शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

ढेकळांच्या रानात फिरू लागली बैलं!

By admin | Updated: May 25, 2015 00:39 IST

शेतकरी शिवारात : पेरणीपूर्व मशागतींना वेग; नांगरट, कुळवणीसाठी लगबग

कऱ्हाड : रब्बी पिकांची काढणी पूर्ण झाल्यामुळे आणि कारखान्यांचा गळित हंगामही अंतिम टप्प्यात असल्याने सध्या शेतकरी खरीप पेरणीपूर्व मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. शेतातील पालापाचोळा गोळा करण्यासह नांगरटीच्या कामांनी गती घेतली आहे. काही ठिकाणी हळद लावणीसह प्रारंभ झाला आहे. गत खरीप हंगामाच्या अगदी काढणीपासून अवकाळीला सुरुवात झाली. त्यामुळे खरीप हंगामाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या भात, भुईमूग, सोयाबीन, मका, हायब्रीड आदी पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करायला किंवा नुकसान भरपाई द्यायला प्रशासनाने पुढाकार घेतला नाही. त्यानंतर रब्बी हंगामाची सुद्धा पेरणीपासून काढणी घेऊन आजअखेर पावसाने काही बळीराजाचा पाठ सोडलेला नाही. रब्बी हंगामाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या शाळू, गहू, हरभरा आदी पिकांचेही या अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे खरीप हंगाम काढणीवेळी गारपीट आणि रब्बीच्या काढणीवेळी अवकाळी हात धुवून बळीराजाच्या मागे लागल्याने तो पुरता खचला आहे. आता आगामी खरीप हंगामाच्या पेरणीपूर्व मशागतीही सततच्या पावसामुळे करता येईनात, अशी परिस्थिती आहे. सध्या या मशागती बरोबरच रानात शेण खत टाकणे, बांध घालणे आदी कामे जोमात आहेत. डोंगरी परिसरात साधारण मे च्या मध्यापासूनच खरिपाच्या पेरण्यांना प्रारंभ होऊन धूळवाफेवर म्हणजेच कोरड्या मातीत खरिपाच्या पेरण्या होतात.सध्या रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू, करडई, मका या पिकांची काढणी पूर्ण झाली असून, शेतकरी खरीप पूर्व मशागतीच्या कामाला लागला आहे. अवकाळी पावसामुळे काही ठिकाणी मशागतीची नांगरट करणे सोपे झाले आहे. बैलांनाही त्याचा होणारा त्रास यावर्षी वाचला आहे. नांगरट पूर्ण होत आली असून, कुळवाच्या पाळ्या देण्यास शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. (प्रतिनिधी)पाटणला भाताची तयारी...पाटण तालुक्यात भाताचे पीक मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. यावर्षी मान्सूनची हजेरी वेळेवर होणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे शेतकरी भातासाठी वाफे तयार करण्यात व्यस्त आहेत. २५ मे पर्यंत काही शेतकरी पाणी पाजून भाताची पेरणी करण्याच्या तयारीत आहेत. सोयाबीन, भुईमुगावर भरकऱ्हाड तालुक्यात उसाचे पीक बारमाही घेतले जाते. तसेच खरिपाच्या सुरुवातीला आडसाली उसाची लागणही तालुक्यात होते. उसाबरोबरच सोयाबीन, भात, घेवडा, उडीद, मूग, चवळी, भुईमूग, हायब्रीड आदी पिकांचे उत्पादन खरीप हंगामात घेतले जाते. बहुतांश शेतकरी खरिपात भुईमूग व सोयाबीनचे उत्पादन हमखास घेतात. चार महिन्यांचा असतो हंगामपावसाळ्याच्या सुरुवातीला पेरणी होणाऱ्या पिकांना खरीप पिके म्हणतात. हा खरीप हंगाम जून ते सप्टेंबर दरम्यान असतो. प्रमुख खरीप पिकांमध्ये भात, ज्वारी, बाजरी, मका, तूर, कापूस, भूईमूग, मटकी, सोयाबीन, सूर्यफूल या पिकांचा समावेश होतो.