शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण-नगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
2
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
3
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
4
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
5
घराची सफाई करताना सापडलं 'सर्वात सुंदर' नाणं; १.३७ कोटी रुपयांना झाली विक्री, काय आहे खास?
6
VIDEO: लाडक्या 'आशाताईं'ना शेवटचा निरोप देताना सचिन तेंडुलकरला अश्रू अनावर
7
कागदावर २५ हजार सॅलरी अन् प्रत्यक्षात १५००० देतात...; कंपन्यांकडून शोषण, कर्मचारी भडकले
8
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
9
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
10
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
11
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
12
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
13
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
14
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
15
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
16
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
17
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
18
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
19
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
20
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
Daily Top 2Weekly Top 5

माहेरपणासाठी आलेली लेक आणि आईही ढिगाऱ्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:41 IST

देवरूखकरवाडीत राहणाऱ्या ७५ वर्षांच्या राहीबाई मारुती कोंडाळकर यांची मुलगी भीमाबाई सखाराम वाशिवले (वय ५२) या गावापासून अवघ्या पाच किलोमीटर ...

देवरूखकरवाडीत राहणाऱ्या ७५ वर्षांच्या राहीबाई मारुती कोंडाळकर यांची मुलगी भीमाबाई सखाराम वाशिवले (वय ५२) या गावापासून अवघ्या पाच किलोमीटर अंतरावर वाशिवले येते राहत होत्या. आईची प्रकृती बरी नसल्यामुळे शुश्रूषेसाठी त्या राहिल्या होत्या. पावसाचा जोर वाढलेला असल्याने, ‘आता काय अडलंय तुझं, कशाला जायची गडबड करतीस’ असं म्हणत त्यांच्या आईने मुक्कामी राहायला सांगितले. आपण घरी येत नसल्याचे कुटुंबीयांना कळविल्यानंतर या मायलेकी घरातच होत्या. पावसाचा जोर वाढला आणि वीज गेली. त्यानंतर थोड्या वेळातच त्यांच्या घरावर दरड कोसळली. माहेरपणासाठी आलेली ही लेक आईसह या ढिगाऱ्याखाली जागेवरच ठार झाली.

‘एनडीआरएफ’चं वाईकरांना भारीच अप्रूप

सांस्कृतिक समृद्धीबरोबर नैसर्गिक श्रीमंती हे वाईकरांचे वैशिष्ट्य आहे. मांढरदेवची दुर्घटना सोडली तर वाईकरांना हादरवून सोडेल असा प्रसंग खचितच घडला असेल. ‘संथ वाहते कृष्णामाई’ म्हणत वर्षानुवर्षे येथे वास्तव्य करणाऱ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात आलेली नैसर्गिक आपत्ती पहिल्यांदाच पाहिली. त्यामुळे देवरूखकरवाडीत होणाऱ्या प्रत्येक घटनेचे अपडेट वाईकरांना होते. बाधितांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी बलकवडी धरणातून जोर आणि जाधववाडीत दाखल होण्यासाठी ‘एनडीआरएफ’ टीमला पाचारण करण्यात आले. सैनिकी वाहनांमधून येणाऱ्या या टीमच्या सदस्यांचे आभार मानायला लोक रस्त्यावर उभे राहिले होते.

मायलेकरांच्या बलिदानाने डोळ्यांत पाझर!

शेजारी व नातेवाइकांना संभाव्य दरड कोसळताना पाहून जोर गावच्या अनिता पांडुरंग सपकाळ यांनी जीवाची तमा न बाळगता गावकऱ्यांना मदत करण्यासाठी धाव घेतली. ग्रामस्थांना सुखरूप बाहेर काढत असतानाच दगडमातीचा लोंढा त्यांना ओढून घेऊन गेला. आईला वाहत जाताना पाहून त्यांना वाचविण्यासाठी मुलगा सचिन यानेही त्या अवाढव्य अजस्र लोंढ्यात स्वत:ला झोकून दिले. यात दोघांचाही मृत्यू झाला, पण त्याचे मातृप्रेम अजरामर झाले. या दोघांविषयी बोलताना अद्यापही ग्रामस्थांना हुंदका आवरत नाही. मायलेकरांच्या बलिदानाने आम्ही वाचलो, असं सांगताना ग्रामस्थांच्या डोळ्यांमध्ये अजूनही पाझर दिसतो.

कोट :

औषधांचा अजूनही तुटवडा

जोर भाग दुर्गम असल्याने तिथं शासकीय मदत पोहोचायला मर्यादा येत आहेत. सध्या गावातील प्रत्येक जण सर्दी, ताप, खोकला आणि जुलाब या आजारांनी त्रस्त आहे. शासकीय यंत्रणा खाण्याची सोय करतेय. तिथं आवश्यक असलेली वैद्यकीय मदत ग्रामस्थांपर्यंत पोहोचवणं आवश्यक आहे.

- मारूती गोळे, जोर

तब्बल दहा किलोमीटरची पायपीट

जोर परिसरात सगळीकडेच पाण्याचं साम्राज्य झालं आहे. या भागातून वाईला जायचं म्हटलं तर जंगल तुडवून तब्बल दहा किलोमीटरची पायपीट करावी लागतेय. घरातील आजारी लोकांना मिशन हॉस्पिटलला दाखल केल्याने त्यांच्या शुश्रूषेसाठी हा प्रवास गेले चार दिवस आम्ही करतोय.

- सुनील गोळे, गोळे वस्ती

आम्ही जगलो हेच चुकलं

पुराने आमच्या शेतीसह सगळंच वाहून नेलंय. मृत्यू झालेल्यांना शासन आर्थिक स्वरूपात मदत करतंय, पण या कठीण परिस्थितीत जगणाऱ्यांचाही विचार शासनाने केला पाहिजे. आम्ही जगलो म्हणून आमच्या कुटुंबीयांना मदत मिळू शकली नाही अशीच भावना आमच्या मनात निर्माण झालीये.

- शांताराम जाधव, जोर

आकाशच फाटलं, दुसरं काय

लग्न झाल्यापासून गेली ६० वर्षे मी या गावात राहिले. अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले, पण हा पाऊस सर्वाधिक भीषण आणि भयावह होता. अक्षरश: आकाश फाटल्यासारखा पाण्याचा लोट चारही दिशांनी वाहत होता. घरात शेजारी बसूनही परस्परांचे आवाज ऐकू येईनात. पावसाचं हे रूप मी पहिल्यांदाच पाहिलं.

- गंगूबाई जाधव, जोर

आता सुरुवात कुठून करावी?

शेतात पिकेल त्यावरच आम्ही गुजराण करतो. लेकरं मोठ्या शहरात गेल्यानं आम्ही गावाकडेच असतो. पै पै साठवून जीव मारून संसार उभा केला होता. अवदश्या पावसानं आमचं घरच मातीत गाडलं. चार दिवस झालं पातेलं दिसतं का परात म्हणून त्या मातीच्या ढिगाऱ्यात जाती. पण आमच्या घरची काहीच वस्तू दिसेना. सगळं गाडलं गेलंय. आता संसाराची सुरुवात कुठून करावी हेच समजेना.

- यादव, जोर