शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कोयना धरण अर्धे भरले

By admin | Updated: July 27, 2014 23:06 IST

पावसाचा जोर वाढला : तारळी धरणातून विसर्ग सुरू

सातारा / कोयनानगर : जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर ओसरला असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात मात्र संततधार कायम आहे. कोयना पाणलोट क्षेत्रात रविवारी सकाळी पावसाचा जोर मंदावला होता; मात्र दुपारनंतर जोर वाढल्यामुळे धरणांत पाणीसाठाही वाढत आहे. धरणात रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत ५१.६४ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. दरम्यान, तारळी नदीवर असलेल्या तारळी धरणातील पाणीसाठ्यात वेगाने वाढ होत असल्यामुळे पाणीसाठा नियंत्रित करण्यासाठी धरणातून २३५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. सातारा जिल्ह्यात आणि खास करून पश्चिम भागात गेल्या दहा दिवसांपासून जोरदार सरी कोसळत आहेत. गेल्या तीन दिवसांपासून मात्र, पावसाचा जोर मंदावला असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात मात्र संततधार कायम आहे. कण्हेर आणि उरमोडी पाणलोट क्षेत्रातही संततधार कायम असल्यामुळे या धरणांमध्येही पाणीसाठा वेगाने वाढत आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत कण्हेर धरणात सात टीएमसी तर उरमोडी धरणात ८.०७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला होता. कोयना धरणाची पाणीसाठवण क्षमता १०५.२५ टीएमसी इतकी असून, रविवारी सांयकाळी सहा वाजता धरणातील पाणीसाठा ५१.६४ टीएमसी इतका झाला होता. कोयना धरणातील येवा २५,१९२ क्युसेक इतका असून पाणीपातळी २१०९.१ फूट इतकी आहे. कोयनानगर येथे गेल्या चोवीस तासांत ५४, नवजा येथे ६४ तर महाबळेश्वर येथे ५३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान, सातारा शहर आणि आजूबाजूच्या परिसरात रविवारी दिवसभर उन पावसाचा खेळ सुरू होता. हवेत गारवा असल्यामुळे रविवारी सातारकर बाहेर पडले नव्हते. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण ९७.४ मिमी पावसाची नोंद झाली असून, तालुकानिहाय सरासरी ८.९ मिमी इतकी आहे.जिल्ह्यात आजअखेर झालेला पाऊस ५१९८.५ मिमी इतका असून, तालुकानिहाय सरासरी ४९४.५ मिमी इतकी आहे. (प्रतिनिधी)