शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

खंबाटकी घाटात धोक्याची घंटा कायम

By admin | Updated: February 2, 2015 00:02 IST

संरक्षक कठड्यांची दुरवस्था : लोखंडी खांबही टिकेनात; प्रशासकीय यंत्रणा मेटाकुटीला!

खंडाळा : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटातील तुटलेले संरक्षक कठडे प्रवाशांसाठी धोकादायक ठरत आहेत. यावर पुन्हा-पुन्हा दुरुस्ती करूनही वाहन ठोकरल्याने कठडे कोसळले जात आहेत. म्हणून ‘न्हाय’च्या प्रशासनाने घाटातील जागोजागी तुटलेल्या कठड्यांच्या जागी लोखंडी खांब व लोखंडी रोप बसवले आहेत. मात्र, वेगाने येणारी वाहने व जड वाहनांमुळे ही उपाययोजनाही कुचकामी ठरत आहे. संरक्षक कठडे आज बसविले की, उद्या ते तुटत आहेत. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणाही मेटाकुटीला आली आहे. खंबाटकी घाटातील वळण रस्त्यांवर तुटलेल्या संरक्षक कठड्यांमुळे प्रवास करणे धोकादायक बनले होते. याबाबत ‘लोकमत’मधून अनेकदा आवाज उठविला होता. त्यानंतर हायवे प्रशासनाने दखल घेत संरक्षक कठड्यांऐवजी लोखंडी खांब रोवून रोप लावले होते. मात्र वळण रस्त्यावर जड वाहने, कंटेनर वळविताना रस्ता अरुंद असल्याने हे उभारलेले कठडे वारंवार तुटले जातात. वास्तविक प्रत्येक शनिवार व रविवारी महाबळेश्वरकडे जाणाऱ्या पर्यटकांमुळे घाटात वाहनांची संख्या वाढत असते. अशावेळी जड वाहनांमुळे घाट ठप्पही होत असतो.वाहनांच्या गर्दीतून मार्ग काढण्याच्या नादात हे कठडे तुटले जातात. त्यामुळे वारंवार ते दुरुस्त करावे लागतात. यासाठी लोखंडी ग्रीलचे कठडे उभारले; मात्र तेही जड वाहनांमुळे मोडकळीस आले आहेत. या समस्येवर उपाय म्हणून वळणावरील रस्त्याचे रुंदीकरण होणे गरजेचे आहे. आजही घाटातील काही ठिकाणी तुटलेल्या कठड्यांच्या जागी केवळ रिफ्लेक्टर कापडी पट्ट्या लावलेल्या आहेत. मात्र याठिकाणी भक्कम संरक्षक कठड्यांचे बांधकाम होणे गरजेचे आहे. त्याचबरोबर जड वाहनांना वळण रस्त्यावर सूचना फलक लावले गेले पाहिजेत. तसेच हलक्या वाहनांना वेगमर्यादा ठेवली पाहिजे. घाटातील किमान सुविधांवर प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थ व प्रवाशांमधून होत आहे. (प्रतिनिधी)पडझड कायमखंबाटकी घाटात संरक्षक कठड्यांची दुरवस्था आहे. ‘लोकमत’च्या वृत्तानंतर लोखंडी संरक्षक यंत्रणा उभारली गेली; मात्र जड वाहनांमुळेही वारंवार तुटली जात आहे. संरक्षक कठडे उभारण्याबरोबरच वळण रस्त्याचे रुंदीकरण झाले तर या समस्येवर तोडगा निघेल,जड कंटेनर वळणावर बसत नाहीत, त्यामुळे अनेकदा घाट ठप्प होतो, असे खंबाटकी मदत पथकाचे अध्यक्ष अजित यादव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.