शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कतरिनाआधी 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात होता विकी कौशल, 'उरी'च्या प्रमोशनला एकत्रही दिसले, पण...
5
२ हेल्थ इन्शुन्स पॉलिसी एकाच वेळी करता येतात क्लेम; फक्त 'ही' प्रक्रिया माहिती असायला हवी
6
एअरटेलने लाँच केली ग्राहकांसाठी 'डिफेन्स' सिस्टीम; रियल टाइम फ्रॉड डिटेक्शन होणार, सगळे ॲप्स ट्रॅक करणार
7
मोहिमेदरम्यान मधमाशांचा हल्ल्यात K9 रोलो शहीद, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार...
8
मित्रच बनला शत्रू! आधी मैत्रिणीचा गळा कापला, मग जिवंत जाळून पळ काढला
9
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
10
व्वा रे पठ्ठ्यांनो! 'या' गावाने दिले १०० IAS; प्रत्येक घरात सरकारी नोकरी, म्हणतात अधिकाऱ्यांचं गाव
11
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
12
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
13
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
14
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
15
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
16
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
17
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
18
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
19
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
20
गावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी

खातगुणच्या ब्रिटिशकालीन गज धरणाचे होणार पुनरुज्जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:36 IST

खटाव : येरळा नदी आणि रामाच्या ओढ्याच्या संगमावरील खातगुण, ता. खटाव येथील ब्रिटिशकालीन गज धरणाचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी नवनिर्वाचित ...

खटाव : येरळा नदी आणि रामाच्या ओढ्याच्या संगमावरील खातगुण, ता. खटाव येथील ब्रिटिशकालीन गज धरणाचे पुनरुज्जीवन व्हावे यासाठी नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांच्या शिष्टमंडळाने बारामतीतील गोविंदबाग येथे माजी केंद्रीय कृषिमंत्री खासदार शरद पवार यांची भेट घेऊन निवेदन दिले. खासदार शरद पवार यांनी धरणाच्या सद्य:स्थितीचा आढावा घेऊन जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्याकडून तातडीने पुनरुज्जीवन कामासाठी निधी मिळवून देतो, असे आश्वासन दिले आहे.

लवकरच जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांसमवेत लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांची बैठक मंत्रालयामध्ये होणार आहे. धरणाच्या कामाला गती मिळेल अशी माहिती सरपंच अमिना सय्यद यांनी दिली. खातगुणच्या गज धरणाचे बांधकाम १८६७ मध्ये झाले आहे. १५० वर्षांपेक्षा जास्त दिवस धरणाला झाले आहेत. धरणाचे पूर्ण बांधकाम दगडी असून, लांबी ३०० मीटर, रुंदी सात फूट आणि उंची ३० फूट आहे. धरणाला दोन कालवे आहेत. उजवा कालवा २५ किलोमीटर, तर डावा कालवा १४ किलोमीटर लांबीचा आहे. धरणाच्या पाण्यावर जवळपास सतराशे हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. दुष्काळी भागासाठी हे धरण संजीवनी आहे. ब्रिटिश कंपनीने शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर ग्रामपंचायतीबरोबर पत्रव्यवहार करून धरणाची मुदत संपली आहे. यामुळे तातडीने दुरुस्ती करून घ्यावी, अशी सूचना केली होती. त्यानंतर धरणाची किरकोळ दुरुस्ती होत होती. परंतु सततचे महापूर आणि बांधकाम जीर्ण झाल्यामुळे धरणाच्या भिंतींना तडे जात आहेत. मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. धरणाची तातडीने दुरुस्ती केली नाही तर धरण फुटून मोठी दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे या धरणाची दुरुस्ती व पुनरुज्जीवन व्हावे ही ग्रामस्थांची मागणी होती. त्यानुसार नवनिर्वाचित सदस्यांनी खासदार शरद पवारांची भेट घेऊन या कामासाठी सरकारकडे पाठपुरवठा करावा, अशी विनंती केली. खासदार शरद पवारांनी धरणाच्या वयामुळे झालेली स्थिती आणि दुष्काळी भागासाठी धरणाची असलेली गरज लक्षात घेऊन जलसंपदामंत्र्यांकडून विषय मार्गी लावण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले आहे, अशी माहिती ग्रामस्थ निखिल घाडगे यांनी दिली.

यावेळी सरपंच अमिना सय्यद, वसंत जाधव, श्यामराव भोसले, गजानन लावंड, प्रमोद भोसले, विवेक जाधव उपस्थित होते.

कॅप्शन :

खातगुणच्या ब्रिटिशकालीन गज धरणाचे पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात चर्चा करताना सरपंच आमिना सय्यद, वसंत जाधव, श्यामराव भोसले यांनी खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा केली.