शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुली ‘लाॅक’ : बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिकच घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:27 IST

सातारा : जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून लाॅकडाऊन असल्यामुळे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना अधिकच घटल्या. त्यामुळे पोलिसांचेही काम हलके झाले. ...

सातारा : जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून लाॅकडाऊन असल्यामुळे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना अधिकच घटल्या. त्यामुळे पोलिसांचेही काम हलके झाले. दळणवळण पूर्णपणे बंद असल्यामुळे आणि रस्त्यारस्त्यांवर पोलिसांचा फाैजफाटा असल्यामुळे हे प्रकार टळले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात दरवर्षी अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढत असतात. जिल्ह्यात महिन्याकाठी १० ते १५ मुलींचे अपहरण होत असते. मात्र हे अपहरण लग्नाच्या आमिषाने सर्वाधिक होत असते. मुलीच्या ओळखीचा मित्र असो की नातेवाईक; तो या अपहरण प्रकरणात सहभागी असल्याचे अनेकदा समोर येते. कायद्याने मुलगी अल्पवयीन असल्यामुळे त्या मुलीचा शोध लावणे पोलिसांचे कर्तव्य असते. त्यामुळे अशा प्रकारे अपहरण झालेल्या मुलींचा पोलिसांना शोध घ्यावाच लागतो. गेल्या दीड वर्षात २८ मुलींचे अपहरण झाल्याचे समोर आले आहेत. यांतील २१ मुलींचा शोध लागला आहे.

अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेल्यानंतर आम्ही प्रथमत: तिच्या नातेवाइकांची माहिती घेतो; पण बऱ्याचदा मुलींचे प्रेमप्रकरण असते. अशा वेळी जो कोणी मुलींना पळवून नेतो, त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या मर्जीनेसुद्धा ती लग्न करू शकत नाही. त्यामध्ये पालक तक्रार देतात.

- सजन हंकारे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस ठाणे

पोलिसांना चार टक्के मुलींचा शोध लागेना

अनेकदा मुली घरातून रागाच्या भरात निघून जातात. अशा वेळी पोलिसांत तक्रार आल्यानंतर पोलीस तत्काळ मुलीला शोधून काढतात. मात्र, हाच प्रकार जर प्रेमप्रकरणाचा असेल तर पोलीस थोडी चालढकल करतात. तिने लग्न केले असेल, असे समजतात.

अपहरण झालेली मुलगी बऱ्याचदा ओळखीच्या मुलाबरोबर निघून जात असते. अशा वेळी जर त्यांचा फोन नंबर पोलिसांना मिळाला नाही, तर मग मुलीचा शोध लागणे अवघड बनते. तरीसुद्धा सध्या चार टक्के मुलींचा शोध पोलिसांना लागेना झाला आहे.

शोधकार्यात अडचणी काय?

प्रेमप्रकरणातून मुलगी घरातून निघून गेल्यानंतर त्या मुलीचा शोध लावणे पोलिसांपुढे आव्हान बनते. मुलगी परराज्यात गेली असल्यास किंवा स्वत:च्या मर्जीने गेली असल्यास ती सापडणे अवघड होते. अशा वेळी अनेकदा मुली मोबाइल वापरणे बंद करतात. त्यांना माहीत असते. पोलीस लोकेशनवरून आपला शोध घेतील. त्यामुळे पोलिसांना मुलींचा शोध घेणे अडचणीचे ठरते. काही मुली १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न करूनच घरी येतात. त्यावेळी मग अधिकच गुंता वाढतो.