शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

कऱ्हाडच्या हुतात्मा स्मारकाला झळाळी !

By admin | Updated: May 19, 2016 00:16 IST

डागडुजी : कमानीलाही आकर्षक रंगरंगोटी; नगरपालिकेच्या अर्थसंकल्पात यावर्षी आठ लाखांची तरतूद--लोकमतचा इफेक्ट

कऱ्हाड : स्वातंत्र्यसंग्रामातील युद्धामध्ये ज्यांनी आपल्या प्र्राणांची आहुती दिली. त्या वीर हुतात्मांच्या स्मरणार्थ येथील कोल्हापूर नाका येथे हुतात्मा स्मारक बांधण्यात आले आहे. या स्मारकाच्या झालेल्या दयनीय अवस्थेबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. दरम्यान, या वृत्ताची दखल घेत नगरपालिकेने येथील स्मारकाची डागडुजी करत गंजलेल्या कमानीला रंगरंगोटी केली. त्यामुळे अनेक वर्षांपासून दुरवस्थेत असलेल्या स्मारकाला आता नवी झळाळी प्राप्त झाली आहे.कोल्हापूर नाका येथे रिमांडहोम परिसरात असलेल्या हुतात्मा स्मारकातील गंजलेल्या व नाव गायब झालेल्या कमानी, परिसरात उंचच्या उंच वाढलेले गवत, झाडांचा पाला-पाचोळ्यांचा साचलेला कचरा असे अस्वच्छतेचे साम्राज्य या सर्व परिस्थितीचे चित्र ‘लोकमत’ने संबंधित वृत्ताद्वारे मांडले होते. ‘लोकमत’ने मांडलेल्या वृत्ताची दखल घेत पालिका प्रशासनास जाग आली. पालिकेकडून स्मारकातील दुरवस्थेत असलेल्या कामांची तत्काळ डागडुजी करण्यात आली. बॅरिस्टर ए. आर. अंतुले हे मुख्यमंत्री असताना त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र हुतात्मा स्मारके उभारण्याची योजना राबविली. प्रत्येक ठिकाणी दोन एकर जागा संपादन करून राज्यात २६८ ठिकाणी शासकीय खर्चाने अशी स्मारके उभारण्यात आली. त्या योजनेअंतर्गंत कऱ्हाडच्या दक्षिणेकडे पुणे- बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या सेवारस्त्याजवळ रिमांड होम परिसरात स्वातंत्र्य लढार्इंमध्ये वीरगती प्राप्त केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मृतिप्रित्यर्थ हुतात्मा स्मारक उभारण्यात आले आहे.या स्मारकाला ऐतिहासिकदृष्ट्या मोठे महत्त्व प्राप्त आहे. मात्र, पालिकेच्या नियोजनशुन्य देखभालीमुळे हे स्मारक शेवटची घटका मोजत होते. शहराबाहेर असल्यामुळे हुतात्मा स्मारक सर्वांच्याच दृष्टीआड राहिले. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणांपैकी व पालिकेच्या देखभालीकडे असलेल्या या स्मारकाच्या विकासासाठी पालिकेकडून या वर्षी आठ लाखांची तरतूद केली आहे. तसेच स्मारकाची डागडुजी देखील करण्यात आली आहे. हुतात्मा स्मारकामध्ये दर्जेदार सुविधा उभाराव्यात तसेच ते पर्यटनाच्या दृष्टीने विकसित व्हावे, यासाठी सध्या पालिकेकडून उपाययोजना आखल्या जात आहेत. (प्रतिनिधी) गेल्यावर्षी दीड लाख तर यंदा आठ लाख...कोल्हापूर नाका या ठिकाणी बांधण्यात आलेल्या हुतात्मा स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी पालिकेवरती आहे. पालिकेकडून प्रत्येकवर्षी हुतात्मा स्मारकावर करण्यात येणाऱ्या खर्चाची तरतूद अर्थसंकल्पात केली जाते. २०१३-१४ वर्षी ५० हजार रुपयांची तरतूद पालिकेने केली होती. तसेच त्यानंतर गेल्यावर्षी २०१५-१६ वर्षी दीड लाखाची तरतूद केली होती. त्यावेळी किरकोळ सुधारणा करण्यात आल्या. मात्र, यंदाच्या वर्षी वार्षिक अर्थसंकल्पात सर्वाधिक आठ लाख रुपयांची तरतूद केली आहे. तहसीलदार कार्यालय : १९४२ च्या क्रांती आंदोलनातील मोर्चाच्या स्मरणार्थ स्मृतिस्तंभ उभारला आहे.नगरपालिका कार्यालय : भारतीय स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मरणार्थ स्मृतिस्तंभ उभारला आहे.पंचायत समिती कार्यालय : स्वातंत्र्य लढाईत वीरगती प्राप्त केलेल्या शुरवीरांच्या स्मरणार्थ उभारलेला स्मृतिस्तंभकार्वे नाका : आॅलिंपिक विजेते खाशाबा जाधव यांच्या स्मरणार्थ उभारलेला स्मृतिस्तंभकोल्हापूर नाका : मुख्यमंत्री बॅरिस्टर अंतुले हे मुख्यमंत्री असताना त्यांनी महाराष्ट्रात सर्वत्र हुतात्मा स्मारके उभारण्याची योजना राबविली. त्या योजनेअंतर्गत हुतात्मा स्मारक उभारले आहे.