शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

शेतीसाठी करावी लागताहेत जीवघेणी कामे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:37 IST

बामणोली : या परिसरात असणारे मुबलक व प्रचंड मोठे असे ऐनाचे वृक्ष. या झाडाचा पाला शेंड्यापर्यंत सुमारे १५० फूट ...

बामणोली : या परिसरात असणारे मुबलक व प्रचंड मोठे असे ऐनाचे वृक्ष. या झाडाचा पाला शेंड्यापर्यंत सुमारे १५० फूट उंचीपर्यंत जाऊन जमा करत आहेत. हे मोठे धाडसी व जीवघेणे काम आहे. कारण कमरेला आकडीत कोयता ठेवून ऐनाच्या प्रचंड उंच शेंड्यापर्यंत जाऊन डहाळी तोडायची असते. पाय सुटून तोल जाऊन खाली पडले, तर मृत्यूच. यापूर्वी काही शेतकऱ्यांनी आपला जीवही गमावलेला आहे. परंतु या कामाशिवाय पर्याय नाही, असे शेतकरी सांगतात.

या शेतीच्या कामाला ‘कवळे’ बांधणी असे म्हणतात. हा जमा केलेला पाला होळीनंतर तरवा करून जाळतात व त्यावर भाताची रोपे तयार करतात. एवढ्या उंच ऐनाच्या झाडावर चढणे हे एक अतिकष्टाचे काम असते; परंतु बामणोली व तापोळा परिसरातील शेतकरी हे कष्टाचे काम वर्षानुवर्षे लिलया पार पाडत आहेत. या झाडाच्या डहाळीचा पाला गोळा करण्यात पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही, कारण याच डहाळीची पाने गळतीने उन्हाळ्यात गळून पडत असतात. डहाळी तोडल्याने झाडाला कोणतीही इजा पोहोचत नाही. ऐनाचे झाड उलट जास्त उंचीपर्यंत वाढत असते. त्याची कोणतीही फांदी तोडली जात नाही. शेतीला अशा कष्टाच्या कामाशिवाय पर्याय नाही. त्यामुळेच हे शेतकरी म्हणतात. ‘आम्ही तापोळा बामणोलीचे शेतकरी, पर्वत झाडे लीलया सर करी..’

(कोट १)

भाताचे तरवे बनविण्यासाठी आम्हाला पालापाचोळा लागतो. म्हणून आम्ही शेताच्या बांधावर असणाऱ्या ऐनाच्या झाडाचा पाला गोळा करून त्याची कवळे बांधून ठेवतो व होळीनंतर भाताच्या खाचरात भाजणी करतो. भाजणी केली नाही, तर भाताचे रोप कसदार होत नाही. तण उगवते, कारण या जमिनीत विषाणूंचे प्रमाण जास्त आहे. ऐनाच्या झाडावर चढून कवळे करणे फार जीवघेणे काम असते. यामध्ये कुशल असणारे शेतकरीच झाडावर चढतात. पाला काढल्याने झाडाची वाढ अजिबात कमी होत नाही. भाजणी वावरात होणारी झाडाची पानगळती थांबते. आमचा हा पूर्वपारंपरिक चालत आलेला शेती व्यवसाय आहे.

- गोपाळ शिंदे, शेतकरी, म्हावशी

(कोट २)

बामणोली परिसरातील शेतकरी अनेक वर्षांपासून ऐन या झाडाचा पाला शेतीसाठी गोळा करतात. ही सर्व झाडे त्यांच्या वैयक्तिक मालकीची आहेत. पाला गोळा केल्याने पर्यावरणाची कोणतीही हानी होत नाही. कारण या झाडांची संपूर्ण पानगळती मार्च महिन्यापर्यंत होत असते. ऐन झाडांची पाने तोडल्याने झाडाची वाढ सरळपणे व चांगली होते.

- श्रीरंग शिंदे, वनपाल, बामणोली

फोटो आहे..

१३बामणोली

तापोळा परिसरातील शेतकरी जीव धोक्यात घालून ऐनाच्या झाडावर चढत डहाळी तोडत आहेत.