शहरं
Join us  
Trending Stories
1
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
2
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
3
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
4
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
5
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
6
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
7
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
8
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
9
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
10
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
11
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
12
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
13
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
14
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
15
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
16
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."
17
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
18
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
19
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
20
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया

जावलीत खरिपाच्या पेरणीला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST

कुडाळ : राज्यात माॅन्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना गती मिळाली आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी आता ...

कुडाळ : राज्यात माॅन्सूनच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतीच्या कामांना गती मिळाली आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे पूर्ण करून शेतकरी आता खरीप पिकांच्या पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे पाहावयास मिळत आहे. मॉन्सूनची हजेरी लावल्याने शेतकरी समाधानी झाला आहे. पावसाने जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली असून, शेतकऱ्यांची पेरणीच्या कामांची लगबग सुरू झाली आहे.

जावळी तालुक्यात खरीप पिकाखालील सरासरी क्षेत्र १९५०० हेक्टर असून, तालुक्यामध्ये प्रामुख्याने भात ८८०० हेक्टर, नाचणी ७१५ हेक्टर, सोयाबीन ३५०० हेक्टर, भुईमूग ३००० हेक्टर व उर्वरित क्षेत्र कडधान्य मका, ज्वारी, गळीत धान्य पिकाखाली आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांना पिकासाठी वेळेत व वाजवी दरात खते बियाणे मिळण्याकरिता शेतकरी गटांच्या माध्यमातून आजअखेर २८३ मेट्रिक टन खते ९७८ क्विंटल बियाणांचा बांधावर पुरवठा करण्यात आलेले आहे.

दिवसेंदिवस गावोगावी बैलजोड्यांची संख्या कमी होत आहे. यामुळे बहुतांश ठिकाणी पारंपरिक बैलजोडीच्या ऐवजी ट्रॅक्टरनेच पेरणी होताना दिसत आहे. शेतकरीही आधुनिक झाला असून, यांत्रिकीकरणाचा उपयोग करू लागला आहे. काही ठिकाणी धूळवाफेवरही पेरण्या केल्या आहेत. तालुक्याच्या पश्चिम भागात भाताची लागवड मोठ्या प्रमाणात होते. याकरिता भाताची रोपे तयार करण्याच्या कामात शेतकरी मग्न आहेत. पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे ,खते यांच्या खरेदीसाठी बळीराजाची लगबग सुरू आहे. या हंगामात प्रामुख्याने भात, सोयाबीन, भुईमूग, हायब्रीड, कडधान्य आदी पिकांचे उत्पादन घेतले जाते.

(चौकट)

कृषी विभागाकडून पुरवठा व मार्गदर्शन

शेतकऱ्यांकडील सोयाबीन बियाण्याची कमतरता उगवणक्षमता तपासून चांगले असणारे बियाणे ग्राम पातळीवरच इतर शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच क्षेत्रीय पातळीवर शेतकऱ्यांना सोयाबीन व भात पिकाबाबत सर्व माहिती देण्यासाठी ग्रामपातळीवर कृषी सहायक यांच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे. फळबाग लागवड करण्यासाठी अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी प्रस्ताव घेण्यात येत आहेत.