शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

बांधावर ऊस बियाणे पोहोचप्रकरणी ‘किसन वीर’चे पदाधिकारी निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:39 IST

पाचवड : शेतकऱ्यांना बांधावर ऊस बियाणे पोहोच केलेल्या योजनेवर आक्षेप घेत विरोधकांनी किसन वीर साखर कारखान्याचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर ...

पाचवड : शेतकऱ्यांना बांधावर ऊस बियाणे पोहोच केलेल्या योजनेवर आक्षेप घेत विरोधकांनी किसन वीर साखर कारखान्याचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांवर न्यायालयात ४५ फौजदारी खटले दाखल केले होते. यांतील शेवटच्या खटल्याचा निकाल शुक्रवारी लागला. सर्वच्या सर्व ४५ खटल्यांचा निकाल किसन वीर कारखान्याच्या बाजूने लागला आहे. शेवटच्या खटल्याची सुनावणी मेढा न्यायालयात प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन. एम. काळे यांच्यासमोर झाली.

याबाबतची पार्श्वभूमी अशी की, भुईंज येथील किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यावर विरोधकांनी ४५ खटले दाखल केले होते. वास्तविक कार्यक्षेत्रात पुरेशा उसाची उपलब्धता होण्यासाठी २००४ मध्ये ही योजना बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या सहकार्याने राबविली होती. या प्रकरणामध्ये कवठे, ता. वाई येथील राहुल मधुकर डेरे यांनी मेढा पोलीस ठाण्यात कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदाधिकारी, अधिकारी यांनी संगनमताने बनावट कागदपत्रे बनवून ८ हजार ७५० रुपयांचा अपहार केल्याची तक्रार केगली होती. मेढा न्यायालयात त्याची सुनावणी होऊन सदर खटल्यातून सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. २००४-०५ या वर्षात कारखान्यात कमी गळीत झाले होते. त्यामुळे कार्यक्षेत्रात उसाची उपलब्धता व्हावी यासाठी बँकेच्या सहकार्याने कारखान्याच्या वतीने योजना राबविली. या योजनेचा लाभ २ हजार ७२५ शेतकऱ्यांनी घेत १६०८.९१ हेक्टर एवढ्या क्षेत्रावर ऊस लागवड झाली. विरोधकांनी संस्थेला वेठीस धरत ४५ जणांना पुढे करीत वाई न्यायालयात ३७, सातारा न्यायालयात २, मेढा न्यायालयात ६ खटले दाखल केले होते.

त्या सर्वच्या सर्व खटल्यांमधून मदन भोसले, गजानन बाबर व इतरांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. या खटल्याचे कामकाज कारखान्याचे पदाधिकारी यांच्या वतीने अ‍ॅड. ताहिर मणेर, अ‍ॅड. दिनेश धुमाळ, अ‍ॅड. साहेबराव जाधव, अ‍ॅड. विद्या धुमाळ, अ‍ॅड. भारती कोरवार तसेच बँक ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने अ‍ॅड. सुरेश खामकर यांनी पाहिले.

चौकटी :

न्यायदेवतेने न्याय केला : भोसले

किसन वीर कारखान्याची सूत्रे हाती घेतल्यानंतर चांगलेच काम करण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजनेबाबत खटले दाखल केले गेले. व्यक्तिगत माझ्यावर राग असेल तर मी समजू शकतो; त्यावर माझा बिलकुल आक्षेप नाही. मात्र आसूयेपोटी संस्था वेठीस धरताना काहीच कसे वाटत नाही? न्यायदेवतेने न्याय केला; नियतीही न्याय करील, अशी प्रतिक्रिया कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली.

छळायचे तेवढे छळा; न्याय होतोच : बाबर

व्यक्तिगत राग असेल तर समोर येऊन व्यक्त करा. स्वत:च्या जळफळाटापोटी संस्थेशी खेळ करू नका. वार्षिक सभेत कधी यायचं नाही, एक शब्द बोलायचा नाही. स्वतः ऊस घालायचा नाही, दुसऱ्याला घालू द्यायचा नाही. संस्थेचा बाजार उठवायला मात्र पुढे करायचे हे लोकांना समजत नसेल अशा भ्रमात कोणी असेल तर त्यांनी तसे राहू नये. आणखी किती छळायचं ते छळा; न्याय होतो, देवाच्या काठीला आवाज नसतो हे संबंधितांनी विसरू नये, अशी प्रतिक्रिया उपाध्यक्ष गजानन बाबर यांनी व्यक्त केली.