शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

चचेगाव परिसरात बिबट्याचा वावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:26 IST

कऱ्हाड : चचेगाव, ता. कऱ्हाड परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. भरदिवसाही काही शेतकऱ्यांना त्याचे दर्शन होत आहे. परिसरातील काही ...

कऱ्हाड : चचेगाव, ता. कऱ्हाड परिसरात बिबट्याचा वावर वाढला आहे. भरदिवसाही काही शेतकऱ्यांना त्याचे दर्शन होत आहे. परिसरातील काही श्वानांचाही त्याने फडशा पडला असून, परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. गत काही महिन्यांपासून सुपने, काले, नारायणवाडी, आटके, चचेगाव, वहागाव, तळबीड परिसरात बिबट्याचे दर्शन होत आहे. दोन महिन्यांपूर्वी वनवासमाची परिसरात दोन बछड्यांचा वावर असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यापूर्वी आगाशिव डोंगर परिसरातील धोंडेवाडी, जखिणवाडी, तसेच मलकापूर परिसरात बिबट्याने हल्ला करत शेळ्या तसेच मोकाट श्वान फस्त केले आहेत. सध्या चचेगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

आर्थिक मदतीपासून व्यावसायिक वंचित

कऱ्हाड : गुहाघर-विजापूर महामार्गावरील ओगलेवाडी येथील बाजार चौकातील व्यावसायिकांना लॉकडाऊनचा फटका बसला आहे. छोट्या व्यावसायिकांना शासनाची दीड हजार रुपयांची आर्थिक मदत अद्याप मिळाली नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. ओगलेवाडी येथील बाजार चौकात भेळ, वडापाव, पाणीपुरी, इडली सांबर, चायनीज फूड, उसाचा रस, मसाला दूध, फळे आदींची विक्री करणारे सुमारे पंधरा व्यावसायिक आहेत. त्यांना लॉकडाऊनला तोंड द्यावे लागले आहे. सध्या व्यवसायच बंद असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

अंतर्गत रस्त्यांवर कचऱ्याचे ढीग

कऱ्हाड : येथील अंतर्गत पेठांमधील चौकात कचऱ्याचे ढीग साचत आहेत. पालिकेची घंटागाडी सकाळी एकदाच येऊन गेल्यानंतर दिवसभर नागरिक चौकातील रस्त्याकडेला कचरा टाकत असून, त्यातून ढीग साचत आहे. याचा प्रवाशांना नाहक त्रास होत आहे. पालिकेने याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी रहिवाशांमधून होत आहे. पालिकेची घंटागाडी सकाळी व संध्याकाळी अंतर्गत पेठांमध्ये पाठविण्यात यावी, अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.

कोळे विभागात मोकाट श्वानांचा उपद्रव वाढला

कुसूर : कोळे, ता. कऱ्हाड परिसरात मोकाट श्वानांच्या उपद्रवात वाढ झाली असल्याने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. या मोकाट श्वानांनी परिसरातील काही गावांमध्ये दहा दिवसांत अनेक पाळीव जनावरांवर हल्ले केले आहेत. होणारे नुकसान टाळण्यासाठी ग्रामपंचायतीने तत्काळ या श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.