शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोपर्डे हवेलीत हेळवी वाचतोय वंशावळ !

By admin | Updated: April 20, 2016 23:27 IST

अनोखा छंद : पूर्वजांची माहिती जाणून घेण्यासाठी ग्रामस्थांत उत्सुकता

कोपर्डे हवेली : प्रत्येकाला आपल्या गावाची भावकीची पूर्वजांची गण, गोत्र, कुलस्वामीनी, देव देवक आदी गोष्टींची माहिती जाणून घेण्याची ओढ असते; पण ही माहिती जास्तीत जास्त चार ते पाच पिढ्यांची मिळत असते. त्यासाठी हेळव्याचा आधार घ्यावा लागतो. त्यासाठी अनेक दिवसांपासून कोपर्डे गावात हेळव्याचे वास्तव्य असून, तो ग्रामस्थांना वंशावळ सांगतोय.हेळवी समाज हा महाराष्ट्र, कर्नाटक सीमेवर वास्तव्यास आहे. काही समाज स्थलांतरीत होऊन अनेक ठिकाणी वास्तव्य करीत आहे. त्यामध्ये खटाव, माण तालुक्यांचा समावेश होतो. यांचा पिढीजात वंशावळीसह फार जुन्या गोष्टींची माहिती सांगणे, महाराष्ट्रामध्ये हा समाज भटक्या विमुक्त जमातीमध्ये मोडतो. यांच्याकडे सुमारे सन १९२६ पासून पूर्वजांच्या नोंदी आहेत. हा व्यवसाय पिढीजात असल्याने सर्व कागद जपून ठेवली जातात.एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे कागदे दिली जातात. सुरुवातीच्या काळात झाडांच्या फांद्यावरून वंशावळ सांगितली जात होती. नंतरच्या कालखंडात मोडी कन्नड लिपीत नोंदी होऊन वंशावळ सांगितली जात आहे. वंशावळ सांगण्यासाठी आणि नोंदी घेण्यासाठी या समाजाने गावे वाटून घेतली आहेत. सरासरी तीन वर्षांनी हेळवी गावांना भेटी देत असताना गावातील प्रत्येक घरी जाऊन जन्म मृत्यू, सुना, मुली दत्तक घर जावई आदींची माहिती घेऊन नोंद घेतली जाते. शिवाय त्या घराण्याचा जुना इतिहास सांगितला जातो. भावकी गावाचे पुनर्वसन त्यांचे कूळकुलस्वामी, कुलस्वामिणी, देवक गोत्र वतने, लेकी वारस आदी गोष्टींची माहिती मिळते. या गोष्टी जाणून घेण्याची इच्छा असल्याने त्याबद्दल त्यांना मोबदला वेगवेगळ्या स्वरूपात दिला जातो. त्यामध्ये रोख पैसे, म्हशी, शेळी, मेंढी, कपडे, धान्य, भांडी आदींचा समावेश असतो.गावामध्ये गेल्या आठ दिवसांपासून अरुण भीमराव हेळवी ( रा. बेकेरी, ता. तारायबाग, जि. बेळगाव) हे वंशाळीबरोबर गावाचे पुनर्वसन, भावकीतील पूर्वीचे गोत्र आदींसह इतर माहिती सांगत आहेत. तर नवीन माहितीची नोंद चोपडीच्या वहीत करत आहेत. लोकांना माहिती जाणून घेण्याची उत्सुक ता असल्याने ते ज्याठिकाणी माहिती जाणून घेण्यासाठी जात आहेत. त्यांचा मुक्काम गावानजीक असणाऱ्या शेतात आहे. माहितीच्या आणि नोंदीच्या मोबदल्यात त्यांना चांगला मोबदला मिळत आहे. वंशावळे सांगतेवेळी आताच्या नावात पूर्वीच्या नावात फरक जाणवत आहे. सुमारे २५० वर्षांच्या दरम्यान बऱ्याच नावातील शेवटचे अक्षर ‘जी’ आहे. त्यामध्ये सूर्याजी, मानाजी, देवजी, सयाजी, राणोजी, संताजी, सुभाणजी, अप्पाजी, अण्णाजी आदी नावांचा समावेश आहे.अलीकडच्या काळामध्ये मुले शिक्षण घेऊन नोकरी करत आहेत. म्हणून त्यांनी आपला पारंपरिक व्यवसाय सोडला नाही. रजेवर किंवा सुटीवर आल्यानंतर वंशावळ सांगण्याचे काम करतात. न्यायालयातील एखादा तंटा मिटत नसेल तर हेळव्याची मदत घेतली जाते. वारस हक्क नोंद, दत्तक प्रकरण, वतनाची जमीन, वारसदार, जावई आदी प्रकरणामध्ये हेळव्याचे मार्गदर्शन घेतले जाते. त्याचा त्यांना मोबदला दिला जातो. (वार्ताहर)आमची अकरावी पिढी वंशावळ सांगण्याचे काम करत आहे. लोकांच्याकडून चांगली मदत मिळते. वर्षातील चार महिने आम्ही कुटुंब घेऊन बाहेर असतो. लोकांना गावाची तसेच पूर्वजांची माहिती जाणून घेण्याची उत्सुकता असल्यानेच आमचा आदर केला जातो. शासनाकडे वंशावळीच्या नोंदी नाहीत; पण आमच्याकडे आहेत.- अरुण हेळवी,रा. बेकेरी, ता. रायबाग, जि. बेळगाव.