शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

शेरेचीवाडी ग्रामविकास पथदर्शी ठरवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST

वाठार निंबाळकर : ‘शेरेचीवाडी ग्रामपंचायत ही गावच्या विविध विकासकामांच्या पूर्ततेसाठी नियोजनबद्ध पाठपुरावा करत आहे. त्यांनी ग्रामविकासासाठी ठेवलेले ध्येय ...

वाठार निंबाळकर : ‘शेरेचीवाडी ग्रामपंचायत ही गावच्या विविध विकासकामांच्या पूर्ततेसाठी नियोजनबद्ध पाठपुरावा करत आहे. त्यांनी ग्रामविकासासाठी ठेवलेले ध्येय व यासाठी ग्रामस्थांची असलेली एकजूट निश्‍चितपणे दिशादर्शक अशी आहे. शासन, प्रशासन व लोकसहभाग या मार्गांनी होत असलेल्या प्रयत्नांमुळे हे गाव निश्चितपणे भविष्यात ग्रामविकासाचे पथदर्शी ठरेल,’ असा विश्वास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी केले.

शेरेचीवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे, पंचायत समिती. सदस्य राहुल शिंदे, सरपंच दुर्गादेवी, रविंद्र नलवडे,

ग्रामपंचायत सदस्या राणी चव्हाण, अभिजित मोहिते, शीतल फडतरे, महेश बिचुकले, तलाठी विनायकराव गाडे, ग्रामसेविका मोनिका मुळीक, श्रीरंग चव्हाण, उज्ज्वला गुरव, दिनकर चव्हाण, दीपक नलवडे, राहुल नलवडे, हंबीरराव मोहिते, लालासाहेब नलवडे, ज्योतिराम चव्हाण, स्नेहल मोहिते, संदीप शिंदे, दशरथ ढेंबरे, सचिन शिंदे, संदीप पवार, सुकुमार नलवडे, मनोहर मोहिते, बाळासाहेब ढवळे, अंकित नलवडे, प्रतीक चव्हाण, सूरज नलवडे, सचिन मोहिते, दिलीप जगदाळे, दादासाहेब रिटे, राम घाडगे, विठ्ठल माने, सुहास डांगे, संतोष मोहिते उपस्थित होते.

फडतरे म्हणाले, ‘पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे.’

उपसभापती संतोष साळुंखे म्हणाले, ‘शेरेचीवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी यांनी विकासकामांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून गावच्या सर्वांगीण विकासाकरिता लाखोंचा निधी मंजूर केला आहे. यामुळे गावच्या विकासाला निश्चितपणे दिशा मिळणार आहे. शेरेचीवाडी ग्रामपंचायतीने ग्रामविकासाच्या अनुषंगाने शासनाच्या प्रत्येक योजना प्रभावीपणे राबवून आदर्श गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहू.’

हणमंतराव चव्हाण यांनी प्रास्तविक केले. संजय ढेंबरे यांनी स्वागत केले. विक्रमसिंह नलवडे यांनी आभार मानले.