शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
4
UN परिषदेत १४२ देशांसह भारतानं उचललं मोठं पाऊल; अमेरिका अन् इस्रायलला बसला झटका, काय घडलं?
5
फवाद-वाणी कपूरचा 'अबीर गुलाल' भारतातही रिलीज होणार, पहलगाम हल्ल्यानंतर झाला होता बॅन
6
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
7
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
8
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
9
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
10
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
11
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
12
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
13
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
14
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
15
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
16
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
17
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
18
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
19
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
20
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू

शेरेचीवाडी ग्रामविकास पथदर्शी ठरवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST

वाठार निंबाळकर : ‘शेरेचीवाडी ग्रामपंचायत ही गावच्या विविध विकासकामांच्या पूर्ततेसाठी नियोजनबद्ध पाठपुरावा करत आहे. त्यांनी ग्रामविकासासाठी ठेवलेले ध्येय ...

वाठार निंबाळकर : ‘शेरेचीवाडी ग्रामपंचायत ही गावच्या विविध विकासकामांच्या पूर्ततेसाठी नियोजनबद्ध पाठपुरावा करत आहे. त्यांनी ग्रामविकासासाठी ठेवलेले ध्येय व यासाठी ग्रामस्थांची असलेली एकजूट निश्‍चितपणे दिशादर्शक अशी आहे. शासन, प्रशासन व लोकसहभाग या मार्गांनी होत असलेल्या प्रयत्नांमुळे हे गाव निश्चितपणे भविष्यात ग्रामविकासाचे पथदर्शी ठरेल,’ असा विश्वास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी केले.

शेरेचीवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे, पंचायत समिती. सदस्य राहुल शिंदे, सरपंच दुर्गादेवी, रविंद्र नलवडे,

ग्रामपंचायत सदस्या राणी चव्हाण, अभिजित मोहिते, शीतल फडतरे, महेश बिचुकले, तलाठी विनायकराव गाडे, ग्रामसेविका मोनिका मुळीक, श्रीरंग चव्हाण, उज्ज्वला गुरव, दिनकर चव्हाण, दीपक नलवडे, राहुल नलवडे, हंबीरराव मोहिते, लालासाहेब नलवडे, ज्योतिराम चव्हाण, स्नेहल मोहिते, संदीप शिंदे, दशरथ ढेंबरे, सचिन शिंदे, संदीप पवार, सुकुमार नलवडे, मनोहर मोहिते, बाळासाहेब ढवळे, अंकित नलवडे, प्रतीक चव्हाण, सूरज नलवडे, सचिन मोहिते, दिलीप जगदाळे, दादासाहेब रिटे, राम घाडगे, विठ्ठल माने, सुहास डांगे, संतोष मोहिते उपस्थित होते.

फडतरे म्हणाले, ‘पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे.’

उपसभापती संतोष साळुंखे म्हणाले, ‘शेरेचीवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी यांनी विकासकामांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून गावच्या सर्वांगीण विकासाकरिता लाखोंचा निधी मंजूर केला आहे. यामुळे गावच्या विकासाला निश्चितपणे दिशा मिळणार आहे. शेरेचीवाडी ग्रामपंचायतीने ग्रामविकासाच्या अनुषंगाने शासनाच्या प्रत्येक योजना प्रभावीपणे राबवून आदर्श गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहू.’

हणमंतराव चव्हाण यांनी प्रास्तविक केले. संजय ढेंबरे यांनी स्वागत केले. विक्रमसिंह नलवडे यांनी आभार मानले.