शहरं
Join us  
Trending Stories
1
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
2
अमेरिका-इराण चर्चा फिस्कटली; काय होत्या अमेरिकेच्या प्रमुख मागण्या? आता पाकिस्ताननं दोघांकडे केली नवी मागणी
3
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
4
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
5
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
6
Manav Shah : Video-"एकटेपणा, जेलसारखं वाटायचं"; ४० लाखांचं पॅकेज सोडून भारतात परतला तरुण, काय घडलं?
7
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
8
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
9
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
10
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
11
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
12
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
13
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
14
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
15
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
16
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
17
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
18
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
19
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
20
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडच्या व्यापाऱ्यांचा लॉकडाऊनला विरोध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST

कऱ्हाड : सर्वसामान्यांचा विचार न करता लॉकडाऊन केले जात असून सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सतत लादल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे ...

कऱ्हाड : सर्वसामान्यांचा विचार न करता लॉकडाऊन केले जात असून सर्वसामान्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. सतत लादल्या गेलेल्या लॉकडाऊनमुळे आत्महत्येशिवाय कोणताच पर्याय उरलेला नाही. प्रशासनाने लॉकडाऊन मागे घ्यावा. अन्यथा, सर्वसामान्यांनी जगायचे कसे, याचे उत्तर द्यावे, असा सवाल कऱ्हाड तालुका दक्ष नागरिक संघ तसेच विविध व्यापारी संघटनांनी केला आहे.

लॉकडाऊनच्या विरोधात सोमवारी व्यापाऱ्यांसह सामाजिक संघटना एकवटल्या. प्रशासकीय इमारतीत जाऊन त्यांनी मागण्यांबाबतचे निवेदन तहसीलदार अमरदीप वाकडे यांना सादर करण्यात दिले. लॉकडाऊन रद्द न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

कृष्णा कारखाना निवडणूक प्रक्रिया २ जुलैपर्यंत सुरू होती. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर येत होते. जाहीर सभा, प्रचार, रॅली यांना शासनाने परवानगी दिली. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे नियम पायदळी तुडवले गेले. त्यामुळेच तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा वाढत गेला. याकडे शासनाने लक्ष दिले नाही. मात्र, निवडणूक प्रक्रिया संपताच लॉकडाऊन लागू केला गेला. सर्वसामान्यांच्या हाताला सध्या काम नाही. त्यातच वाढती महागाई, कर्जाचे हप्ते, दुकान भाडे, वीजबिल, विविध कर, कर्जाच्या वसुलीसाठी लोक रोज घरी येत आहेत. त्यांना काय उत्तर द्यायचे, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. लॉकडाऊनमुळे आत्महत्या करण्यापेक्षा कोरोनाने जीव गेलेला बरा, अशी वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. लॉकडाऊन करताना जनतेचा विचार न करता केवळ राजकारण्यांचा विचार केला जात असल्याचे दिसत आहे.

लॉकडाऊन रद्द करून व्यापाऱ्यांना कोरोनाचे नियम पाळून व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी विविध व्यापारी संघटनांनी केली आहे. त्यासाठी कोरोना नियमांचे पालन करून आजपासून दुकाने सुरू ठेवणार असल्याचे व्यापारी संघटनांनी सांगितले आहे. याबाबत तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले असूून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, बळीराजा शेतकरी संघटनेने व्यापाऱ्यांना पाठिंबा दर्शविला आहे.

फोटो : ०५केआरडी०८

कॅप्शन : कऱ्हाडातील व्यापारी, सामाजिक संघटनांनी सोमवारी तहसील कार्यालयासमोर निदर्शने करून लॉकडाऊनला विरोध दर्शविला.