शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात आनंदी देश धोक्यात! रशियन सैन्याने घेरले; युरोपमध्ये खळबळ, युक्रेननंतर..
2
अचानक बसला आग लागली, ५ जणांचा मृत्यू, काच फोडून चालक पळून गेला
3
४ दिवसांच्या संघर्षात भारत ठरला वरचढ, पाकिस्तानला मोठं नुकसान; न्यूयॉर्क टाईम्सचा रिपोर्ट
4
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
5
पाकिस्ताननंतर बांगलादेशनं IMF कडे पसरले हात, बुडत्या अर्थव्यवस्थेचं कारण देत 'इतक्या' पैशांची मागणी
6
आजचे राशीभविष्य १५ मे २०२५: आर्थिक लाभ संभवतात, दुपारनंंतर मात्र अनेकांचे नशीब बदलेल...
7
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
8
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
9
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
10
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
11
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
12
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
13
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
14
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
15
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
17
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
18
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
19
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
20
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?

‘कर’वादात अडकले भाजीमंडईचे गाळे !

By admin | Updated: April 9, 2017 23:43 IST

कऱ्हाड पालिका : १२७ गाळेधारकांना नोटिसा, २०११ पासूनचा कर आठ दिवसांत न जमा केल्यास गाळे ताब्यात

कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेचे गेल्या सहा वर्षांपासून एक कोटी ९४ लाख रुपये संकलित कर थकविणाऱ्या व भाडेही न भरणाऱ्या येथील शिवाजी भाजी मंडईतील सुमारे १२७ गाळेधारकांना मुख्याधिकारी औंधकर यांनी नुकत्याच नोटिसा बजावल्या आहेत. त्यात येत्या आठ दिवसांत संबंधित गाळेधारकांनी २०११ पासून कर न भरल्यास गाळ्यांचा ताबा घेणार असल्याचे सांगितले आहे. मुख्याधिकारी व थकबाकीदार गाळेधारकांच्या या वादात अनेक दिवसांपासून मंडईचे गाळे तसेच पडून आहे. या दोघांच्यातील वादावर नगरसेवकांकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे.केंद्र शासनाच्या माध्यमातून कऱ्हाड पालिकेने २०११ मध्ये गुरुवार पेठ येथे सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चातून येथील शिवाजी भाजी मंडईची इमारत बांधली. दोन मजली इमारतीतील आतील आणि बाहेरील बाजूस १९६ गाळे बांधण्यात आले. त्यामधील १९६ गाळ्यांपैकी सुरुवातीला १३१ गाळ्यांचे लिलाव झाले. उर्वरित ६५ गाळ्यांचे लिलाव झाले नाही. लिलाव झालेल्या १३१ गाळे धारकांपैकी सहा वर्षांत फक्त ४३ गाळेधारकांनी पैसे भरले. उर्वरित राहिलेल्या १२७ गाळेधारकांनी डिपॉझिट रक्कम व थकबाकीची रक्कम न भरल्यामुळे सुमारे एक कोटी ९४ लाख रुपये करवसुलीची थकबाकी राहिलेली आहे तर गाळ्याचे डिपॉझिट रक्कम भरणे बाकी असल्याने पालिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पालिकेस आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने हा भरून काढण्यासाठी संबंधित कर थकविणाऱ्या गाळेधारकांवर कडक स्वरूपाची कारवाई करण्याचा निर्णय मुख्याधिकारी यांनी घेतला आहे. सहा वर्षांत वेळोवेळी पालिकेचे वसुली विभागातील कर्मचारी गाळेधारकांकडे पैसे मागण्यासाठी गेल्यास त्यांना केवळ आश्वासने दिली जात असे. तसेच काही ‘नगरसेवकां’च्या ‘मेहरबानी’मुळे गाळेधारकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली नसल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते.वास्तविक पाहता पालिकेची भाजी मंडईतील शिवाजी भाजी मंडईची इमारत ही पालिकेच्या उत्पन्नात भर टाकण्याच्या उद्देशाने बांधण्यात आली. या मंडईतील गाळ्यांचा वापर करून त्यातून पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार होती. मात्र, या उत्पन्न देणाऱ्या मंडईतील गाळे लिलावापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले. पालिकेची सध्या दोन कोटींची थकित कर वसुलीबाकी राहिली आहे. गाळेधारकांनी ती भरल्यास त्यांना गाळे परत देण्यात येणार आहे. मात्र, मार्च महिन्यानंतर वाढीव व्याज कर लावून कर भरण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पण करावरील व्याज कमी करावे तसेच २०१३ नंतरपासून आतापर्यंत राहिलेली थकबाकी रक्कमच भरणार असल्याचा गाळेधारकांनी पावित्रा घेतला आहे. गाळेधारकांच्या या पावित्र्यामुळे व मुख्याधिकारी यांच्या संपूर्ण कर भरण्याच्या केलेल्या नोटिसीमध्ये पालिकेस मात्र तोटा सहन करावा लागत आहे. २०१३ पासून आतापर्यंत अनेकवेळा पालिका प्रशासनाच्या वतीने शिवाजी भाजी मंडईतील इमारतीमधील गाळ्यांचे लिलाव करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, गाळ्यांचे लिलाव काही केल्या होऊ शकले नाही. ते लिलाव का होऊ शकले नाही. याचे संशोधन करणे गरजेचे आहे. गाळे वाटपाअभावी पालिकेचे सहा वर्षांत कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. याला जबाबदार पालिका प्रशासनाला धरले पाहिजे की, लोकप्रतिनिधींना किंवा गाळेधारकांना असा प्रश्न शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)