शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये नितीशकुमारांशिवाय भाजपा सरकार बनवू शकते, जदयू शिवाय एनडीए ११८ वर; एवढ्या जागा महागात पडणार...
2
Bihar Election 2025 Result: अजितदादांचा धुव्वा, उमेदवारांचे डिपॉझिटही जाणार? ५०० मतेही नाहीत
3
बिहारमध्ये पराभव झाल्यानंतरही, राजद आणि तेजस्वी यादवांसाठी आनंदाची बातमी
4
राहुल गांधींचा हायड्रोजन बॉम्ब त्यांच्यावरच फुटला, काँग्रेस-राजदच्या पराभवाची 5 कारणे...
5
आता माणसांचं आयुष्य वाढणार, १५० वर्षांपर्यंत जगणार? चीनचे शास्त्रज्ञ बनवताहेत अँटी एजिंग गोळी
6
ऐकावे ते नवलच! चीनमध्ये माशांना मिरच्या का खायला दिल्या जातायेत?; कारण ऐकून व्हाल हैराण
7
उत्पत्ती एकादशी २०२५: वाळलेले तुळशीचे पानही देईल लाभ, उत्पत्ती एकादशीला करा 'हा' उपाय!
8
घसरत्या बाजारात 'हा' डिफेन्स शेअर चमकला! खरेदी करण्याची ही योग्य वेळ आहे का? ब्रोकरेज फर्मने दिलं उत्तर
9
IND vs SA: पंतची विकेटमागून 'बोलंदाजी'! बावुमा कुलदीपच्या जाळ्यात अडकला! (VIDEO)
10
"निवडणूक आयोग आणि SIR जबाबदार...!"; बिहार निवडणूक निकालावरून काँग्रेस भडकली
11
Bihar Election Result: "...यापेक्षा वेगळा निकाल लागणे शक्य नव्हते"; संजय राऊतांचं निकालावर खळबळजनक विधान
12
बिहारमध्ये विजयी घौडदौड, मात्र पोटनिवडणुकीत भाजपाला मोठा फटका; ८ पैकी ६ जागांवर पराभव?
13
बिहारमध्ये एनडीएला बंपर विजय कसा मिळाला? ही आहेत ५ प्रमुख कारणं
14
तेजस्वी पिछाडीवर, तिकडे तेज प्रताप यादवांची काय अवस्था...; 'हम तो डुबेंगे सनम...' खरे ठरतेय? 
15
कामगिरी दमदार; पीएम मोदींच्या हनुमानाची 'हनुमान उडी', LJP(R) इतक्या जागांवर आघाडीवर...
16
बिहार निवडणूक निकाल: राघोपुरात तेजस्वी यादव पिछाडीवर; लखीसरायमध्ये विजय सिन्हांची आघाडी कायम
17
बिहारमध्ये NDA ला आघाडी, भाजप-जेडीयूच्या जागा वाढल्या; तेजस्वी यादवांना 'या' ५ चुका पडल्या महागात!
18
Health And Ritual: दुपारच्या जेवणानंतर वामकुक्षी ही पूर्वापार परंपरा; मेंदू होतो सुपरफास्ट!
19
“इंदुरीकर महाराज, फेटा खाली उतरवू नका, सोशल मीडियावरील छपरींकडे दुर्लक्ष करा”; कुणाचे आवाहन?
20
Utpatti Ekadashi 2025: उत्पत्ती एकादशीला 'या' ६ उपायांनी पापमुक्त व्हा; पाहा पूजाविधी!
Daily Top 2Weekly Top 5

जावलीत खरिपाच्या पेरणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

कुडाळ : राज्यात माॅन्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना गती मिळाली आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी आता ...

कुडाळ : राज्यात माॅन्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना गती मिळाली आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी आता खरीप पिकांच्या पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत आहे. मॉन्सूनची हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. पावसाने जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली असून, शेतकऱ्यांची पेरणीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे.

जावळी तालुक्यात खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र १९५०० हेक्टर असून, तालुक्यामध्ये प्रामुख्याने भात ८८०० हेक्टर, नाचणी ७१५ हेक्टर, सोयाबीन ३५०० हेक्टर, भुईमूग ३००० हेक्टर व उर्वरित क्षेत्र कडधान्य मका, ज्वारी, गळीत धान्य पिकाखाली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिकासाठी वेळेत व वाजवी दरात खते बियाणे मिळण्याकरिता शेतकरी गटांच्या माध्यमातून आजअखेर २८३ मेट्रिक टन खते ९७८ क्विंटल बियाणांचा बांधावर पुरवठा करण्यात आलेले आहे.

दिवसेंदिवस गावोगावी बैलजोड्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे बहुतांश ठिकाणी पारंपरिक बैलजोडीच्या ऐवजी ट्रॅक्टरनेच पेरणी होताना दिसत आहे. शेतकरीही आधुनिक झाला असून, यांत्रिकीकरणाचा उपयोग करू लागला आहे. काही ठिकाणी धूळवाफेवरही पेरण्या केल्या आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागात भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते. याकरिता भाताची रोपे तयार करण्याच्या कामात शेतकरी मग्न आहेत. पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे ,खते यांच्या खरेदीसाठी बळीराजाची लगबग सुरू आहे. या हंगामात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड, कडधान्य आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते.

(चौकट)

कृषी विभागाकडून पुरवठा व मार्गदर्शन

शेतकऱ्यांकडील सोयाबीन बियाण्याची कमतरता उगवणक्षमता तपासून चांगले असणारे बियाणे ग्राम पातळीवरच इतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच क्षेत्रीय पातळीवर शेतकऱ्यांना सोयाबीन व भात पिकाबाबत सर्व माहिती देण्यासाठी ग्रामपातळीवर कृषी सहायक यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे. फळबाग लागवड करण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी प्रस्ताव घेण्यात येत आहेत.