शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
2
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
3
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
4
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
5
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
6
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
7
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
9
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
10
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
11
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
12
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
13
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
14
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
15
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
16
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
17
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
18
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
19
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल
20
"जबरदस्तीनं मिठीत घ्यायचा, शारीरिक जवळीक साधायचा, अन्..."; महिला क्रिकेटरच्या आरोपांनी खळबळ

अल्पवयीन मुली ‘लाॅक’ : बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिकच घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:27 IST

सातारा : जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून लाॅकडाऊन असल्यामुळे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना अधिकच घटल्या. त्यामुळे पोलिसांचेही काम हलके झाले. ...

सातारा : जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून लाॅकडाऊन असल्यामुळे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना अधिकच घटल्या. त्यामुळे पोलिसांचेही काम हलके झाले. दळणवळण पूर्णपणे बंद असल्यामुळे आणि रस्त्यारस्त्यांवर पोलिसांचा फाैजफाटा असल्यामुळे हे प्रकार टळले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात दरवर्षी अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढत असतात. जिल्ह्यात महिन्याकाठी १० ते १५ मुलींचे अपहरण होत असते. मात्र हे अपहरण लग्नाच्या आमिषाने सर्वाधिक होत असते. मुलीच्या ओळखीचा मित्र असो की नातेवाईक; तो या अपहरण प्रकरणात सहभागी असल्याचे अनेकदा समोर येते. कायद्याने मुलगी अल्पवयीन असल्यामुळे त्या मुलीचा शोध लावणे पोलिसांचे कर्तव्य असते. त्यामुळे अशा प्रकारे अपहरण झालेल्या मुलींचा पोलिसांना शोध घ्यावाच लागतो. गेल्या दीड वर्षात २८ मुलींचे अपहरण झाल्याचे समोर आले आहेत. यांतील २१ मुलींचा शोध लागला आहे.

अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेल्यानंतर आम्ही प्रथमत: तिच्या नातेवाइकांची माहिती घेतो; पण बऱ्याचदा मुलींचे प्रेमप्रकरण असते. अशा वेळी जो कोणी मुलींना पळवून नेतो, त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या मर्जीनेसुद्धा ती लग्न करू शकत नाही. त्यामध्ये पालक तक्रार देतात.

- सजन हंकारे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस ठाणे

पोलिसांना चार टक्के मुलींचा शोध लागेना

अनेकदा मुली घरातून रागाच्या भरात निघून जातात. अशा वेळी पोलिसांत तक्रार आल्यानंतर पोलीस तत्काळ मुलीला शोधून काढतात. मात्र, हाच प्रकार जर प्रेमप्रकरणाचा असेल तर पोलीस थोडी चालढकल करतात. तिने लग्न केले असेल, असे समजतात.

अपहरण झालेली मुलगी बऱ्याचदा ओळखीच्या मुलाबरोबर निघून जात असते. अशा वेळी जर त्यांचा फोन नंबर पोलिसांना मिळाला नाही, तर मग मुलीचा शोध लागणे अवघड बनते. तरीसुद्धा सध्या चार टक्के मुलींचा शोध पोलिसांना लागेना झाला आहे.

शोधकार्यात अडचणी काय?

प्रेमप्रकरणातून मुलगी घरातून निघून गेल्यानंतर त्या मुलीचा शोध लावणे पोलिसांपुढे आव्हान बनते. मुलगी परराज्यात गेली असल्यास किंवा स्वत:च्या मर्जीने गेली असल्यास ती सापडणे अवघड होते. अशा वेळी अनेकदा मुली मोबाइल वापरणे बंद करतात. त्यांना माहीत असते. पोलीस लोकेशनवरून आपला शोध घेतील. त्यामुळे पोलिसांना मुलींचा शोध घेणे अडचणीचे ठरते. काही मुली १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न करूनच घरी येतात. त्यावेळी मग अधिकच गुंता वाढतो.