शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरण काठोकाठ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण व परिसरात पाऊस सुरूच असल्याने रविवारी सायंकाळच्या सुमारास साठा १०४ टीएमसीजवळ ...

सातारा : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी समजल्या जाणाऱ्या कोयना धरण व परिसरात पाऊस सुरूच असल्याने रविवारी सायंकाळच्या सुमारास साठा १०४ टीएमसीजवळ पोहोचला होता. त्यातच धरणसाठा काठाजवळ आल्याने पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी सर्व सहा दरवाजे अडीच फुटांपर्यंत उघडण्यात आले. यामुळे दरवाजे व पायथा वीजगृह असा मिळून २३७८० क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्याच्या मध्यावर जोरदार पाऊस झाला होता. त्यावेळी पश्चिम भागात धुवाँधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. अवघ्या तीन दिवसांत कोयना, नवजा आणि महाबळेश्वरला विक्रमी पाऊस झाला होता. त्याचबरोबर कोयना धरणात इतिहासात प्रथमच मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झालेली. कोयना धरणात २४ तासांत १६ टीएमसीने पाणीसाठा वाढला होता तसेच इतर धरणांतही पाणी वेगाने वाढलेले. मात्र, ऑगस्ट महिन्यात एकदम कमी प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे धरणे पूर्णपणे भरलीच नाहीत तर पूर्वेकडे खरीप हंगामातील पिके पावसाअभावी वाळू लागली होती. पण, गेल्या १० दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात पावसाळी वातावरण तयार झाले आहे तसेच अनेक ठिकाणी दमदार पाऊस होत आहे.

जिल्ह्यातील पश्चिम तसेच पूर्वभागातही पाऊस होत असल्याने पिकांना फायदा झाला आहे तर पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यात अनेक ठिकाणी चांगला पाऊस पडत आहे. कोरेगाव, खंडाळा, कऱ्हाड, वाई, जावळी तालुक्यातही पावसाची हजेरी आहे. त्यामुळे पिकांना फायदा झाला. त्याचबरोबर माण, खटाव तालुक्यातील अनेक गावांच्या ओढ्यांना पाणी येऊ लागले आहे तसेच बंधाऱ्यात पाणीसाठा होत आहे तरीही अजून मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम राहणार आहे.

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरुच आहे. त्यामुळे प्रमुख धरणांतील पाणीसाठा वेगाने वाढत चालला आहे. १०५.२५ टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाºया कोयना धरणात रविवारी सकाळच्या सुमारास १०३.१९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. त्यातच धरणात ३० हजार क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू होती. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. दुपारी दोनच्या सुमारास धरणाचे सर्व सहा वक्र दरवाजे एक फुटाने उचलून पाणी सोडण्यात आले. तसेच पायथा वीजगृहाचे एक युनिट सुरू करुन तेथूनही विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे दरवाजातून ९२१४ आणि पायथा वीजगृह १०५० असा एकूण १०२६४ क्युसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू होता. मात्र, सायंकाळी पाचच्या सुमारास धरणातून विसर्ग वाढविण्यात आला.

सायंकाळी धरणात १०३.९५ टीएमसी पाणीसाठा झाला होता तर धरणात २३७८० क्यूसेक पाण्याची आवक होत होती. धरण भरण्यासाठी सवा टीएमसी पाण्याची आवश्यकता आहे पण, पाऊस असल्याने पाण्याची आवक होतच आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने सायंकाळी सर्व सहा दरवाजे एकवरून अडीच फुटांपर्यंत वर उचलले. त्यामधून २२७३० आणि वीजगृहातून १०५० असा एकूण २३७८० क्यूसेक पाणी विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला होता. त्यामुळे कोयना नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे.

चौकट :

महाबळेश्वरला १०७ मिलीमीटर पाऊस...

जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे ५४ मिलीमीटर पाऊस पडला तर जूनपासून आतापर्यंत ३९८२ मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे तसेच नवजा येथे ४८ आणि आतापर्यंत ५२२२ व महाबळेश्वरला १०७ तर यावर्षी आतापर्यंत ५२९२ मिलीमीटर पाऊस झालेला आहे. त्याचबरोबर धोम, कण्हेर, उरमोडी, बलकवडी, तारळी या धरणांत समाधानकारक पाणीसाठा झालेला आहे.

............................................................