शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

कोपर्डे हवेलीत हेळवी वाचतोय वंशावळ !

By admin | Updated: April 20, 2016 23:27 IST

अनोखा छंद : पूर्वजांची माहिती जाणून घेण्यासाठी ग्रामस्थांत उत्सुकता

कोपर्डे हवेली : प्रत्येकाला आपल्या गावाची भावकीची पूर्वजांची गण, गोत्र, कुलस्वामीनी, देव देवक आदी गोष्टींची माहिती जाणून घेण्याची ओढ असते; पण ही माहिती जास्तीत जास्त चार ते पाच पिढ्यांची मिळत असते. त्यासाठी हेळव्याचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी अनेक दिवसांपासून कोपर्डे गावात हेळव्याचे वास्तव्य असून, तो ग्रामस्थांना वंशावळ सांगतोय.हेळवी समाज हा महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवर वास्तव्यास आहे. काही समाज स्थलांतरीत होऊन अनेक ठिकाणी वास्तव्य करीत आहे. त्यामध्ये खटाव, माण तालुक्यांचा समावेश होतो. यांचा पिढीजात वंशावळीसह फार जुन्या गोष्टींची माहिती सांगणे, महाराष्ट्रामध्ये हा समाज भटक्या विमुक्त जमातीमध्ये मोडतो. यांच्याकडे सुमारे सन १९२६ पासून पूर्वजांच्या नोंदी आहेत. हा व्यवसाय पिढीजात असल्याने सर्व कागद जपून ठेवली जातात.एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कागदे दिली जातात. सुरुवातीच्या काळात झाडांच्या फांद्यावरून वंशावळ सांगितली जात होती. नंतरच्या कालखंडात मोडी कन्नड लिपीत नोंदी होऊन वंशावळ सांगितली जात आहे. वंशावळ सांगण्यासाठी आणि नोंदी घेण्यासाठी या समाजाने गावे वाटून घेतली आहेत. सरासरी तीन वर्षांनी हेळवी गावांना भेटी देत असताना गावातील प्रत्येक घरी जाऊन जन्म मृत्यू, सुना, मुली दत्तक घर जावई आदींची माहिती घेऊन नोंद घेतली जाते. शिवाय त्या घराण्याचा जुना इतिहास सांगितला जातो. भावकी गावाचे पुनर्वसन त्यांचे कूळकुलस्वामी, कुलस्वामिणी, देवक गोत्र वतने, लेकी वारस आदी गोष्टींची माहिती मिळते. या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असल्याने त्याबद्दल त्यांना मोबदला वेगवेगळ्या स्वरूपात दिला जातो. त्यामध्ये रोख पैसे, म्हशी, शेळी, मेंढी, कपडे, धान्य, भांडी आदींचा समावेश असतो.गावामध्ये गेल्या आठ दिवसांपासून अरुण भीमराव हेळवी ( रा. बेकेरी, ता. तारायबाग, जि. बेळगाव) हे वंशाळीबरोबर गावाचे पुनर्वसन, भावकीतील पूर्वीचे गोत्र आदींसह इतर माहिती सांगत आहेत. तर नवीन माहितीची नोंद चोपडीच्या वहीत करत आहेत. लोकांना माहिती जाणून घेण्याची उत्सुक ता असल्याने ते ज्याठिकाणी माहिती जाणून घेण्यासाठी जात आहेत. त्यांचा मुक्काम गावानजीक असणाऱ्या शेतात आहे. माहितीच्या आणि नोंदीच्या मोबदल्यात त्यांना चांगला मोबदला मिळत आहे. वंशावळे सांगतेवेळी आताच्या नावात पूर्वीच्या नावात फरक जाणवत आहे. सुमारे २५० वर्षांच्या दरम्यान बऱ्याच नावातील शेवटचे अक्षर ‘जी’ आहे. त्यामध्ये सूर्याजी, मानाजी, देवजी, सयाजी, राणोजी, संताजी, सुभाणजी, अप्पाजी, अण्णाजी आदी नावांचा समावेश आहे.अलीकडच्या काळामध्ये मुले शिक्षण घेऊन नोकरी करत आहेत. म्हणून त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय सोडला नाही. रजेवर किंवा सुटीवर आल्यानंतर वंशावळ सांगण्याचे काम करतात. न्यायालयातील एखादा तंटा मिटत नसेल तर हेळव्याची मदत घेतली जाते. वारस हक्क नोंद, दत्तक प्रकरण, वतनाची जमीन, वारसदार, जावई आदी प्रकरणामध्ये हेळव्याचे मार्गदर्शन घेतले जाते. त्याचा त्यांना मोबदला दिला जातो. (वार्ताहर)आमची अकरावी पिढी वंशावळ सांगण्याचे काम करत आहे. लोकांच्याकडून चांगली मदत मिळते. वर्षातील चार महिने आम्ही कुटुंब घेऊन बाहेर असतो. लोकांना गावाची तसेच पूर्वजांची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असल्यानेच आमचा आदर केला जातो. शासनाकडे वंशावळीच्या नोंदी नाहीत; पण आमच्याकडे आहेत.- अरुण हेळवी,रा. बेकेरी, ता. रायबाग, जि. बेळगाव.