शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

किसनवीर कारखान्याची थकीत देणी भागवली नाहीत तर आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2021 04:43 IST

सातारा : किसन वीर कारखाना व्यवस्थापनाने शेतकरी व कामगारांची देणी २९ ऑगस्टपूर्वी द्यावी, अन्यथा राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने ३० ऑगस्ट रोजी ...

सातारा : किसन वीर कारखाना व्यवस्थापनाने शेतकरी व कामगारांची देणी २९ ऑगस्टपूर्वी द्यावी, अन्यथा राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने ३० ऑगस्ट रोजी दिवंगत किसनवीर आबांच्या जयंतीदिनी त्यांच्या कवठे येथील पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करणार, तर त्यावरही प्रश्न न सुटल्यास न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा राष्ट्रीय काँग्रेस युवकचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे यांनी दिला.

शासकीय विश्रामगृह येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वाई तालुका काँग्रेस अध्यक्ष रवींद्र भिलारे, उपाध्यक्ष कल्याण पिसाळ उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, शेतकऱ्यांचा कणा असलेल्या किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज या संस्थेकडून गतवर्षीच्या गळीत हंगामाची सुमारे ८० कोटी रुपयांची शेतकऱ्यांची ऊसाची बिले व्यवस्थापनाने रखडवली आहेत. कामगाराचा १८ महिन्यांचा पगार दिला नाही. उसाची एफआरपी १४ दिवसात देणे बंधनकारक आहे. असे असताना किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज व्यवस्थापनाकडून वारंवार अटी व शर्थीचे उल्लंघन करण्यात आले आहे. सध्याच्या घडीला ८० कोटी रुपये शेतकऱ्यांची देणी देणे बाकी सलून कामगारांचा १८ महिन्यांचा पगार अद्यापही बाकी आहे. याबाबत व्यवस्थापन, सहकार मंत्रालय व साखर आयुक्त यांना वारंवार पत्रव्यवहार करूनही दखल घेतली गेली नाही. चार दिवसांपूर्वी एका शेतकऱ्यांना कारखान्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केले असता दुसऱ्या दिवशी त्याला बिल अदा करण्यात आले. असे असले तर वाई, सातारा, जावळी, खंडाळा, महाबळेश्वर व कोरेगाव या तालुक्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांनी आत्मदहन करायची का? एखादा जीव गेल्यावरच व्यवस्थापन जागे होणार का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. ते पुढे म्हणाले, सध्या या मतदार संघात असलेले आमदार गप्प का? आमदारकी धोक्यात येईल म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. उगाच ठराविक लोक गोळा करून सहकारमंत्र्यांना भेटायचे निवेदन द्यायचे. तेवढे करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार आहेत का? असा टोला त्यांनी आ. मकरंद पाटील यांना लगावला. आम्ही लोकहितासाठी जनआंदोलन उभे करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रवींद्र भिलारे म्हणाले, दिवंगत किसनवीर आबांनी स्थापन केलेली संस्था टिकली पाहिजे ही काँग्रेसची भूमिका आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकऱ्यांचे हित पाहत आहे. किसनवीर कारखाना डबघाईला आला असतानाही सहकार मंत्रालय व साखर आयुक्त डोळ्यावर पट्टी मारून बसले आहेत. या संस्थेचा वापर हा राजकारणाचे अड्डे उभे करण्यासाठी वापर केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.