शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
2
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
3
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
4
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
5
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
6
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
7
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
8
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
9
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
10
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
11
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...
12
डोनाल्ड ट्रम्प म्हणतात 'मी युद्ध थांबवलं'; इस्राइलनं गाझामध्ये ६० हजार सैनिकांना पाठवलं! काय आहे नवा प्लॅन?
13
6 एअरबॅग्ज, 35 Km मायलेज अन् ADAS सह लवकरच येतेय ही ढासू कॉम्पॅक्ट SUV; आणखी कोण कोणत्या कार होतायेत लॉन्च? बघा लिस्ट
14
३ वर्षांच्या एफडीत २ लाखांची गुंतवणूक केल्यास कोणत्या बँकेत मिळेल सर्वाधिक रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
15
१० दिवस लक्ष्मी नारायण योग: ८ राशींचे मंगल-कल्याण, दुपटीने चौफेर लाभ; हाती पैसा, चांगले होईल!
16
Realme: ७०००mAh बॅटरीसह रिअलमीचे दोन धमाकेदार फोन भारतात लॉन्च!
17
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
18
TCS ३०,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार? आयटी कर्मचारी संघटनेच्या दाव्याने खळबळ
19
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
20
आपण सगळेच Bisexual! हे काय बोलली स्वरा भास्कर? म्हणते- "मला डिंपल यादव आवडतात..."

कोयना धरण काठोकाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण व परिसरात पाऊस सुरूच असल्याने रविवारी सायंकाळच्या सुमारास साठा १०४ टीएमसीजवळ ...

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण व परिसरात पाऊस सुरूच असल्याने रविवारी सायंकाळच्या सुमारास साठा १०४ टीएमसीजवळ पोहोचला होता. त्यातच धरणसाठा काठाजवळ आल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सर्व सहा दरवाजे अडीच फुटांपर्यंत उघडण्यात आले. यामुळे दरवाजे व पायथा वीजगृह असा मिळून २३७८० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्याच्या मध्यावर जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी पश्चिम भागात धुवाँधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अवघ्या तीन दिवसांत कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला विक्रमी पाऊस झाला होता. त्याचबरोबर कोयना धरणात इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झालेली. कोयना धरणात २४ तासांत १६ टीएमसीने पाणीसाठा वाढला होता तसेच इतर धरणांतही पाणी वेगाने वाढलेले. मात्र, ऑगस्ट महिन्यात एकदम कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे धरणे पूर्णपणे भरलीच नाहीत तर पूर्वेकडे खरीप हंगामातील पिके पावसाअभावी वाळू लागली होती. पण, गेल्या १० दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे तसेच अनेक ठिकाणी दमदार पाऊस होत आहे.

जिल्ह्यातील पश्चिम तसेच पूर्वभागातही पाऊस होत असल्याने पिकांना फायदा झाला आहे तर पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. कोरेगाव, खंडाळा, कऱ्हाड, वाई, जावळी तालुक्यातही पावसाची हजेरी आहे. त्यामुळे पिकांना फायदा झाला. त्याचबरोबर माण, खटाव तालुक्यातील अनेक गावांच्या ओढ्यांना पाणी येऊ लागले आहे तसेच बंधाऱ्यात पाणीसाठा होत आहे तरीही अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरुच आहे. त्यामुळे प्रमुख धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढत चालला आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाºया कोयना धरणात रविवारी सकाळच्या सुमारास १०३.१९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यातच धरणात ३० हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. दुपारी दोनच्या सुमारास धरणाचे सर्व सहा वक्र दरवाजे एक फुटाने उचलून पाणी सोडण्यात आले. तसेच पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन तेथूनही विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे दरवाजातून ९२१४ आणि पायथा वीजगृह १०५० असा एकूण १०२६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास धरणातून विसर्ग वाढविण्यात आला.

सायंकाळी धरणात १०३.९५ टीएमसी पाणीसाठा झाला होता तर धरणात २३७८० क्यूसेक पाण्याची आवक होत होती. धरण भरण्यासाठी सवा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे पण, पाऊस असल्याने पाण्याची आवक होतच आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने सायंकाळी सर्व सहा दरवाजे एकवरून अडीच फुटांपर्यंत वर उचलले. त्यामधून २२७३० आणि वीजगृहातून १०५० असा एकूण २३७८० क्यूसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला होता. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

चौकट :

महाबळेश्वरला १०७ मिलीमीटर पाऊस...

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ५४ मिलीमीटर पाऊस पडला तर जूनपासून आतापर्यंत ३९८२ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तसेच नवजा येथे ४८ आणि आतापर्यंत ५२२२ व महाबळेश्वरला १०७ तर यावर्षी आतापर्यंत ५२९२ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांत समाधानकारक पाणीसाठा झालेला आहे.

............................................................