शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
4
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
5
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
6
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
7
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
8
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
9
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
10
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
11
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
12
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
13
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
14
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
15
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
16
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
17
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
18
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
19
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
20
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण

कोयना, सह्याद्री अन् महालक्ष्मी एक्सप्रेसची सातारकरांना प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:25 IST

लोणंद : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने शासनाने अनलॉक सुरू केले आहे. त्यामुळे संचारबंदी हटवली असून, जिल्हा बंदीच्या ...

लोणंद : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याने शासनाने अनलॉक सुरू केले आहे. त्यामुळे संचारबंदी हटवली असून, जिल्हा बंदीच्या अटीही शिथील केल्या आहेत. सार्वजनिक प्रवासाला परवानगी दिलेली असल्याने रेल्वे सुरू झाली आहे. मात्र, अद्यापही कोयना, सह्याद्री, महालक्ष्मी एक्सप्रेस सुरू झालेली नाही. त्यामुळे या गाड्या कधी सुरू होतात, याकडे लक्ष लागले आहे.

साताऱ्यातील हजारो तरुण सैन्यदलात कर्तव्य बजावत आहेत. मात्र, कोरोनानंतर जिल्ह्यात केवळ तीनच एक्सप्रेस थांबत आहेत. त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे. सातारा जिल्ह्यातील प्रत्येक गावातून तरुण देशसेवा बजावत आहेत. ते वर्षातून एक महिना गावी येतात. यासाठी शक्यतो एप्रिल, मे महिन्यात सुटी घेतली जाते. ही सुटी संपवून ते परतीच्या मार्गावर आहेत. मात्र, सातारा जिल्ह्यातील रेल्वे स्थानकात थांबणाऱ्या अनेक महत्त्वाच्या एक्सप्रेस सुरू नाहीत. त्यामुळे मोठा खोळंबा होत आहे. या गाड्या कधी सुरू होणार, याकडे लक्ष लागले आहे.

चौकट

सध्या सुरू असलेल्या रेल्वे गाड्या

महाराष्ट्र एक्सप्रेस

गोवा एक्सप्रेस

अजमेर गरीब नवाझ एक्सप्रेस

चालुक्य एक्सप्रेस

दादर सेंट्रल फेस्टिव्हल

चौकट २

या गाड्या कधी सुरू होणार?

मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस

मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्सप्रेस

मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस

पुणे-सातारा डेमू

कोल्हापूर-पुणे डेमू

चौकट ३

गर्दी टाळण्यासाठी पॅसेंजरला लाल दिवा

कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली असली तरी धोका कमी झालेला नाही. एक्स्प्रेसच्या तुलनेत पॅसेंजर गाड्यांचे तिकीट फारच कमी असते. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी पॅसेंजर कमी दरात प्रवास करण्यासाठी सोयीची असते. त्यामुळे मोठी गर्दी होते. पाय ठेवण्यासाठीही जागा मिळत नाही. त्यामुळे कोरोना आणखी वाढू शकतो. त्यामुळे पॅसेंजरला अजूनही लाल दिवाच दाखविण्यात आला आहे.

कोट

व्यापाऱ्यांसाठी दररोन ये-जा करण्यासाठी तसेच पुण्याहून मालाची ने-आण करण्यासाठी डेमू ट्रेन आणि सह्याद्री व कोयना एक्सप्रेस या गाड्या लवकरात लवकर सुरू करण्यात याव्यात. आम्हाला तीनशे ते चारशे रुपये मासिक पासवर या गाड्यांतून महिनाभर प्रवास करता येतो.

- प्रसन्ना शहा, व्यापारी, लोणंद

कोट

साताऱ्यापासून रेल्वे स्थानक लांब असले तरी परराज्यात जाण्यासाठी एस. टी.पेक्षा रेल्वे परवडते. तसेच लांबचा प्रवास कंटाळवाणाही होत नाही. त्यामुळे रेल्वे सुरू होणे गरजेचे आहे. सध्या रेल्वे सुरू असल्या तरी साताऱ्यातील प्रवाशांना त्यांचा फारसा फायदा होत नाही.

- प्रशांत नागुरे, सातारा.

फोटो २७लोणंद-ट्रेन

लोणंद रेल्वे स्थानकात गेल्या काही दिवसांपासून शुकशुकाट जाणवत आहे.