शहरं
Join us  
Trending Stories
1
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
2
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
3
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
4
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
5
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
6
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
7
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
8
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप
11
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
12
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
13
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
14
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
15
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
16
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
17
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
18
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
19
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
20
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर

कोयना धरण अर्धे भरले

By admin | Updated: July 27, 2014 23:06 IST

पावसाचा जोर वाढला : तारळी धरणातून विसर्ग सुरू

सातारा / कोयनानगर : जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर ओसरला असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात मात्र संततधार कायम आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळी पावसाचा जोर मंदावला होता; मात्र दुपारनंतर जोर वाढल्यामुळे धरणांत पाणीसाठाही वाढत आहे. धरणात रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५१.६४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. दरम्यान, तारळी नदीवर असलेल्या तारळी धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असल्यामुळे पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणातून २३५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सातारा जिल्ह्यात आणि खास करून पश्चिम भागात गेल्या दहा दिवसांपासून जोरदार सरी कोसळत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मात्र, पावसाचा जोर मंदावला असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात मात्र संततधार कायम आहे. कण्हेर आणि उरमोडी पाणलोट क्षेत्रातही संततधार कायम असल्यामुळे या धरणांमध्येही पाणीसाठा वेगाने वाढत आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कण्हेर धरणात सात टीएमसी तर उरमोडी धरणात ८.०७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी असून, रविवारी सांयकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा ५१.६४ टीएमसी इतका झाला होता. कोयना धरणातील येवा २५,१९२ क्युसेक इतका असून पाणीपातळी २१०९.१ फूट इतकी आहे. कोयनानगर येथे गेल्या चोवीस तासांत ५४, नवजा येथे ६४ तर महाबळेश्वर येथे ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान, सातारा शहर आणि आजूबाजूच्या परिसरात रविवारी दिवसभर उन पावसाचा खेळ सुरू होता. हवेत गारवा असल्यामुळे रविवारी सातारकर बाहेर पडले नव्हते. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ९७.४ मिमी पावसाची नोंद झाली असून, तालुकानिहाय सरासरी ८.९ मिमी इतकी आहे.जिल्ह्यात आजअखेर झालेला पाऊस ५१९८.५ मिमी इतका असून, तालुकानिहाय सरासरी ४९४.५ मिमी इतकी आहे. (प्रतिनिधी)