शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावर आंदोलनासाठी परवानगी, अटीशर्तीही घातल्या
2
अभिनेतापासून राजकारणी बनलेल्या थलापती विजय वादात! TVK रॅलीत बाउन्सरने कार्यकर्त्यांना व्यासपीठावरुन खाली फेकले, गुन्हा दाखल, व्हिडीओ व्हायरल
3
"ज्यांनी बिहारींना शिवीगाळ केली, त्यांना..."; भाजपाचा काँग्रेस खासदार राहुल गांधींवर हल्लाबोल
4
गुजरातमध्ये निनावी पक्षांना ₹४३०० कोटींची देणगी..; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर हल्लाबोल
5
५५ वर्षांची आई आणि १७ मुले! हे कुटुंब कसं चालवतंय आपला उदरनिर्वाह?
6
जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार पाऊस; भारताने पुन्हा दाखवली माणुसकी, पाकिस्तानला दिला मोठा इशारा!
7
"हिंदू राष्ट्र म्हणजे केवळ हिंदू नाही, तर..."; समाजातील दुहीवर मोहन भागवतांचं स्पष्ट भाष्य
8
गोविंदाने पत्नी सुनीतासोबत साजरी केली गणेश चतुर्थी, घटस्फोटांच्या अफवांना लावला पूर्णविराम
9
धक्कादायक! भटक्या कुत्र्यांची दहशत, चावल्यामुळे नववीच्या विद्यार्थ्याचा तडफडून मृत्यू
10
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
11
Mobile Ban School: शाळेत मोबाईल वापरण्यावर बंदी; दक्षिण कोरियाने का घेतला निर्णय?
12
Rishi Panchami 2025: ऋषींनी आपल्यासाठी काय केले? हे जाणून घेण्यासाठी 'हा' एक श्लोक पुरेसा आहे!
13
हृदयद्रावक! "भाऊ, सर्वनाश झाला, आपला मुन्नू गेला..."; ढसाढसा रडत मोठ्या भावाला फोन
14
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
15
"यावर्षी तुमच्याशिवाय घर अपूर्ण वाटतंय...", बाप्पाला घरी न आणल्यामुळे भावुक झाली शिल्पा शेट्टी
16
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
17
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
18
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
19
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
20
Crime: विधवा वहिनीच्या बेडरूममध्ये घुसून दीराचं घाणेरडं कृत्य, गुन्हा दाखल!

सत्तेला हपापलेल्यांना आता दूर ठेवा

By admin | Updated: July 25, 2014 22:16 IST

रवींद्र पवार : ‘सातारा-जावली’ निष्ठावंतांना देण्याची मागणी

सातारा : केंद्रातील भाजपचे सरकार आता किमान वीस वर्षे तरी हलत नाही, हे कळून चुकल्यामुळे बरेच जण पक्षातून उमेदवारीसाठी प्रयत्न करीत आहेत. परंतु सातारा-जावली विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देताना स्वार्थापोटी आलेल्यांना पक्षाने वेळीच ओळखावे व निष्ठावंतांना संधी द्यावी, असे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र पवार यांनी म्हटले आहे.सातारा-जावली मतदारसंघातील उमेदवारीच्या संदर्भात पवार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, १९८४ नंतर प्रथमच २०१४ मध्ये कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले. ही किमया नरेंद्र मोदी यांनी घडवून आणली. काँग्रेस व राष्ट्रवादी नेत्यांनी वारंवार ‘मोदींची लाट नाही,’ असा कांगावा केला; पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. कारण देशातील व राज्यातील जनतेला या भ्रष््टाचारी व घोटाळेबाज सरकारचा कंटाळा व तिरस्कार आला आहे. त्यामुळे केंद्रात तर सत्ता आलीच आहे आणि आता राज्यातही येणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. नुकत्याच झालेल्या निर्धार मेळाव्यात बेताल वक्तव्ये करण्यात आली. परंतु त्याचा काहीएक उपयोग होणार नाही. जनता आता त्यांना महाराष्ट्रातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. या अनुभवातून आता अनेक नेते भाजपचे गोडवे गाऊ लागले असल्याचे सांगून पवार यांनी म्हटले आहे की, भाजपला ‘जातीयवादी’ म्हणणाऱ्या अनेकांना याच पक्षातून आमदारकी, खासदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. केंद्रात जर भाजपची सत्ता आली नसती, तर आताचे हेच तथाकथित नेते भाजपमध्ये आले असते का? या मंडळींना सत्तेशिवाय राहण्याची सवय नाही. त्यांना आता कळून चुकले आहे की, केंद्रातील भाजप सरकार किमान २० वर्षे हलत नाही. त्यामुळेच आता बरेचजण पक्षातून उमेदवारीसाठी प्रयत्न करू लागले आहेत. परंतु पक्षाने त्यांना दूर ठेवून निष्ठावंतांना जवळ करावे. (प्रतिनिधी)सातारा-जावली मतदारसंघ भाजपकडेच ठेवण्याची मागणी आपण वरिष्ठांकडे केली असून, आयात आणि स्वार्थापोटी आलेल्यांना पक्षाने वेळीच ओळखून निष्ठावंतांनाच संधी द्यावी. बाहेरून येणाऱ्यांना आमचा तीव्र विरोध असेल, हे इच्छुकांनी लक्षात घ्यावे.- रवींद्र पवार, जिल्हा उपाध्यक्ष, भाजप