शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

‘जीवना’साठी जीव धोक्यात

By admin | Updated: December 7, 2015 00:28 IST

आस कळशीभर पाण्याची : सक्ती धावता महामार्ग ओलांडण्याची

सातारा : पाणी ही माणसाची प्राथमिक गरज असल्यामुळेच त्याला ‘जीवन’ म्हटले गेले आहे. जगण्यासाठी आत्यंतिक गरजेचे हे पाणी मिळवण्यासाठी मात्र अनेकांना जीवही धोक्यात घालावा लागतो. हीच हतबलता महामार्गालगत असलेल्या झोपडपट्टीतील मुलींमध्ये आढळून आली आहे. कळशीभर पाण्यासाठी त्या रोज जीव धोक्यात घालत आहेत. वाढे फाटा ते शिवराज चौक असा महामार्ग शहराजवळून गेला आहे. या मार्गावरून जाणाऱ्या वाहनांचा वेग प्रचंड असतो. आता या रस्त्याचे सहापदरीकरण झाल्यामुळे तो ओलांडणे केवळ भुयारी मार्गाने किंवा उड्डाणपुलावरूनच शक्य होणार आहे. अजस्र वाहनांच्या प्रचंड वेगासमोर आलेल्या व्यक्तीच्या क्षणार्धात ठिकऱ्या उडतील हे माहीत असूनही काही जणांना मात्र हा धोका दररोज पत्करावा लागतो आहे.महामार्गावर अजंठा चौकानजीक झोपड्या वाढल्या आहेत. तेथील लहानग्या मुलींना कळशीभर पाण्यासाठी दररोज महामार्ग धोकादायक रीतीने ओलांडून जावे लागत आहे. झोपडपट्टीत पाण्याची व्यवस्था नसल्याने या मुली पाण्याने भरलेली कळशी किंवा हंडा डोक्यावर घेऊन जिवाची पर्वा न करता महामार्ग ओलांडत असून, हे भयावह दृश्य एखाद्या दिवशी अपघाताला निमंत्रण देऊ शकते. अजंठा चौकात वाढत असणाऱ्या झोपडपट्टीतील काही मुली पाण्यासाठी महामार्ग ओलांडून पलीकडे जातात. महामार्ग सोडल्यावर दोनशे मीटर अंतरावर एक कूपनलिका आहे. तिथे घागरी भरून या ओझ्यासह पुन्हा महामार्ग ओलांडतात. अनेकदा त्यांना वाहनांच्या वेगाचा अंदाज येत नाही. मग त्यांची धावाधाव होते. वेगवान वाहनाचे ब्रेक लागले नाहीत, तर अनर्थ ओढवू शकतो.यावर्षी पाणीटंचाईचे संकट जिल्ह्यात सर्वत्र गडद होत आहे. शहरांमधूनही मोठ्या प्रमाणावर पाणीकपात केली जात आहे. अशा वेळी ज्यांच्याकडे पाणीपुरवठ्याची मूलभूत सुविधा उपलब्धच नाही, नळाचे कनेक्शन नाही, त्यांच्याकडे प्रशासनाचे लक्ष जाणे दुरापास्तच आहे. तथापि, महामार्गावर एखादी दुर्घटना घडल्यानंतरच प्रशासनाचे या चिमुकल्यांच्या कसरतीकडे लक्ष जाणार का, असा विचार हे दृष्य पाहणाऱ्याच्या मनात आल्याखेरीज राहत नाही. (प्रतिनिधी) गरजा पुरवणाऱ्यांच्या गरजा दुर्लक्षितशहरात श्रमाची गरज मोठ्या प्रमाणावर असते. ती पुरवण्यासाठी दूरदूरचे लोक शहरानजीक वस्ती करून राहतात आणि झोपडपट्ट्या वाढत जातात. मर्यादित उत्पन्नगटाच्या कुटुंबांना स्वस्त वस्तूंची गरज भासते. ही गरजही याच झोपड्यांमधील लोक पुरवतात. श्रम आणि स्वस्त वस्तू विकून पोटाची खळगी भरणाऱ्या या गोरगरिबांना मात्र प्राथमिक सुविधाही मिळत नाहीत. त्यांच्या झोपड्या ‘अनधिकृत’ असतात, हे सर्वज्ञात आहे; परंतु त्या ‘विनाकारण’ उभ्या राहिलेल्या नाहीत, एवढे तरी मान्य करावेच लागते. झोपड्यांमधील स्त्री-पुरुष कामासाठी दिवसभर बाहेर राहतात आणि पाणी आणण्यासारखी कामे घरातील लहान मुले-मुलीच करतात. प्राथमिक गरजेसाठी लहानग्यांचा जीव धोक्यात घातला जाणे भयावह आहे.