शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
6
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
7
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
8
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
9
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
10
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
11
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
12
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
13
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
14
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
15
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
16
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
17
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
18
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
19
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
20
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
Daily Top 2Weekly Top 5

शेरेचीवाडी ग्रामविकास पथदर्शी ठरवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST

वाठार निंबाळकर : ‘शेरेचीवाडी ग्रामपंचायत ही गावच्या विविध विकासकामांच्या पूर्ततेसाठी नियोजनबद्ध पाठपुरावा करत आहे. त्यांनी ग्रामविकासासाठी ठेवलेले ध्येय ...

वाठार निंबाळकर : ‘शेरेचीवाडी ग्रामपंचायत ही गावच्या विविध विकासकामांच्या पूर्ततेसाठी नियोजनबद्ध पाठपुरावा करत आहे. त्यांनी ग्रामविकासासाठी ठेवलेले ध्येय व यासाठी ग्रामस्थांची असलेली एकजूट निश्‍चितपणे दिशादर्शक अशी आहे. शासन, प्रशासन व लोकसहभाग या मार्गांनी होत असलेल्या प्रयत्नांमुळे हे गाव निश्चितपणे भविष्यात ग्रामविकासाचे पथदर्शी ठरेल,’ असा विश्वास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी केले.

शेरेचीवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे, पंचायत समिती. सदस्य राहुल शिंदे, सरपंच दुर्गादेवी, रविंद्र नलवडे,

ग्रामपंचायत सदस्या राणी चव्हाण, अभिजित मोहिते, शीतल फडतरे, महेश बिचुकले, तलाठी विनायकराव गाडे, ग्रामसेविका मोनिका मुळीक, श्रीरंग चव्हाण, उज्ज्वला गुरव, दिनकर चव्हाण, दीपक नलवडे, राहुल नलवडे, हंबीरराव मोहिते, लालासाहेब नलवडे, ज्योतिराम चव्हाण, स्नेहल मोहिते, संदीप शिंदे, दशरथ ढेंबरे, सचिन शिंदे, संदीप पवार, सुकुमार नलवडे, मनोहर मोहिते, बाळासाहेब ढवळे, अंकित नलवडे, प्रतीक चव्हाण, सूरज नलवडे, सचिन मोहिते, दिलीप जगदाळे, दादासाहेब रिटे, राम घाडगे, विठ्ठल माने, सुहास डांगे, संतोष मोहिते उपस्थित होते.

फडतरे म्हणाले, ‘पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे.’

उपसभापती संतोष साळुंखे म्हणाले, ‘शेरेचीवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी यांनी विकासकामांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून गावच्या सर्वांगीण विकासाकरिता लाखोंचा निधी मंजूर केला आहे. यामुळे गावच्या विकासाला निश्चितपणे दिशा मिळणार आहे. शेरेचीवाडी ग्रामपंचायतीने ग्रामविकासाच्या अनुषंगाने शासनाच्या प्रत्येक योजना प्रभावीपणे राबवून आदर्श गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहू.’

हणमंतराव चव्हाण यांनी प्रास्तविक केले. संजय ढेंबरे यांनी स्वागत केले. विक्रमसिंह नलवडे यांनी आभार मानले.