शहरं
Join us  
Trending Stories
1
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
2
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
3
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
4
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
5
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
6
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
7
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
8
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
9
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
10
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
12
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा
13
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
14
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
15
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
16
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल
17
‘या’ ३ तारखांना जन्मलेले लोक भाग्यवान, पैसा कमी पडत नाही; गणपती देतो अपार सुख, लक्ष्मी वरदान!
18
कॅनरा बँकेला ११७ कोटींचा गंडा; अमित थेपाडेला अटक, ईडीची दक्षिण मुंबईतील हॉटेलमध्ये कारवाई
19
मेड इन इंडिया 'ई-विटारा'ची १०० देशांमध्ये होणार निर्यात; पंतप्रधान मोदी म्हणाले, "भारताच्या आत्मनिर्भर आणि..."
20
भयंकर! बांगलादेशात नदीमध्ये सापडतायेत मृतदेह; आतापर्यंत ७५० बॉडी पोलिसांनी मोजल्या, कारण काय?

नुकसान भरपाईकडे शेतकऱ्यांची पाठ

By admin | Updated: January 29, 2015 23:32 IST

जावळीतील चित्र : पैसे न नेल्यास पुन्हा होणार जमा

मेढा : ‘जावळी तालुक्यातील गतवर्षी २०१३ मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने मदत १ कोटी ३१ लाख ८ हजारांचा आर्थिक मदत दिली असून, यापैकी ५ लाख ६१ हजारांची मदत अद्याप शेतकऱ्यांनी घेतली नसून संबंधित शेतकऱ्यांनी ती त्वरित घ्यावी,’ असे आवाहन जावळीचे तहसीलदार रणजित देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी हे अनुदान न उचलल्यास शासनाकडे संबंधित रक्कम परत करण्यात येईल, असेही देसाई यांनी यावेळी सांगितले.याबाबत जावळीचे तहसीलदार रणजित देसाई यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, याबाबत तालुक्यातील गाव कामगार तलाठी, मंडल अधिकारी यांनी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना याबाबत मध्यवर्ती बँकेत खाते उघडून अनुदानाची रक्कम घेण्यास सांगितले आहे. तसेच शेतकऱ्यांना नोटीस देऊन, परगावी असणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरावर नोटीस चिटकवून प्रसिद्धी देण्यात आली आहे.मात्र अद्याप तालुक्यातील ५२० शेतकऱ्यांनी अनुदानाची रक्कम न घेतल्यामुळे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मेढा, भणंग, गांजे, केळघर, करहर, तापोळा व हुमगाव या शाखांमध्ये एकूण ५ लाख ६१ हजार ४०५ रुपये शिल्लक आहेत. संबंधित शेतकऱ्यांनी येत्या आठवडाभरात हे अनुदान खात्यातून काढून न घेतल्यास रक्कम शासनास परत करण्यात येईल, असेही तहसीलदार रणजित देसाई यांनी स्पष्ट केले आहे.जावळी तालुक्यातील अनेक गावांमध्ये शासनाच्यावतीने नोटीसी चिटकवून माहिती दिली आहे. मात्र, शेतकरी अजूनही संबंधित रक्कम घ्यायला न आल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शेतकऱ्यांनी वेळेत पैसे नेले नाहीत तर हा सर्व निधी पुन्हा शासनाकडे परत जाईल, असेही देसाई यांनी सांगितले. त्यामुळे लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने ही मदत योग्य आणि आवश्यक कागदपत्रे दाखवून घेवून जावे, असे आवाहन केले आहे. (वार्ताहर)१०१ गावांसाठी १ कोटी ३१ लाखजावळी तालुक्यात जून, जुलै २०१३ मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे १०९ गावांमध्ये ५० टक्क््यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाकडून १ कोटी ३१ लाख ८ हजारांचे अनुदान प्राप्त झाले. हे अनुदान सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या जावळी तालुक्यातील विविध शाखांमार्फत आपद्ग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली आहे.