शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

अल्पवयीन मुली ‘लाॅक’ : बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिकच घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:27 IST

सातारा : जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून लाॅकडाऊन असल्यामुळे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना अधिकच घटल्या. त्यामुळे पोलिसांचेही काम हलके झाले. ...

सातारा : जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून लाॅकडाऊन असल्यामुळे अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना अधिकच घटल्या. त्यामुळे पोलिसांचेही काम हलके झाले. दळणवळण पूर्णपणे बंद असल्यामुळे आणि रस्त्यारस्त्यांवर पोलिसांचा फाैजफाटा असल्यामुळे हे प्रकार टळले असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

जिल्ह्यात दरवर्षी अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटना वाढत असतात. जिल्ह्यात महिन्याकाठी १० ते १५ मुलींचे अपहरण होत असते. मात्र हे अपहरण लग्नाच्या आमिषाने सर्वाधिक होत असते. मुलीच्या ओळखीचा मित्र असो की नातेवाईक; तो या अपहरण प्रकरणात सहभागी असल्याचे अनेकदा समोर येते. कायद्याने मुलगी अल्पवयीन असल्यामुळे त्या मुलीचा शोध लावणे पोलिसांचे कर्तव्य असते. त्यामुळे अशा प्रकारे अपहरण झालेल्या मुलींचा पोलिसांना शोध घ्यावाच लागतो. गेल्या दीड वर्षात २८ मुलींचे अपहरण झाल्याचे समोर आले आहेत. यांतील २१ मुलींचा शोध लागला आहे.

अल्पवयीन मुलगी घरातून निघून गेल्यानंतर आम्ही प्रथमत: तिच्या नातेवाइकांची माहिती घेतो; पण बऱ्याचदा मुलींचे प्रेमप्रकरण असते. अशा वेळी जो कोणी मुलींना पळवून नेतो, त्याच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला जातो. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या मर्जीनेसुद्धा ती लग्न करू शकत नाही. त्यामध्ये पालक तक्रार देतात.

- सजन हंकारे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका पोलीस ठाणे

पोलिसांना चार टक्के मुलींचा शोध लागेना

अनेकदा मुली घरातून रागाच्या भरात निघून जातात. अशा वेळी पोलिसांत तक्रार आल्यानंतर पोलीस तत्काळ मुलीला शोधून काढतात. मात्र, हाच प्रकार जर प्रेमप्रकरणाचा असेल तर पोलीस थोडी चालढकल करतात. तिने लग्न केले असेल, असे समजतात.

अपहरण झालेली मुलगी बऱ्याचदा ओळखीच्या मुलाबरोबर निघून जात असते. अशा वेळी जर त्यांचा फोन नंबर पोलिसांना मिळाला नाही, तर मग मुलीचा शोध लागणे अवघड बनते. तरीसुद्धा सध्या चार टक्के मुलींचा शोध पोलिसांना लागेना झाला आहे.

शोधकार्यात अडचणी काय?

प्रेमप्रकरणातून मुलगी घरातून निघून गेल्यानंतर त्या मुलीचा शोध लावणे पोलिसांपुढे आव्हान बनते. मुलगी परराज्यात गेली असल्यास किंवा स्वत:च्या मर्जीने गेली असल्यास ती सापडणे अवघड होते. अशा वेळी अनेकदा मुली मोबाइल वापरणे बंद करतात. त्यांना माहीत असते. पोलीस लोकेशनवरून आपला शोध घेतील. त्यामुळे पोलिसांना मुलींचा शोध घेणे अडचणीचे ठरते. काही मुली १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर लग्न करूनच घरी येतात. त्यावेळी मग अधिकच गुंता वाढतो.