शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

कोयनेला हवंय आणखी ३२ टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 17:21 IST

पावसाची संततधार सुरू : धरणात ७३ टीएमसी पाणीसाठा

आॅनलाईन लोकमतसातारा, दि. २४ : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरण क्षेत्रात गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. धरणात सोमवारी (दि. २४) सकाळी ११ वाजेपर्यंत ७३ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी आणखी ३२.२५ टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे.कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी आहे. पावसाचा जोर वाढल्यामुळे गेल्या दहा दिवसांमध्ये या धरणात तब्बल ३० टीएमसीने वाढ झाली. सध्या धरणात प्रतिसेंकद ३४ हजार २६४ क्यूसेक पाण्याची आवक सुरू आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुढील दहा ते पंधरा दिवसात धरण पूर्ण क्षमतेने भरू शकते. सातारा जिल्ह्यात रविवारी दिवसभर व बुधवारी सकाळी आठ वाजेपर्यंत एकूण २८४.४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. रविवारी सर्वाधिक पाऊस महाबळेश्वर तालुक्यात झाला. याठिकाणी १४४ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली.

सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊस

सातारा १९, जावळी ६२.४, पाटण ३१.१, कऱ्हाड ५.८, कोरेगाव ६.२, खटाव ६.२, माण ०.३, फलटण शून्य, खंडाळा ०.६, वाई ६.८, महाबळेश्वर १४४.८ मिलीमीटर

आजपर्यंत ६ हजार ३७० मिलीमीटर पाऊस

सातारा जिल्ह्यात एक जूनपासून आजपर्यंत ६ हजार ३७० मिलीमीटर पाऊस झाला आहे. यापैकी निम्मा पाऊस एकट्या महाबळेश्वर तालुक्यात झाला आहे. महाबळेश्वरात आजपर्यंत २८२६.६ मिलीमीटर पाऊस झाला असून अजुनही याठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. पश्चिमेकडे पावसाचा जोर वाढला असताना पूर्वेकडील फलटण, माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यांंत अद्यापही दमदार पाऊस झाला नाही.