शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

शेतीसाठी करावी लागताहेत जीवघेणी कामे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:37 IST

बामणोली : या परिसरात असणारे मुबलक व प्रचंड मोठे असे ऐनाचे वृक्ष. या झाडाचा पाला शेंड्यापर्यंत सुमारे १५० फूट ...

बामणोली : या परिसरात असणारे मुबलक व प्रचंड मोठे असे ऐनाचे वृक्ष. या झाडाचा पाला शेंड्यापर्यंत सुमारे १५० फूट उंचीपर्यंत जाऊन जमा करत आहेत. हे मोठे धाडसी व जीवघेणे काम आहे. कारण कमरेला आकडीत कोयता ठेवून ऐनाच्या प्रचंड उंच शेंड्यापर्यंत जाऊन डहाळी तोडायची असते. पाय सुटून तोल जाऊन खाली पडले, तर मृत्यूच. यापूर्वी काही शेतकऱ्यांनी आपला जीवही गमावलेला आहे. परंतु या कामाशिवाय पर्याय नाही, असे शेतकरी सांगतात.

या शेतीच्या कामाला ‘कवळे’ बांधणी असे म्हणतात. हा जमा केलेला पाला होळीनंतर तरवा करून जाळतात व त्यावर भाताची रोपे तयार करतात. एवढ्या उंच ऐनाच्या झाडावर चढणे हे एक अतिकष्टाचे काम असते; परंतु बामणोली व तापोळा परिसरातील शेतकरी हे कष्टाचे काम वर्षानुवर्षे लिलया पार पाडत आहेत. या झाडाच्या डहाळीचा पाला गोळा करण्यात पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही, कारण याच डहाळीची पाने गळतीने उन्हाळ्यात गळून पडत असतात. डहाळी तोडल्याने झाडाला कोणतीही इजा पोहोचत नाही. ऐनाचे झाड उलट जास्त उंचीपर्यंत वाढत असते. त्याची कोणतीही फांदी तोडली जात नाही. शेतीला अशा कष्टाच्या कामाशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच हे शेतकरी म्हणतात. ‘आम्ही तापोळा बामणोलीचे शेतकरी, पर्वत झाडे लीलया सर करी..’

(कोट १)

भाताचे तरवे बनविण्यासाठी आम्हाला पालापाचोळा लागतो. म्हणून आम्ही शेताच्या बांधावर असणाऱ्या ऐनाच्या झाडाचा पाला गोळा करून त्याची कवळे बांधून ठेवतो व होळीनंतर भाताच्या खाचरात भाजणी करतो. भाजणी केली नाही, तर भाताचे रोप कसदार होत नाही. तण उगवते, कारण या जमिनीत विषाणूंचे प्रमाण जास्त आहे. ऐनाच्या झाडावर चढून कवळे करणे फार जीवघेणे काम असते. यामध्ये कुशल असणारे शेतकरीच झाडावर चढतात. पाला काढल्याने झाडाची वाढ अजिबात कमी होत नाही. भाजणी वावरात होणारी झाडाची पानगळती थांबते. आमचा हा पूर्वपारंपरिक चालत आलेला शेती व्यवसाय आहे.

- गोपाळ शिंदे, शेतकरी, म्हावशी

(कोट २)

बामणोली परिसरातील शेतकरी अनेक वर्षांपासून ऐन या झाडाचा पाला शेतीसाठी गोळा करतात. ही सर्व झाडे त्यांच्या वैयक्तिक मालकीची आहेत. पाला गोळा केल्याने पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. कारण या झाडांची संपूर्ण पानगळती मार्च महिन्यापर्यंत होत असते. ऐन झाडांची पाने तोडल्याने झाडाची वाढ सरळपणे व चांगली होते.

- श्रीरंग शिंदे, वनपाल, बामणोली

फोटो आहे..

१३बामणोली

तापोळा परिसरातील शेतकरी जीव धोक्यात घालून ऐनाच्या झाडावर चढत डहाळी तोडत आहेत.