जीवही धोक्यात घालावा लागतो. हीच हतबलता महामार्गालगत असलेल्या झोपडपट्टीतील मुलींमध्ये आढळून आली आहे. कळशीभर पाण्यासाठी त्या रोज जीव धोक्यात घालत आहेत. वाढे फाटा ते शिवराज चौक असा महामार्ग शहराजवळून गेला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग प्रचंड असतो. आता या रस्त्याचे सहापदरीकरण झाल्यामुळे तो ओलांडणे केवळ भुयारी मार्गाने किंवा उड्डाणपुलावरूनच शक्य होणार आहे. अजस्र वाहनांच्या प्रचंड वेगासमोर आलेल्या व्यक्तीच्या क्षणार्धात ठिकऱ्या उडतील हे माहीत असूनही काही जणांना मात्र हा धोका दररोज पत्करावा लागतो आहे.महामार्गावर अजंठा चौकानजीक झोपड्या वाढल्या आहेत. तेथील लहानग्या मुलींना कळशीभर पाण्यासाठी दररोज महामार्ग धोकादायक रीतीने ओलांडून जावे लागत आहे. झोपडपट्टीत पाण्याची व्यवस्था नसल्याने या मुली पाण्याने भरलेली कळशी किंवा हंडा डोक्यावर घेऊन जिवाची पर्वा न करता महामार्ग ओलांडत असून, हे भयावह दृश्य एखाद्या दिवशी अपघाताला निमंत्रण देऊ शकते. अजंठा चौकात वाढत असणाऱ्या झोपडपट्टीतील काही मुली पाण्यासाठी महामार्ग ओलांडून पलीकडे जातात. महामार्ग सोडल्यावर दोनशे मीटर अंतरावर एक कूपनलिका आहे. तिथे घागरी भरून या ओझ्यासह पुन्हा महामार्ग ओलांडतात. अनेकदा त्यांना वाहनांच्या वेगाचा अंदाज येत नाही. मग त्यांची धावाधाव होते. वेगवान वाहनाचे ब्रेक लागले नाहीत, तर अनर्थ ओढवू शकतो.यावर्षी पाणीटंचाईचे संकट जिल्ह्यात सर्वत्र गडद होत आहे. शहरांमधूनही मोठ्या प्रमाणावर पाणीकपात केली जात आहे. अशा वेळी ज्यांच्याकडे पाणीपुरवठ्याची मूलभूत सुविधा उपलब्धच नाही, नळाचे कनेक्शन नाही, त्यांच्याकडे प्रशासनाचे लक्ष जाणे दुरापास्तच आहे. तथापि, महामार्गावर एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाचे या चिमुकल्यांच्या कसरतीकडे लक्ष जाणार का, असा विचार हे दृष्य पाहणाऱ्याच्या मनात आल्याखेरीज राहत नाही. (प्रतिनिधी) गरजा पुरवणाऱ्यांच्या गरजा दुर्लक्षितशहरात श्रमाची गरज मोठ्या प्रमाणावर असते. ती पुरवण्यासाठी दूरदूरचे लोक शहरानजीक वस्ती करून राहतात आणि झोपडपट्ट्या वाढत जातात. मर्यादित उत्पन्नगटाच्या कुटुंबांना स्वस्त वस्तूंची गरज भासते. ही गरजही याच झोपड्यांमधील लोक पुरवतात. श्रम आणि स्वस्त वस्तू विकून पोटाची खळगी भरणाऱ्या या गोरगरिबांना मात्र प्राथमिक सुविधाही मिळत नाहीत. त्यांच्या झोपड्या ‘अनधिकृत’ असतात, हे सर्वज्ञात आहे; परंतु त्या ‘विनाकारण’ उभ्या राहिलेल्या नाहीत, एवढे तरी मान्य करावेच लागते. झोपड्यांमधील स्त्री-पुरुष कामासाठी दिवसभर बाहेर राहतात आणि पाणी आणण्यासारखी कामे घरातील लहान मुले-मुलीच करतात. प्राथमिक गरजेसाठी लहानग्यांचा जीव धोक्यात घातला जाणे भयावह आहे.