शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

शेरेचीवाडी ग्रामविकास पथदर्शी ठरवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST

वाठार निंबाळकर : ‘शेरेचीवाडी ग्रामपंचायत ही गावच्या विविध विकासकामांच्या पूर्ततेसाठी नियोजनबद्ध पाठपुरावा करत आहे. त्यांनी ग्रामविकासासाठी ठेवलेले ध्येय ...

वाठार निंबाळकर : ‘शेरेचीवाडी ग्रामपंचायत ही गावच्या विविध विकासकामांच्या पूर्ततेसाठी नियोजनबद्ध पाठपुरावा करत आहे. त्यांनी ग्रामविकासासाठी ठेवलेले ध्येय व यासाठी ग्रामस्थांची असलेली एकजूट निश्‍चितपणे दिशादर्शक अशी आहे. शासन, प्रशासन व लोकसहभाग या मार्गांनी होत असलेल्या प्रयत्नांमुळे हे गाव निश्चितपणे भविष्यात ग्रामविकासाचे पथदर्शी ठरेल,’ असा विश्वास जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे यांनी केले.

शेरेचीवाडी येथील ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित वृक्षारोपणप्रसंगी ते बोलत होते. या वेळी खटाव पंचायत समितीचे माजी उपसभापती संतोष साळुंखे, पंचायत समिती. सदस्य राहुल शिंदे, सरपंच दुर्गादेवी, रविंद्र नलवडे,

ग्रामपंचायत सदस्या राणी चव्हाण, अभिजित मोहिते, शीतल फडतरे, महेश बिचुकले, तलाठी विनायकराव गाडे, ग्रामसेविका मोनिका मुळीक, श्रीरंग चव्हाण, उज्ज्वला गुरव, दिनकर चव्हाण, दीपक नलवडे, राहुल नलवडे, हंबीरराव मोहिते, लालासाहेब नलवडे, ज्योतिराम चव्हाण, स्नेहल मोहिते, संदीप शिंदे, दशरथ ढेंबरे, सचिन शिंदे, संदीप पवार, सुकुमार नलवडे, मनोहर मोहिते, बाळासाहेब ढवळे, अंकित नलवडे, प्रतीक चव्हाण, सूरज नलवडे, सचिन मोहिते, दिलीप जगदाळे, दादासाहेब रिटे, राम घाडगे, विठ्ठल माने, सुहास डांगे, संतोष मोहिते उपस्थित होते.

फडतरे म्हणाले, ‘पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठ्या प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड, जंगलांचा नाश या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभावीपणे मात करायची असल्यास काळाची गरज ओळखून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण व त्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे.’

उपसभापती संतोष साळुंखे म्हणाले, ‘शेरेचीवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच व पदाधिकारी यांनी विकासकामांसाठी शासन व प्रशासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून गावच्या सर्वांगीण विकासाकरिता लाखोंचा निधी मंजूर केला आहे. यामुळे गावच्या विकासाला निश्चितपणे दिशा मिळणार आहे. शेरेचीवाडी ग्रामपंचायतीने ग्रामविकासाच्या अनुषंगाने शासनाच्या प्रत्येक योजना प्रभावीपणे राबवून आदर्श गाव निर्माण करण्यासाठी प्रयत्न करावेत. यासाठी लागणारी सर्वतोपरी मदत करण्यासाठी प्रयत्नशील राहू.’

हणमंतराव चव्हाण यांनी प्रास्तविक केले. संजय ढेंबरे यांनी स्वागत केले. विक्रमसिंह नलवडे यांनी आभार मानले.