शहरं
Join us  
Trending Stories
1
हाँगकाँग अग्निकांडातील 83 जणांच्या मृत्यूला जबाबदार कोण? 70 वर्षांतील सर्वात मोठी दुर्घटना, 4600 जणांची घरे स्वाहा...! 
2
बिहारमधील पराभवाच्या आढावा बैठकीपूर्वीच काँग्रेसमध्ये मोठा राडा! दोन नेते एकमेकांना भिडले, कुणी दिली गोळी घालण्याची धमकी?
3
२०६ च्या एकदम ४४...! सीआयए अन् मोसादनं रचला काँग्रेसला हरवण्याचा कट? माजी खासदाराचा मोठा दावा, काय तर्क दिला? जाणून घ्या
4
कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध 
5
इम्रान खान कुठे आहेत? पाकिस्तान संसदेत पीटीआयचा गदारोळ; बहिणी तुरुंगाबाहेच बसून...
6
WPL Auction Sold And Unsold Players: शेवटच्या क्षणी अंपायरची लेक 'लखपती'; स्टार्कची बायको 'अनसोल्ड'च
7
लवकरच येतोय ICICI च्या जॉइंट व्हेंचरचा आयपीओ, केव्हा लॉन्च होणार? जाणून घ्या सविस्तर
8
"२ तारखेपर्यंत मला युती टिकवायचीय"; शिवसेनेसोबतच्या वादावर रविंद्र चव्हाणांचे मोठे राजकीय संकेत...
9
WPL 2026 Auction : एअरफोर्स ऑफिसर Shikha Pandey वर पैशांची 'बरसात'; ३६ व्या वर्षी विक्रमी बोली
10
“भाजपा पैसे वाटल्याशिवाय जिंकू शकत नाही, भविष्यात महायुती टिकणार नाही”: विजय वडेट्टीवार
11
WPL 2026 Auction : अनुष्का शर्माचं नाव येताच RCB तिच्या मागून धावला! पण खर्च नाही झेपला अन्...
12
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
13
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
14
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
15
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
16
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
17
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
18
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
19
अरेच्चा! भारतीयांना 'हे' शब्द नीट उच्चारताच येत नाही; तुम्ही Croissant, Ghibli चा उच्चार चुकवता?
20
Hong Kong Fire : अग्निकल्लोळ! हाँगकाँगमध्ये इमारतीला कशी लागली एवढी मोठी आग? ५५ जणांचा मृत्यू, २७९ जण बेपत्ता
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी आघाडी तोडणार याची कुणकूण होती

By admin | Updated: September 28, 2014 00:33 IST

कऱ्हाडात गौप्यस्फोट : अर्ज दाखल केल्यानंतर मुख्यमंत्र्यानी साधला पत्रकारांशी संवाद

कऱ्हाड : ‘सत्तेची समीकरणे बदलण्याचा प्रत्येक राजकीय पक्षाला अधिकार आहे़ कोणी उघड-उघड, तर कुणी पडद्यामागून समीकरण बदलत असतो.विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप, राष्ट्रवादीने अनेक ठिकाणी मान्यवर नेत्यांसमोर उमेदवार उभे करताना काळजी घेतली आहे़ त्यामुळे भाजप, राष्ट्रवादीचे साटेलोटे आहे का, याचा जनताच आता शोध घेईल,’ असे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले़ कऱ्हाड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला़ त्यानंतर निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते़ मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले, ‘खरंतर राष्ट्रवादी काँग्रेसला आमच्याबरोबरची आघाडी तोडायचीच होती़ त्यामुळे आसुरी महत्त्वकांक्षा ठेवून अशक्य अटी निवडणुकीपूर्वीच आमच्यावर लादण्याचा त्यांचा प्रयत्न होता़ त्याला प्रतिसाद देणे शक्यच नव्हते़ राष्ट्रवादी तर युतीच्या निर्णयाची वाट पाहत होती़ युती तुटली रे तुटली की, त्यांनी आघाडी तोडून टाकली; पण मला याची अगोदरच कुणकूण असल्याने त्याची काळजी वाटली नाही़ सत्तेसाठी आघाडी तुटली; पण सत्तेसाठी पुन्हा आघाडी होऊ शकते का? या प्रश्नावर मात्र अगोदर निवडणुका होऊ द्यात; मग त्या प्रश्नाचे उत्तर देऊ.’ पश्चिम महाराष्ट्रात सेना, भाजपची म्हणावी तशी ताकद नाही मग दोन्ही काँग्रेसपैकी हा गड कोण राखणार, असे विचारताच, ‘काँग्रेसची तयारी चांगली आहे़ त्यामुळे चिंता वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले़ दक्षिणेत काँग्रेसविरुद्ध काँग्रेस असेच चित्र दिसतेय कारण फक्त अतुल भोसले भाजपात, अजिंक्य पाटील सेनेत, तर आमदार उंडाळकर बंडखोरीत दिसतायत ? याबाबत विचारले असता, ‘महत्त्वकांक्षेला कोणी आवर घालू शकत नाही़ ज्यांच्याकडे प्रचंड आर्थिक ताकद आली आहे, अशा प्रत्येकाला आता आमदार व्हावे, असे वाटत आहे़ मग ती अपक्ष राहतील, तर काही पक्षांची उमेदवारी ताकदीचा वापर करून मिळवतील; पण आता राज्यात राष्ट्रीय पक्षाचीच सत्ता असणे विकासाच्यादृष्टीने गरजेचे आहे़’ निवडणुकीत भाजप हाच आमचा प्रमुख विरोधक आहे़ कारण देशात त्यांचे सरकार आहे़ ११४ मतदारसंघांत आम्ही गेले दहा-बारा वर्षे लढलेलो नाही़ त्यामुळे तेथे उमेदवार निवडताना सामाजिक न्याय अन् सक्षम उमेदवार देताना थोडी कसरत करावी लागली एवढेच ! घोळ किंवा उमेदवार मिळत नव्हते, असं काहीही नाही़’ (प्रतिनिधी)