शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
3
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
4
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
5
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
6
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
7
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
8
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
9
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
10
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
11
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
12
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
13
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
14
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
15
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
16
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
17
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
18
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
19
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
20
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 

‘कर’वादात अडकले भाजीमंडईचे गाळे !

By admin | Updated: April 9, 2017 23:43 IST

कऱ्हाड पालिका : १२७ गाळेधारकांना नोटिसा, २०११ पासूनचा कर आठ दिवसांत न जमा केल्यास गाळे ताब्यात

कऱ्हाड : कऱ्हाड पालिकेचे गेल्या सहा वर्षांपासून एक कोटी ९४ लाख रुपये संकलित कर थकविणाऱ्या व भाडेही न भरणाऱ्या येथील शिवाजी भाजी मंडईतील सुमारे १२७ गाळेधारकांना मुख्याधिकारी औंधकर यांनी नुकत्याच नोटिसा बजावल्या आहेत. त्यात येत्या आठ दिवसांत संबंधित गाळेधारकांनी २०११ पासून कर न भरल्यास गाळ्यांचा ताबा घेणार असल्याचे सांगितले आहे. मुख्याधिकारी व थकबाकीदार गाळेधारकांच्या या वादात अनेक दिवसांपासून मंडईचे गाळे तसेच पडून आहे. या दोघांच्यातील वादावर नगरसेवकांकडून बघ्याची भूमिका घेतली जात आहे.केंद्र शासनाच्या माध्यमातून कऱ्हाड पालिकेने २०११ मध्ये गुरुवार पेठ येथे सुमारे साडेतीन कोटी रुपये खर्चातून येथील शिवाजी भाजी मंडईची इमारत बांधली. दोन मजली इमारतीतील आतील आणि बाहेरील बाजूस १९६ गाळे बांधण्यात आले. त्यामधील १९६ गाळ्यांपैकी सुरुवातीला १३१ गाळ्यांचे लिलाव झाले. उर्वरित ६५ गाळ्यांचे लिलाव झाले नाही. लिलाव झालेल्या १३१ गाळे धारकांपैकी सहा वर्षांत फक्त ४३ गाळेधारकांनी पैसे भरले. उर्वरित राहिलेल्या १२७ गाळेधारकांनी डिपॉझिट रक्कम व थकबाकीची रक्कम न भरल्यामुळे सुमारे एक कोटी ९४ लाख रुपये करवसुलीची थकबाकी राहिलेली आहे तर गाळ्याचे डिपॉझिट रक्कम भरणे बाकी असल्याने पालिकेचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. पालिकेस आर्थिक तोटा सहन करावा लागत असल्याने हा भरून काढण्यासाठी संबंधित कर थकविणाऱ्या गाळेधारकांवर कडक स्वरूपाची कारवाई करण्याचा निर्णय मुख्याधिकारी यांनी घेतला आहे. सहा वर्षांत वेळोवेळी पालिकेचे वसुली विभागातील कर्मचारी गाळेधारकांकडे पैसे मागण्यासाठी गेल्यास त्यांना केवळ आश्वासने दिली जात असे. तसेच काही ‘नगरसेवकां’च्या ‘मेहरबानी’मुळे गाळेधारकांवर आतापर्यंत कारवाई करण्यात आली नसल्याचे नागरिकांकडून सांगितले जाते.वास्तविक पाहता पालिकेची भाजी मंडईतील शिवाजी भाजी मंडईची इमारत ही पालिकेच्या उत्पन्नात भर टाकण्याच्या उद्देशाने बांधण्यात आली. या मंडईतील गाळ्यांचा वापर करून त्यातून पालिकेच्या उत्पन्नात भर पडणार होती. मात्र, या उत्पन्न देणाऱ्या मंडईतील गाळे लिलावापासूनच वादाच्या भोवऱ्यात सापडले. पालिकेची सध्या दोन कोटींची थकित कर वसुलीबाकी राहिली आहे. गाळेधारकांनी ती भरल्यास त्यांना गाळे परत देण्यात येणार आहे. मात्र, मार्च महिन्यानंतर वाढीव व्याज कर लावून कर भरण्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. पण करावरील व्याज कमी करावे तसेच २०१३ नंतरपासून आतापर्यंत राहिलेली थकबाकी रक्कमच भरणार असल्याचा गाळेधारकांनी पावित्रा घेतला आहे. गाळेधारकांच्या या पावित्र्यामुळे व मुख्याधिकारी यांच्या संपूर्ण कर भरण्याच्या केलेल्या नोटिसीमध्ये पालिकेस मात्र तोटा सहन करावा लागत आहे. २०१३ पासून आतापर्यंत अनेकवेळा पालिका प्रशासनाच्या वतीने शिवाजी भाजी मंडईतील इमारतीमधील गाळ्यांचे लिलाव करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, गाळ्यांचे लिलाव काही केल्या होऊ शकले नाही. ते लिलाव का होऊ शकले नाही. याचे संशोधन करणे गरजेचे आहे. गाळे वाटपाअभावी पालिकेचे सहा वर्षांत कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. याला जबाबदार पालिका प्रशासनाला धरले पाहिजे की, लोकप्रतिनिधींना किंवा गाळेधारकांना असा प्रश्न शहरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. (प्रतिनिधी)