शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीचा खून करणाऱ्या डॉक्टरला जन्मठेप

By admin | Updated: May 17, 2016 01:47 IST

कऱ्हाड न्यायालयाचा निकाल : कौटुंबिक वादातून आवळला होता गळा

कऱ्हाड : कौटुंबिक वादातून गर्भवती पत्नीचा गळा आवळून खून करणाऱ्या डॉक्टरला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. एम. आर. देशपांडे यांनी सोमवारी ही शिक्षा सुनावली. डॉ. महेश शामराव पवार (वय ३८, मूळ रा. पाल, ता. कऱ्हाड, सध्या रा. तारळे, ता. पाटण) असे आरोपीचे नाव आहे. पाल येथील डॉ. महेश पवार याचा दि. ३ जून २००५ रोजी कुमठे येथील राजश्री यांच्याशी विवाह झाला. राजश्री यासुद्धा डॉक्टर होत्या. विवाहानंतर पाटण तालुक्यातील तारळे येथे डॉ. महेश व डॉ. राजश्री यांनी स्वतंत्र दोन रुग्णालये सुरू केली. त्यावेळी हे दाम्पत्य त्याचठिकाणी राहण्यास होते. कालांतराने राजश्री यांनी एका मुलीस जन्म दिला. त्या मुलीचे नाव सई ठेवण्यात आले. २००७ मध्ये राजश्री या पुन्हा गर्भवती राहिल्या. दरम्यानच्या कालावधीत राजश्री व महेश यांच्यात कौटुंबिक वाद होत होता. अशातच दि. २० नोव्हेंबर २००७ रोजी पहाटे पाचच्या सुमारास डॉ. राजश्री यांना कऱ्हाडातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी त्या बेशुद्ध होत्या. बाथरूममध्ये पाय घसरून पडल्याने त्या जखमी झाल्याचे सांगण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर काही वेळातच डॉ. राजश्री यांचा मृत्यू झाला. डॉ. राजश्री यांचा गळा आवळून खून केल्याचे शवविच्छेदनानंतर स्पष्ट झाले. त्याबाबत मृत राजश्री यांचे वडील अर्जुन सावंत (रा. कुमठे, ता. कोरेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उंब्रज पोलिस ठाण्यात पवार याच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक पी. के. पाटील यांनी याचा तपास करून न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र सादर केले. सरकार पक्षाच्या वतीने अ‍ॅड. राजेंद्र शहा यांनी काम पाहिले. त्यांनी १२ साक्षीदार तपासले. सरकार पक्षाचा युक्तिवाद व सादर करण्यात आलेले पुरावे ग्राह्य मानून न्या. एम. आर. देशपांडे यांनी डॉ. महेश पवारला जन्मठेप, तीन हजार रुपये दंड व दंड न दिल्यास तीन महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली.डॉक्टरचा बनाव अखेर उघडडॉ. राजश्री या पाय घसरून पडल्याचे सांगण्यात आले होते. तसेच त्यावेळी ‘मी घरी नव्हतो, कऱ्हाडात होतो,’ असा बनावही पती डॉ. महेश पवारने केला होता. मात्र, त्याचा हा बनाव अखेर उघड झाला. राजश्री यांच्या शरीरावर कसल्याही जखमा नसल्याचे व त्यांच्या डोक्यालाही इजा झाली नसल्याचे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले.